व्यापार साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्यापार साहित्य संंमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतातले पहिले व्यापार साहित्य संमेलन बंगलोरला ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले.

या संमेलनात कथाकथन,चित्रपट, ब्लॉग, ट्‌विट आणि सोशल मीडियाद्वारे व्यापारविषयक गोष्टी मांडण्यात आल्या. उद्योगपती, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी ,स्वयंउद्योजक आणि विद्यार्थी यांचा या संमेलनात सहभाग होता. त्यांना व्यापारविषक पुस्तके लिहिणाऱ्या देशातील ३० लेखकांशी, संपादकांची तसेच प्रकाशकांची गप्पा मारण्याची संधी मिळाली.

पुस्तके कशा प्रकारे प्रकाशित करावीत, लेखकाला स्वतःचे पुस्तक स्वतःच प्रकाशित करायचे असेल, ते त्याने कसे करावे, व्यापारविषयक लेख कसे लिहावेत, चित्रपटांसाठी पटकथाकशा लिहाव्यात यांविषयी या संमेलनात कार्यशाळा घेण्यात आल्या.