"दादोजी कोंडदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३४: ओळ ३४:


==वाद गुरूचा==
==वाद गुरूचा==
प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.[[बखर|बखरी]] या इतिहासाचे सहसा प्रमाण साधन स्रोत/पुरावा मानल्या जात नाहीत,परंतु, शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर,श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्वीजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन, छत्रपती शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतर ललितलेखन होताना शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवानी केलेल्या कारभारातून अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बर्‍याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेवहे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठेझाले असा समज पसरवणे हि महाराजांच्या इतिहासा विषयीची दिशाभूल असून अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व सुरवातीच्या काळात इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात असल्याची मांडणी [[ब्राह्मणेतर चळवळ]] <ref>http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा ज्योतीबा फुले यांचे त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांना पत्र महात्मा फुले समग्र वांघमय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०१११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.</ref> आणि [[संभाजी ब्रिगेड]] इत्यादी संस्थानी करून, दादोजी कोंडदेवांचे गुरू असल्याचे चुकी उल्लेख यापुढे वगळावेत असा आग्रह धरल्याचे दिसून येते.{{संदर्भ हवा}}
प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.[[बखर|बखरी]] या इतिहासाचे सहसा प्रमाण साधन स्रोत/पुरावा मानल्या जात नाहीत,परंतु, शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर,श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्वीजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन, छत्रपती शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतर ललितलेखन होताना शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवानी केलेल्या कारभारातून अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेवहे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठेझाले असा समज पसरवणे हि महाराजांच्या इतिहासा विषयीची दिशाभूल असून अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व सुरवातीच्या काळात इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात असल्याची मांडणी [[ब्राह्मणेतर चळवळ]] <ref>http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा ज्योतीबा फुले यांचे त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांना पत्र महात्मा फुले समग्र वांघमय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०१११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.</ref> आणि [[संभाजी ब्रिगेड]] इत्यादी संस्थानी करून, दादोजी कोंडदेवांचे गुरू असल्याचे चुकी उल्लेख यापुढे वगळावेत असा आग्रह धरल्याचे दिसून येते.{{संदर्भ हवा}}


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१६:०९, २२ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

दादोजी कोंडदेव (जन्म १५७७ ? मृत्यू १६४९) इ.स. १६३७ (वयाचे ६०वे वर्ष) ते १६४९ ( वयाचे बहात्तरावे वर्षी) मृत्यूपावेपर्यंत साधारण १२ वर्षे .[ संदर्भ हवा ] पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली .[१]. .दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय केवळ १७ वर्षे होते.[ संदर्भ हवा ]

बहूसंख्य इतिहासकार दादोजी कोंडदेवांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी भोसले यांचे चाकर मानतात, शहाजी भोसले यांचेकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेखात आढळत नाही,ते शहाजी भोसले यांचे चाकर नव्हतेच आदीलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील तो एक आदिलशहाने नेमलेला एक स्वतंत्र हुद्देदार प्रथम हवालदार आणि नंतर सुभेदार झाला असा नवीनतम प्रतिवाद आहे [२]

सुरवातीचे दिवस

इतिहासकार प्रा.यदुनाथ सरकारांच्या परंपरागत इतिहासकारांनी स्विकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंडभागातील Marathi देशस्थ ब्राह्मण कुटूंबातील आणि मुळचे पुण्याच्या सध्याच्या मौजे माळठण तालुका शिरूर येथील होते.[३] यांचे मुळ आडनाव गोजिवडे असे होते.पाटस परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते.दादोजी आणि भोसले कुटुंबाचे संबध फार पुर्वीचे होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटिकलकी मिळविली होती या गावांचा कुळकर्णी म्हणून काम दादोजी पहात असे. आदिलशाही मार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही होते.[४]

त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम सहसा नमुन दिलेल्या गावातील शेतसार्‍याचा हिशेब सांभाळण्याचे असे. त्यामुळे काही वेळा शेतसारा जमाकरण्याची जबाबदारीसुद्धा कुलकर्णी कुटूंबप्रमुखांना सांभाळावी लागे. [ संदर्भ हवा ]

नवीन प्रतिवादानुसार दादोजी गोचिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या,दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.[५] दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत शाहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता. त्याने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले होते व त्याची शिक्षा महाराजांनीच त्याला दिली. दादोजी कोंडदेवाने कारकून म्हणून आदिलशाहीची नोकरी पत्करली, नंतर तो हवालदार झाला, त्यानंतर सुभेदार होऊन अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आदिलशाहीची चाकरी केलेली आहे. त्यास सुभेदार करण्याचा अधिकार शाहाजी राजांचा नसून आदिलशाहाचा होता. येथे एक बाब स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, सन १६३२ ते १६३६ अखेर शाहाजीराजे हे निजामशाहाचे पूर्ण अखत्यार होते तर दादोजी कोंडदेव हा आदिलशाहीचा चाकर होता.

सुभेदारीची कारकिर्द

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.

