उद्धव किशनराव भयवाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उध्दव किशनराव भयवाळ या पानावरून पुनर्निर्देशित)


उद्धव किशनराव भयवाळ (जन्म : बदनापूर-जालना जिल्हा, १८ जून १९५०) हे एक मराठी साहित्यिक आहेत.

शिक्षण व नोकरी[संपादन]

मूळ गावातून १९६६ साली एस.एस.सी झाल्यावर उद्धव भयवाळ जालन्याला आले. तेथे ते जे.ई.एस. कॉलेजमधून फिजिक्स विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. त्यानंतर त्यांनी १९७३-२००६ या काळात स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये विविध पदांवर काम केले. तेथून २००६ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर ते लेखनाकडे वळले.

उद्धव किशनराव भयवाळ यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • इंद्रधनुष्य (कवितासंग्रह)
  • हसरी फुले (बालकविता संग्रह)
  • याशिवाय काही एकांकिका व विनोदी कथा

मिळालेले पुरस्कार व सन्मान[संपादन]

  • अंकुर वाङ्मय पुरस्कार (२००८)
  • 'नवरत्न' पुरस्कारापैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार (दिनांक २५-०२-२०१६ रोजी पंढरपूर येथे)
  • साहित्यसेवेबद्दल 'कलाकुंज ‘ प्रकाशनाच्या वतीने साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०१४ रोजी नाशिक येथे सत्कार.
  • सुभेद्रा प्रतिष्ठान (सेलू-परभणी जिल्हा) यांच्यातर्फे व दाजी पणशीकर यांच्या हस्ते गौरव पुरस्कार (५ मार्च २०१२)