योग आणि महिलांचे आरोग्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योग आणि महिलांचे आरोग्य

महिलांच्या आयुष्यात तीन टप्पे महत्त्वाचे असतात.

पहिला टप्पा म्हणजे ती वयात येते व ज्या वेळी तिला पाळी येते तो.

दुसरा टप्पा ती जेव्हा गरोदर असते तो आणि

तिसरा म्हणजे रजोनिवृतीचा

हे तिन्ही टप्पे पार करतना जर प्रत्येक स्त्रीने योगासने केली तर तिचे आयुष्य वेदनारहित जाईल.


योग म्हणजे काय?

योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय.

महर्षी पतंजली यांनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा निरोध आहे. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णतः निरुद्ध होते, तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्कामभावाने कर्म करण्यास प्रारंभ करतो.                    

महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाची आठ अंगे सांगितलेली आहेत.

योगात यम, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे पालन आहे.

नियम शौच, संतोष तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचे ते अनुष्ठान आहे.

योगासन म्हणजे विशिष्ट स्थितीत शरीर स्थिर करणे होय.

प्राणायाम हे मनाच्या शांतीचे साधन आहे.

प्रत्याहार हा मनाला भोगांपासून परावृत्त करतो.

धारणा हे एकाग्रतेचे नाव आहे.

एकाग्रताने स्थिर होणे हेच ध्यान आहे. व्यक्तीचे परम चेतनेमध्ये सामावणे म्हणजेच समाधी.

महिलांचे स्वतः कडे दु्र्लक्ष

महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात.त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा  होतो. मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून लागते डिप्रेशन येते. मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी महिलांनी थोडे स्वार्थी होणे गरजेचे असते. त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा. पुरेसा व्यायाम करावा, चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा एक तास योग केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात वाढते वजन नियंत्रणात येते. विकार बरे होतात. वाढते शुगर, गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी वर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इन बॅलन्सने सुरू होतात. योग केल्यामुळे सर्व समस्या कमी होऊ शकतात आसनेन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, केल्याने महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्त्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे.

महिलांचे मानसिक विकार

महिलांना जीवन जगत असताना मनाची अवस्था चांगली असणे खूप गरजेचे आहे .

मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे या टप्प्यावर काहीतरी विशिष्ट मानसिक आजार होतात.त्यांना स्त्रियांमधील मानसिक आजार असे म्हटले जाते.

या टप्प्यावर स्त्रियांना मोठे शारीरिक मानसिक व सामाजिक बदल करावे लागतात.त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते.

शरीरातील प्रत्येक कार्य मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात असे समजले जाते.

पौगंडावस्थेमध्ये मुलींमध्ये उदासीनता, भित्रेपणा यासारखे आजार मुलांच्या तुलनेने जास्त दिसून येतात. बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या थोड्या आधी किंवा त्या दरम्यान लहरीपणा, कंटाळाव अन्य त्रास होतात. काही स्त्रियांना हे त्रास तीव्रतेचे होतात. त्याशिवाय शरीर बोजड वाटणे, चिडचिडेपणा, उदासपणाव झोपेचे त्रास होतात. हे त्रास होताना स्त्रियांमध्ये टोकाचे बदल होतात.

गर्भारपणात महिला आनंदी समाधानी असणे अपेक्षित असते. पण काही स्त्रियांना समाधान वाटते, कधी कधी स्वतः भीती वाटू शकते. हे सर्व त्रास नंतर वाढतात किंवा नव्याने सुरुवात होते .

मासिक पाळी थांबण्याच्या वेळी बहुतेक स्त्रिया झोपेच्या तक्रारी अनुभवतात. वारंवार झोप नीट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना अशक्तपणा, निरुत्साह, उदासीनता जाणवते. त्याला डोमिनो इफेक्ट्स म्हणतात. अशा झोपण्याच्या तक्रारीमुळे आणि इतर मेंदूतील बदलामुळे स्त्रियांना उदासीनतेचा आजार नव्याने होण्याची शक्यता असते. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की या वयात विस्मृतीचे लक्षण असू शकते या सर्व कारणांमुळे या वयात या स्त्रीने झोपेच्या त्रासाची दखल घेऊन वेळेत उपचार केले पाहिजे.

स्त्रियांच्या आरोग्यावर आणि स्थैर्यावर तिच्या कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते. शारीरिक आरोग्यासाठी जसा उपचार सल्ला गरजेचा असतो; त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी महत्त्वाची असते.

योगाचे महत्त्व

योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योग केल्याने माणूस ताणतणावपासून दूर राहतो. इतकेच नाही तर माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय नियमित योग केले तर कोणत्याही आजारापासून माणूस दूर राहू शकतो. पण त्यासाठी ही गोष्ट नियमित करणे आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योग हा बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतो, जे जास्त महत्त्वाचे आहे.

ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिटे ध्यान लावून बसले की, माणसाच्या मनात आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे माणसाचे मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. तसेच पूर्ण दिवस मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते; दिवसभराच्या तणावपासून दूर राहण्यास मदत होते.

प्रत्येक महिलेने स्वतःसाठी थोडा तरी वेळ कडून योग करावा व आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करावे.