महिषासुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिषासूर हा एक असूर (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नांव रंभ असे होते. रंभ हे सप्तर्षी मधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेंव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो.[ संदर्भ हवा ]

महिषासुर ने ब्रह्मदेवाची आराधना केली . ब्रम्हदेवाची भक्ती केली व त्यांच्या कडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. पण ब्रह्मदेवाने ते नाकारले मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका दैवी शक्ती असलेल्या एका स्त्री च्या हातून होईल जिला चार पेक्षा जास्त हात असतील. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला. या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. शेवटी ब्रम्ह ,विष्णू,महेश यांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञ कुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला अठरा हात तयार झाले प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचे एक रूप समजल्या जाते.

महिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात या सर्वांचा देवीने पराभव व वध केला. त्यानंतर, महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले. सह्याद्री पर्वतरांगेत सात शिखरावर देवीने युद्ध केले हे युद्ध नऊ दिवस चालले. देवी ने महिषासुराचा  त्रिशुळाने  शिरच्छेद करून देवीने "महिषासुरमर्दिनी" नाव धारण केले.देवीने महिषासुराचा वध सप्तशृंग गडावर केला असच आपण बहुतेक ठिकाणी ऐकतो वाचतो ... पण हे चुकीचे आहे,कारण देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर  तिथं विसावा घेतला .खरतर  नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक कुंदलगाव म्हणून एका गावात छोट्याशा टेकडीवर देवीने महिषासुराचा वध केला आहे.त्रिशुळा ने महिषासुराचा शिरच्छेद केला असता या ठिकाणी धड व शिर वेगवेगळे झालेले पाहायला मिळते. हे युद्ध नऊ दिवस चालले. पण ऋषी गणातील असलेला वंशज म्हणून महिषासुर देवीला शरण गेला व लोकोपकारासाठी पुन्हा शक्तीच्या स्वानंदाने व स्वेच्छेने देवीने पुन्हा महिषासुर ला वरदान दिले की तो गावशिवाला व गावकुसाला राखण दार म्हणून गुप्त कार्य करील.आणि माझा धाकला भाऊ म्हणून लोक मानतील.कोणीही देवी देवता त्याच्या कार्यात बाधा टाकणार नाही.त्याच्या कार्यात त्याच्या शक्तीपुढे कोणी देवी देवता त्याची बरोबरी करू शकणार नाही.वेळेप्रसंगी त्याच्याच कुळातील व देव गणातील दैवी शक्ती त्याचा उद्धार करेल .बरेच दिवस लोटले पण देव असो की मानव थोडी सवलत भेटली की त्याचा अहंकार वाढतो.कितीही केलं तरी महिषासुर असुरच .एक जनावरच.त्याचा गर्व वाढला की मी स्वतः आदिशक्तीचा भाऊ आहे.आणि कोणी देवी देवता माझी बरोबरी करू शकत नाही.महिषासुर आपले कार्य विसरून असुर गतीत आला.पाहिजे तेव्हा आपले रूप पालटून त्याने पुन्हा एकदा गाव शिवावरील प्राणीमात्रांना छळायला सुरुवात केली.पीकपाणी शेतीमालाचा उध्वंस सुरू केला.देवीच्या सांगण्यावरून भुतांचा अधिपती वेताळ ने महिषासुर ला धडा शिकवण्याची इच्छा व्यक्त केली असता देवीने मान्य केले.वेताळ ने एका गौळ्याचे(म्हशी राखणारा)रूप धारण केले.डोक्यावर कडब्याचा भारा घेऊन चालला असताना महिषासुर त्याला आडवा झाला. गौळी रुपी वेताळ ने त्याला समजावले की आमची राखणदारी करण सोडून तू आम्हाला त्रास देऊ नको.अन्यथा मला आडवा गेला तर माझ्या रागाला सामोरे जाशील. पण उन्मत्त झालेल्या महिषासुर ने त्याला दोन दोन हात करण्यास ललकारले. त्याचा गर्व हरण करण्याची वेळ आली होती. महिषासुर ने गौळ्याला धडक मारली. पण धडक मारता क्षणी तो मूर्च्छा येऊन पडला. वेताळ हसू लागला. महिषासुराचा गर्व हरण झाला. व मुर्च्छे ने ग्रासलेला महिषासुर देवीचा धावा करू लागला.त्या ठिकाणी अठराभुज अवतारी आदिमायशक्ती प्रकट झाली व वेताळास सांगितले की महिषासुर ला उपदेश देऊन सनाथ करावा व त्याला सन्मार्गी लावावा.
  वेताळ ने आपले मुळ रूप प्रकट केले व महिषासुराला कर्ण बीज मंत्र देऊन उपदेश दिला व देव कार्यात सदैव देवाचा दर्जा देऊन महिषासुराला एक नवीन अवतार दिला.महिषासुराचा अंत होऊन एक रेड्याच्या प्रतिकृतीतील एका खडकातून शिंगाला वाकडा,डोळ्याला गारुळा,पोटाला ढेबरा, शेपीला चौरा अशी शेंदरी मूर्ती प्रकट झाली.वेताळा ने व देवीने त्याला "म्हसोबा" नाव दिले.वेताळ म्हसोबा चे गुरू झाले.
  या कुंदलगावात म्हसोबाला दोन प्रकारे पुजण्याची प्रथा चालू झाली एक गाव शिवावर आणि दुसर शेतीच्या बांधावर.शिवाची व जमिनीची राखण करून भक्तांचे दुःख निवरण्याचे कार्य म्हसोबा ने हाती घेतले.
   कुंदलगावात टेकडीच्या लगत नदीमध्ये एका शेतीच्या बांधावर म्हसोबाला उपदेश मिळाला म्हणून हे ठिकाण म्हसोबाचे मुळ ठिकाण मानले जाते.पण ज्या ठिकाणी उपदेश मिळाला त्या ठिकाणी जलदेवता म्हणजेच सतीअसरा (कुमारी,धनदा,नंदा,विमला,मंगळा,बला,लक्ष्मी) अदृश्य रुपात उपस्थित होत्या.त्यांनी वेताळाकडे मागणी केली व आम्हालाही वर द्या असे सांगितले तर त्यांनाही असा वर दिला की जिथे जिथे म्हसोबाची प्रतिष्ठापना केली जाईल त्या त्या ठिकाणी तुमची देखील प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येईल.सुवासिनी व लहान बालके कुमारिका यांच्यावर तुमची नेहमी कृपादृष्टी असेल.
      आजही आपण कुंदलगावात गेलो असता,गावालगत टेकडीवर म्हसोबाचे मंदिर व शेजारी सप्तशृंगी चे मंदिर पाहायला मिळते.म्हसोबाचे मुख फक्त शिर मंदिरात आहे व ते वणी गडाकडे तोंड करून आहे.आणि बाकीचे धड मंदिराबाहेर बघायला मिळते.