"लाल बहादूर शास्त्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: da, fi, fr, gu, it, ml, nl, ro, ru, ta, te, zh बदलले: sa
ओळ ५७: ओळ ५७:
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|शास्त्री,लाल बहादूर]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|शास्त्री,लाल बहादूर]]


[[da:Lal Bahadur Shastri]]
[[de:Lal Bahadur Shastri]]
[[de:Lal Bahadur Shastri]]
[[en:Lal Bahadur Shastri]]
[[en:Lal Bahadur Shastri]]
[[fi:Lal Bahadur Shastri]]
[[fr:Lâl Bahâdur Shâstrî]]
[[gu:લાલ બહાદુર શાસ્ત્રી]]
[[hi:लालबहादुर शास्त्री]]
[[hi:लालबहादुर शास्त्री]]
[[it:Lal Bahadur Shastri]]
[[kn:ಲಾಲ್ ಬಹಾದುರ್ ಶಾಸ್ತ್ರಿ]]
[[kn:ಲಾಲ್ ಬಹಾದುರ್ ಶಾಸ್ತ್ರಿ]]
[[ml:ലാല്‍ ബഹാദൂര്‍ ശാസ്ത്രി]]
[[ne:लालबहादुर शास्त्री]]
[[ne:लालबहादुर शास्त्री]]
[[nl:Lal Bahadur Shastri]]
[[sa:लाल बहादुर शास्‍त्री]]
[[ro:Lal Bahadur Shastri]]
[[ru:Шастри, Лал Бахадур]]
[[sa:लालबहादुरशास्त्री]]
[[sv:Lal Bahadur Shastri]]
[[sv:Lal Bahadur Shastri]]
[[ta:லால் பகதூர் சாஸ்திரி]]
[[te:లాల్ బహాదుర్ శాస్త్రి]]
[[tr:Lal Bahadur Shastri]]
[[tr:Lal Bahadur Shastri]]
[[zh:拉尔·巴哈杜尔·夏斯特里]]

१३:३३, १ मार्च २०१२ ची आवृत्ती

लाल बहादूर शास्त्री

कार्यकाळ
जुन ९, इ.स. १९६४ – जानेवारी ११, इ.स. १९६६
राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन
मागील गुलजारी लाल नंदा
पुढील गुलजारी लाल नंदा

कार्यकाळ
जुन ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४
मागील गुलजारी लाल नंदा
पुढील सरदार स्वर्णसिंग

जन्म ऑक्टोबर २, इ.स. १९०४
मुगलसराई, भारत
मृत्यू जानेवारी ११, इ.स. १९६६
ताश्केंत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी ललिता देवी
धर्म हिंदू

कॉंग्रेसचे प्रमुख स्वातंत्र्य सेनानी, भारताचे माजी पंतप्रधान.'जय जवान ,जय किसान' या उदघोषणे करिता प्रसिद्ध. यांच्या कार्यकालात भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले.

जेमतेम वर्षभरच पंतप्रधानपदवर राहिलेला पण देशाच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात अजरामर झालेला पंतप्रधान म्हणूनच लालबहादूरांची आठवण राहिली आहे.

२ ऑक्टोबर, १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणशीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्र्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी गांधी, टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तज्ञ्ल्त्;व त्यांना समजाविले.

वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची किनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीव्र बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले. 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकत्र्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.

नेहरू, शास्त्रीना कॉंग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभ पंतांचे सेेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काॅंग्रेसचे सचिव केले. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. १९५७ मध्ये त्यांनी कॉंग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७मे, १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रताध झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, १९६६ ला ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली.