अवंतिकाबाई गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवंतिकाबाई गोखले (१७ सप्टेंबर,‌ १८८२ -२६ मार्च १९४९) या मराठी लेखिका होत्या . यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र (१९१८) लोकमान्य टिळकांच्या प्रस्तावनेसहित प्रकाशित केले. गांधीयुगाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राला गांधी जीवनाचा व विचारांचा परिचय करून देणारे हे चरित्र लक्षणीय आहे. गांधी जिवंत असताना लिहिलेले हे पहिले चरित्र आहे. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या अवंतिकाबाईंनी पुढे महिला आरोग्य व अन्य क्षेत्रात काम करण्यासाठी 'हिंद महिला समाजा'ची स्थापना केली होती. तसेच मिठाच्या सत्याग्रहात एकमेव महाराष्ट्रीयन महिला म्हणून समावेश होता.