मदनगोपाळ लढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. मदन गोपाल लढा (२ सप्टेंबर, १९७७:महाजन, बिकानेर जिल्हा, राजस्थान, भारत - ) हे एक राजस्थानी भाषेत आणि हिंदीत लिहिणारे कथालेखक आणि कवी आहेत. राजस्थानमधील एका काॅलेजात ते प्राध्यापक आहेत. त्यांच्या राजस्थानी भाषेतील अनेक कविता त्यांनी स्वतःच हिंदीत अनुवादित केल्या आहेत.

लढा हे नेगचार नावाच्या राजस्थानी अनुदिनीचे (ब्लाॅगचे) सहसंपादक असून शिवाय सुरतगड टाईम्सचे साहित्यविषयक मजकुरासाठीचे संपादक आहेत.

शिक्षण[संपादन]

एम.ए., एम.एड. पीएच.डी.

पुस्तके[संपादन]

  • चीकणा दिन (राजस्थानी कविता संग्रह)
  • च्यानण पख (राजस्थानी कथासंग्रह)
  • तिणकला अर पांख्यां (अनुवादित)
  • महाजन फ़ील्ड फ़ायरिंग रेंज (हिंदी कविता)
  • म्हारै पांती री चिंतावां (राजस्थानी कवितासंग्रह)
  • सपनै री सीख (राजस्थानी बालकथा संग्रह)
  • होना चाहता हूं जल (हिंदी कवितासंग्रह)

पुरस्कार[संपादन]

  • अकोल्याच्या चित्रा प्रकाशनचा 'चंद्रसिंह बिरकाली' बालसाहित्य परस्कार (१९९९)
  • बिकानेरच्या राजस्थानी भाषा, साहित्य, आणि संस्कृति अकादमीकडून 'भत्तमाल जोशी' पुरस्कार (१९९९)
  • बिकानेरच्या राजस्थानी भाषा, साहित्य, आणि संस्कृति अकादमीकडून 'मनुज देपावत' पुरस्कार (१९९५)
  • मुंबईच्या कमला गोयंका फ़ाउंडेशनचा किशोर कल्पनाकांत पुरस्कार (२००९)