दुर्ग साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ ही संस्था साधारणपणे दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते.

  • पहिले दुर्ग साहित्य संमेलन लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.
  • २रे दुर्ग साहित्य संमेलन कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष ब्रह्मानंद देशपांडे होते.
  • ३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मनोहर आवटी होते.
  • ४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. गो.बं. देगलूरकर होते.
  • ५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान सिंहगडाच्या पायथ्याशी भरले. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर होते.


पहा :मराठी साहित्य संमेलने