सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शासकीय कर्मचाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली केली जाते त्या क्रियेला विनोदाने "शासकीय बदलीकारण" किंवा बदल्यांचे राजकारण असे संबोधले जाते. विशिष्ट ठिकाणी/विभागात बदली करून घेणे अथवा टाळणे यात शासकीय कर्मचारी आणि जनता या शिवाय इतरांचेही हितसंबंध असू शकतात.

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांच्या बदल्यांसाठी काही विशिष्ट संकेतावली असते. या बदल्यांमध्ये सहसा राजकारण किंवा कुणालातरी खुश करणे असा प्रकार नसतो. पती-पत्‍नी दोघेही सरकारी नोकरीत असतील तर दोघांनाही एकच गाव मिळेल असे पाहण्याचा प्रयत्‍न असतो. बदली करताना जो एकाच गावात अधिकतम काळ आहे, त्याची आधी बदली होती. निवृत्तीला आलेल्या माणसाची विनाकारण बदली होत नाही.


बदल्यांसाठी निकष[संपादन]

बदल्यांचे अधिकार[संपादन]

बदल्यांची वस्तुस्थिती[संपादन]

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या[संपादन]

या बदल्यांमध्ये १०० टक्की राजकारण असते. कोणी अधिकारी फार चांगले काम करीत असेल आणि लोकप्रियता मिळवत असेल तर त्याची बदली करतात. सनदी अधिकाऱ्याच्या चांगल्या कामामुळे मंत्री, आमदार, खासदार किंवा राजकीय पक्षाचा सभासद वा या लोकांच्या मर्जीतला जातवाला, नातेवाईक, व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, गुंड, गुन्हेगार याच्या हितसंबंधांना धक्का लागत असेल तर अशा सनदी अधिकाऱ्याची हकालपट्टी करून त्याला जिथे जबाबदारीचे काम नसेल अशा ठिकाणी पाठवले जाते.

अशा चांगल्या कामासाठी बदलीची शिक्षा झालेले सनदी अधिकारी :-

  • उत्तर प्रदेशातील तरुण सनदी अधिकारी दुर्गा नागपाल
  • हिमाचल प्रदेश केडरचे १९८२ च्या बॅचचे अधिकारी विनीत चौधरी यांची ३१ वर्षांच्या सेवेत ५२ वेळा बदली करण्यात आली.
  • हरियाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांची प्रियंका गांधीयांचे पती रॉबर्ट वद्रा बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्‍न केल्याबद्दल निलंबन आणि नंतर बदली
  • बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे बीडकरांमध्ये लोकप्रिय झाले होते. केंद्रेकर यांची बदली होऊ नये, अशी बीडकरांनी मागणी केली होती, तरीही त्‍यांची शेवटी औरंगाबादला बदली झाली. ही बदली अकाली होती. त्यांचा बीडनधील कार्यकाल फक्त एक वर्ष चार महिने आणि २७ दिवस होता.
  • अरुण भाटिया (पिंपरी चिंचवडचे आयुक्त)
  • अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची मुद्रांक शुल्क विभागाच्या महानिरीक्षकपदी बदली केली. त्यानंतर काही महिन्यांत परदेशी यांची पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली. तिथून त्यांना चार महिने १६ दिवसांत हटवले.
  • बिशन नारायण टंडन हे उत्तर प्रदेश केडरचे १९५१ च्या बॅचचे आय‍ए‍एस अधिकारी १९६९ ते १९७६ या काळात पंतप्रधानांच्या कार्यालयाचे सचिव होते. इंदिरा गांधींच्या गैरकारभाराला विरोध केल्याबद्दल त्यांना बदलीची शिक्षा भोगावी लागली. १९७६मध्ये त्यांना अतिरिक्त सचिव म्हणून संस्कृति खात्यात पाठवले. १९८० साली इंदिरा गांधी जेव्हा परत सत्तेवर आल्या तेव्हा त्यांनी टंडन यांना केंद्रात किंवा राज्यात बढती किंवा चांगल्या जागी नेमणूक मिळणार नाही याची व्यवस्था केली. टंडन यांनी शेवटी १९८३ साली स्वेच्छा निवृत्ती पत्करली.
  • राजीव गांधींच्या कार्यकाळात भुरेलाल अर्थखात्याचे सचिव होते. अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांच्या परवानगीने भुरेलाल यांनी थापर, बाटा, लिप्टन, व्होल्टास आणि किर्लोस्कर यांच्या औद्योगिक कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे मारले. राजीव गांधींचे जवळचे मित्र अमिताभ बच्चन आणि त्यांचे भाऊ अजिताभ बच्चन या दोघांनी विदेशी चलना कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्यांची चौकशी सुरू केली. मात्र शेवटी धीरूभाई अंबानींच्या पेट्रोलियम कारखान्याचे चौकशी सुरू झाल्यावर लगेच राजीव गांधींनी व्ही.पी. सिंग आणि भुरेलाल या दोघांना अर्थ मंत्रालयातून हटवले.

=गृहखात्यातील आणि पोलीसदलातील बदल्या[संपादन]

सेल्सटॅक्स विभागातील बदल्या[संपादन]

महसूल आणि सामान्य प्रशासन विभागातील बदल्या[संपादन]

पालिका आणि जिल्हापरिषद आणि स्थानिक प्रशासनातील बदल्या[संपादन]

शिक्षकांच्या बदल्या[संपादन]

(अपूर्ण)