चर्चा:भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतर पानावर लिहिलेला मजकूर

१९७१ भारत - पाक युद्ध
Indo-Pak 1971 war भारत आणि पाकिस्तान यांत १९७१ साली तीसरे युद्ध जाले.
हे बांगलादेश स्वातंत्र युद्धाशी संबंधित असले तरी युद्धाचा अधिकृत कालावधि हा ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर मानला जातो.
याची परिणिति पाकिस्तानची सुमारे लाखभर सैन्यसकट शरणागति आणि स्वत्रंत्र बांगलादेश निर्मिती मधे जाली.
पार्श्वभूमी भारत पाक युद्ध हे बांगलादेश स्वातंत्र युद्धाशी संबंधित होते. त्याकाळी पाकिस्तान चे पूर्व आणि पश्चिम असे भाग होते. १९७० च्या निवडणुका मात्र तेढ निर्माण करण्यास कारनीभुत ठरल्या. या निवडणुका त पूर्व पाकिस्तान मधून आवामी लीग १६९ पैकी १६७ जगा जिंकुन ३१३ जागांच्या संसदेत बहुमतात आली. आवामी लीग चे प्रमुख शेख मुजीबुर रहमान यांनी पाकिस्तानच्या राष्ट्र अध्यक्षा कडे सरकार स्थापन करण्यास दावा केला. पण पाकिस्तान पीपल पार्टी चे प्रमुख जुल्फिकार अली भुट्टो यांनी याला विरोध दर्शवला आणि अध्यक्ष याहया खान यांनी पश्चिम पाकिस्तान चे सैन्य पूर्व पाकिस्तानात पाठवले.
यानंतर पूर्व पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांचे खच्चीकरणाचे प्रयत्न जाले. अखेर पाकिस्तानी सैन्याने २५ मार्च रोजी ढाका ताब्यात घेतले. आवामी लीग बंद करण्यात आली. शेख मुजीबुर रहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले. पण २७ मार्च ला जिउर रहमान यानि बांगलादेश चे स्वतंत्र घोषित केले. तसेच युद्ध मदिती साठी मुक्ति बहिनी ची निर्मिती करण्यात आली.
भारताचा सहभाग २७ मार्च रोजीच इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानच्या चळवळीला पाठिंबा दर्शविला. आणि पूर्व पाकिस्तान मधून येनारया शरणार्थी साठी सीमा सुद्धा खुली केलि. पश्चिम बंगाल , बिहार , आसाम मेघालय , त्रिपुरा या राज्यांत शरणार्थी साठी छावन्या उभारन्यात आल्या. लवकरच शरानार्थींची संख्या १ करोड़ च्या वर गेली. सहाजिकच भारतावर याचा प्रचंड तान पडू लागला. खुद्द भारतात सर्व पक्षं कडून पाकिस्तान सोबत युद्ध घोषित करण्यास दबाव येवू लागला.