चर्चा:तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नंदकिशोर म कुबडे (चर्चा) २०:४७, ४ ऑगस्ट २०१४ (IST)वंदनीय महाराजांनी केलेल्या सत्कार्याचा आढावा घेणे किवा त्यांच्या साहित्या बद्द्ल बोलणे तितक सोप नाही परंतु ग्रामगीता ह्या ग्रंथावर विचार करतांना मला अनेक शंका निर्माण व्हायच्या अजून समाधान झालेले नाही उदांः हिंदूंनी मशिदी पडल्या ,शास्त्राचा विरोधाभास ,गुरु पूजक असून गुरु ,मूर्ती ,तीर्थ ,याबद्दल अप शब्दात वर्णन करणे इत्यदी तत्व लिहिल्याने काही भाविकांनी नाराजी दाखविली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल[reply]

नंदकिशोर कुबडे मी ग्रामगीता वाचली आपले मत खरे आहे वंदनीय महाराजांनी एकात्मतेचा संदेश देतांना वेदिक आर्य संस्कृतीचा चुराडा केला आहे

महाराजांनी सामाजिक ,ग्रामविकासा करिता केलेले महान कार्य वंदनीय आहे परंतु त्यच बरोबर ज्ञान,भक्ती,पूजापाठ,ईश्वर इत्यादींचा अभाव निर्माण करून नास्तिकतेला मोकळी वाट करून दिली .

धर्माची परिभाषा बदलली ,ईश्वराचे स्वरूप ,भक्तीचा मार्ग,बदलून स्वमत निर्णय घेतला आणि गुरु शास्त्र संमत ठरविला सुरवातीला सांगतात कि१} आपणची मन्दिर मूर्ती पुजारी |आपणची पुष्पे होऊनी पूजा करी ||आपणची देव रुपे अंतरी |पावे भक्ता |१ |३ |ईश्वर जर सर्वव्यपी आहे तर मंदिरात का नाही २ }भलेही तो देव न माने|परी सर्व सुख देऊ जाणे |मानवाशी मानवाने| पूरक व्हावे म्हणूनिया |१ |१०७ |जो देवालाच मानत नाही तो इतरांना काय सुख देणार ?