हीरक महोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हीरक महोत्सव (Diamond jubilee - डायमंड जुबली) म्हणजे ६० वा वर्धापन दिन होय. याला हीरक जयंती किंवा साठवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २००७ मध्ये स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा केला.

हीरक महोत्सवी वर्ष हे ५९ व्या वर्धापन दिनापासून ते ६० व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते. षष्ठी पूर्ती ६० वर्ष पूर्ण.

हे देखील पहा[संपादन]