विवेकानंद केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थापना[संपादन]

०७ जानेवारी १९७२ (स्वामी विवेकानंद यांच्या १०८व्या जन्मदिनी - तिथीनुसार) कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यासमोर पी.महादेवन यांच्या अध्यक्षतेखाली श्री.एकनाथ रानडे यांनी विवेकानंद केंद्राविषयी रीतसर प्रस्ताव मांडला. सर्वानुमते तो मंजूर झाला.[१]

मार्गदर्शक तत्त्व[संपादन]

मानवसेवा हीच माधवसेवा [२]

स्वरूप[संपादन]

अध्यात्मप्रेरित संघटना

दुहेरी लक्ष्य[संपादन]

मनुष्य निर्माण आणि राष्ट्रपुनरुत्थान

राष्ट्रपुनरुत्थान यासाठी निवडलेली कार्यक्षेत्रे[संपादन]

शिक्षण, योगवर्ग, ग्रामीण विकास, नैसर्गिक संसाधन विकास, प्रकाशन, जन-प्रबोधन

मुख्य कार्यालय[संपादन]

कन्याकुमारी

कार्याचे स्वरूप[संपादन]

०५ वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते जीवनव्रती या नावाने संबोधले जातात. व ते वेतनाविना काम करतात. समाजातर्फे लोकांच्या नियमित योगदानावर आधारित 'परिपोषक योजना' आखण्यात आली आणि त्या आधारे या जीवनव्रतींचा योगक्षेम चालविला जातो. [१]

गुरुकुल पद्धतीने चालणारी ५८ विवेकानंद केंद्र विद्यालये अरुणाचल, आसाम, नागलंड, अंदमान-निकोबार, कर्नाटक, तामिळनाडू येथील दुर्गम भागात शिक्षणाचे कार्य करत आहेत. [२]

अरुणज्योती प्रकल्प[संपादन]

अरुणाचल प्रदेशातील संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठीचा प्रकल्प. [२]

आधारभूत ग्रंथ[संपादन]

  • Sadhana of Service (सेवा साधना) - ले. एकनाथ रानडे.
  • Rousing Call to Hindu Nation (हिंदू तेजा जाग रे) - ले. एकनाथ रानडे.
  • एकनाथजी
  • ध्येयमार्गानुयात्रा [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c सुरेखा प्रभाकर दीक्षित (२०१६). एकनाथजी रानडे : एक जीवन - एक ध्येय. पुणे: मोरया प्रकाशन.
  2. ^ a b c ईश्वराच्या शोधात (स्वामी विवेकानंद यांच्या कवितांचा भावानुवाद), अनुवादक द.तु.नन्दापुरे, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, २०१३