नववी पंचवार्षिक योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही एक भारतीय पंचवार्षिक योजनेतील नववी योजना आहे.

कालावधी[संपादन]

या योजनेचा कालावधी १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२ पर्यंत होता. तत्कालीन UF सरकारने या नवव्या योजनेचा मसुदा मार्च १९९८ मध्ये जाहीर केला.फेब्रुवारी १९९९ मध्ये NDA सरकारने तयार केलेला मसुदा ' राष्ट्रीय विकास परिषदेने ' संमत केला . ही योजना १५ वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती.

मुख्य भर व घोषवाक्य[संपादन]

या योजनेचा मुख्य भर कृषी आणि ग्रामीण विकासावर होता.' सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ ' हे या योजनेचे घोषवाक्य होते.

खर्च[संपादन]

या योजनेचा प्रस्तावित खर्च ८,९५,२०० कोटी रुपये एवढा होता तर, वास्तविक खर्च ९,४१,०८० कोटी रुपये इतका होता.प्रस्तावित खर्चापेक्षा वास्तविक खर्च जास्त होता.

उद्दिष्टे[संपादन]

या नवव्या पंचवार्षिक योजनेचे खालीलप्रमाणे उद्दिष्टे होती.

  • कृषी व ग्रामीण विकास ह्यांना अग्रक्रम देणे.
  • कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे.
  • सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरविणे .
  • शाश्वत विकास
  • स्त्रिया, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय लोकांचे सबलीकरण करणे.
  • लोकांचा सहभाग वाढू शकणाऱ्या संस्थांच्या विकासास चालना देणे.

विशेष घटनाक्रम[संपादन]

१.एप्रिल १९९७ मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक धोरण घोषित करण्यात आले. २.१९९८ मध्ये भारताचे सर्वात महत्त्वकांक्षी योजना म्हणजे " राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम "(NHDP) हाती घेण्यात आला. ३.१९९७ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी " नवरत्न आणि मिनिरत्न शृंखला " सुरू करण्यात आली. ४.जून १९९९ मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना (NIAS) सुरू करण्यात आली.तिच्या अंमलबजावणीसाठी " कृषी विमा महामंडळाची " स्थापना करण्यात आली. ५.फेब्रुवारी २००० मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले.या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ११ मे २००० रोजी " लोकसंख्या आयोगाची " स्थापना करण्यात आली ६.२००० - २००१ च्या वार्षिक आयात - निर्यात धोरणात प्रथमच विशेष आर्थिक क्षेत्राची (SEZ) संकल्पना मांडण्यात आली.

मूल्यमापन[संपादन]

या योजनेत वाढीचा वार्षिक सरासरी दर साध्य होऊ शकला नाही.वाढीच्या वार्षिक सरासरी दराचे लक्ष्य ६.५ टक्के ठेवण्यात आले होते, पण ते ५.५२ टक्केच साध्य होऊ शकले.