चाकणपासून शिरवळ इंदपूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख व पश्चिमेस घाट उत्तरेस घोडनदी पुर्वेस भीमा दक्षीणेस नीरा असा प्रदेश शहाजीने आदिलशहा कडून जहागिरम्हणून मिळविला. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे,त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती असा परिस्थितीत त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून नेमणूक करून दिली.

निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इ.स.१६३० ते १६३१च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.१६३४ ते १६३६काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती.

सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत अमूलाग्र सुधारणा घडवून आणली.सुरक्षीतता उपलब्ध केली, निवाडे दिले,जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले.जमिनींची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यकत्या फेरबदला सकट सर्व जहागिरीत लागू केली.सारा पिकांच्या उत्पन्नावर निश्चित केला.शेती आणि बागईतीला उत्तेजन दिले.तगाईच्या स्वरूपात शेतकर्‍यांना आर्थीक मदत केली. शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला.

गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रातून तसेच बखरीतून आढळतात.[१].निवाडे देताना तो निष्पक्ष आणि न्यायी होता. जरब बसवताना त्याने एका कुलकर्णीस मृत्यूदंडही घडविल्याचे उल्लेख आढळतात.

शहाजी राजांचे कुटुंब आणि बाल शिवाजीराजे आणि दादोजींची स्वामीनिष्ठा

इ.स. १६३६ मधे जिजाई आणि शिवाजी राजे शिवनेरीवर असल्याचे उल्लेख आढळतात.शाजीने मोगलांशी केलेल्या तहामुळे शिवनेरी मोगलांच्याकडे गेला त्याच वेळी १९३७ च्या सुमारास आदिलशहाकडून पुणे परगण्याची जहागिर मिळाली असता शहाजीने जिजाई आणि शिवाजी राजे पुण्यात पाठविले व स्वतः कर्नाटकात बंगलोर येथे प्रस्थान केले. १६२७चा जन्म गृहित धरल्यास शिवाजी राजे त्यावेळी अवघे दहा वर्षांचे असावेत.दादोजी कोंडदेवाने जिजाई आणि शिवाजी राजे यांचे करिता बांधलेल्या लामहाल वाड्याची देखरेख केली. १६४०-१६४१ च्या सुमारास जिजाई आणि शिवाजी राजे शहाजी राजांच्या भेटीस बंगलोरास दादोजीचे सोबत गेल्याचे उल्लेख आढळतात.[ संदर्भ हवा ]

दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधवण्याची तजविज केल्याचे व शिवाजी माहाराजांचे नाव देण्याकरिता शिवापूर नावाची पेठ वसविल्याचे उल्लेख आढळतात. शहाजी राजे त्यांचे पुणे वतन व शहाजीराजेंच्या कुटूंबाशी ते स्वामीनिष्ठ होते व त्यांच्यास्वामीनिष्ठ सेवेबद्दल शहाजी व शिवाजी महराजांनी आदरपूर्ण उल्लेख केल्याचे ऐतिहासिक दस्तएवज आढळतात.परंतु प्रमाण ऐतिहासिक स्रोत कागद पत्रात ते कुठेही गुरू असल्याचे उल्लेख नाहीत.

ऐतीहासिक साधनातील उल्लेख

वाद गुरूचा

प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.बखरी या इतिहासाचे सहसा प्रमाण साधन स्रोत/पुरावा मानल्या जात नाहीत,परंतु, शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर,श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्वीजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन, छत्रपती शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतर ललितलेखन होताना शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवानी केलेल्या कारभारातून अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेवहे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठेझाले असा समज पसरवणे हि महाराजांच्या इतिहासा विषयीची दिशाभूल असून अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व सुरवातीच्या काळात इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात असल्याची मांडणी ब्राह्मणेतर चळवळ [६] आणि संभाजी ब्रिगेड इत्यादी संस्थानी करून, दादोजी कोंडदेवांचे गुरू असल्याचे चुकी उल्लेख यापुढे वगळावेत असा आग्रह धरल्याचे दिसून येते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  1. ^ a b अखिल भारतीय मराठी विकास परिषदेच्या अनियतकालिकातील पांडुरंग बलकवडे यांचा लेख "गुरूचा वाद कशाला"मधील संदर्भ
  2. ^ दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहीक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली
  3. ^ "Daund - Info". Pune Diary. 2006-11-25 रोजी पाहिले.
  4. ^ प्रा.यदुनाथ सरकार यांचे शिवाजी महाराज व शिवयूग या पुस्तकात लेखन प्रा.रा.ज्ञा. गायकवाड,प्रा.वा.शं.सूर्यवंशी,प्रा.विलास पाटील नी दिलेले संदर्भ (शिवयूगाचे निर्माते-पानक्रमांक ४० ते ४३) चे पुर्नप्रकाशन जसे अखिल भारतीय मराठा विकास परिषदेच्या अनियतकालीकात पान क्र. ४२वर आढळले तसे
  5. ^ http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm
  6. ^ http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा ज्योतीबा फुले यांचे त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांना पत्र महात्मा फुले समग्र वांघमय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०१११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.

नोंदी