"चिंतामण गणेश कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४२: ओळ ४२:


==नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष==
==नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष==
चिंतामणराव कोल्हटकर हे [[इ. स. १९४६]] साली [[अहमदनगर]] येथे भरलेल्या ३५व्या, आणि [[इ. स. १९४९]] मध्ये [[कोल्हापूर]] येथे भरलेल्या ३६व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|नाट्यसंमेलनांचे]] अध्यक्ष होते.
चिंतामणराव कोल्हटकर हे [[इ. स. १९४६]] साली [[अहमदनगर]] येथे भरलेल्या ३५व्या, आणि [[इ.स. १९४९|इ. स. १९४९]] मध्ये [[कोल्हापूर]] येथे भरलेल्या ३६व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|नाट्यसंमेलनांचे]] अध्यक्ष होते.


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१६:५३, ८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

चिंतामण गणेश कोल्हटकर
जन्म चिंतामण गणेश कोल्हटकर
मार्च १२ इ.स. १८९१
रत्नागिरी, महाराष्ट्र
मृत्यू २३ नोव्हेंबर १९५९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, वृत्तपत्रलेखक, आत्मचरित्रलेखक आणि नाट्यनिर्माते
कारकीर्दीचा काळ इ.स. १९१४-इ.स. १९५९
भाषा मराठी
प्रमुख नाटके पुण्यप्रभाव
राजसंन्यास
भावबंधन
पुरस्कार रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक
अपत्ये चित्तरंजन कोल्हटकर

चिंतामणराव गणेश कोल्हटकर (जन्म : मार्च १२ इ.स. १८९१ मृत्यू : नोव्हेंबर २३ इ.स. १९५९ ) हे मराठी गद्यनट आणि नाट्यनिर्माते होते.

बालपण

चिंतामणराव कोल्हटकर यांचे मूळ घराणे नेवरे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावचे होते. १२ मार्च इ.स. १८९१ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि उत्कृष्ट वक्ते होते. चिंतामणरावांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे चिंतामणरावांच्या शिक्षणाची आबाळच झाली. अभ्यास पुढे सरकेना. तेव्हा काही वर्षे त्यांनी पिढीजात शेतीचा व्यवसाय करून पाहिला.

कारकीर्द

त्यांना नाटकं वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत इ.स. १९११मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. इ.स. १९१४ मध्ये ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले आणि त्यांचा भाग्योदय झाला. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक विविध भूमिका पार पाडल्या. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका नंतर त्यांनी बलवंत नाटक मंडळीत प्रवेश केला.

चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके : पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. 'वेड्यांचा बाजार' हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

मराठी संगीत रंगभूमी जेव्हा घसरणीला लागली त्या सुमारास म्हणजे इ.स. १९३३ मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना(इ. स. १९४२) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. अखेरीस त्यांनी 'ललित कला कुंज' नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीने पु.ल. देशपांड्यांना उदयास आणले.

चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या 'माझे नाटककार' या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक इ. स. १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला

नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष

चिंतामणराव कोल्हटकर हे इ. स. १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते.

पुरस्कार

त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला.

चित्तरंजन कोल्हटकर हे गाजलेले नट चिंतामणरावांचे सुपुत्र होते. या नटाचे २३ नोव्हेंबर इ. स. १९५९ रोजी निधन झाले.