एक जिल्हा एक उत्पादन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारत सरकारने देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक आणि विशेष उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, ग्रामीण रोजगाराच्या संधी वाढवणे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या विशिष्ट सामर्थ्यांवर आणि वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे.

एक जिल्हा एक उत्पादन (ओ.डी.ओ.पी) उपक्रमाचा उद्देश देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतोल प्रादेशिक विकास करण्याचा आहे. तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यातून (एक जिल्हा - एक उत्पादन) किमान एक उत्पादन निवडणे, त्याला ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे आहे. ओ डी ओ  पी उपक्रमाने देशभरातील 761 जिल्ह्यांमधून एकूण 1102 उत्पादने निवडली आहेत.

या उपक्रमान्तर्गत, सर्व उत्पादने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे जमिनीवरील विद्यमान परिसंस्था, निर्यात केंद्र म्हणून ओळखली जातात आणि जीआय टॅग असलेली उत्पादने विचारात घेतली जातात. अंतिम यादी राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित विभागाद्वारे (उद्द्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभाग ) वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांना कळवली जाते. [१]

  1. ^ "संदर्भ". Ministry of Food Processing and Industries, GoI.