"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fr:Shirdi
ओळ २९: ओळ २९:
==कसे जावे?==
==कसे जावे?==
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक कंपन्यांच्या खासगी बसेस उपलब्ध आहेत.

औरंगाबाद पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० किमी आहे तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबाद वरून रेल्वे सुद्धा उपलब्ध आहे. ती रेल्वे गुरुवारी सकाळी ४.३० वाजता असते
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक कंपन्यांच्या खासगी बसेस उपलब्ध आहेत.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१२:१२, ४ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

शिर्डी
जिल्हा अहमदनगर
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या २६,१६९
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२४२३
टपाल संकेतांक ४२३१०९
वाहन संकेतांक MH-१६
निर्वाचित प्रमुख सौ. अलकाताई शेजवळ
(नगराध्यक्षा)
प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत खोसे
(मुख्याधिकारी)


शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. हे गांव गावात असलेल्या साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.शिर्डी प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे. शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.

साईबाबा

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नन्तर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोंबर १९१९ रोजी बाबानी समाधी घेतली.

आज साईबाबांचे लाखो भक्त जगात आहेत. दर वर्षी मुंबईतील दादर ते शिर्डी अशी साईबाबांची पालखी निघते. जवळपास प्रत्यही ८००० ते १२००० साई भक्त साईबाबांच्या देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीस येतात.

कसे जावे?

शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे. शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक कंपन्यांच्या खासगी बसेस उपलब्ध आहेत. औरंगाबाद पासून शिर्डीचे अंतर साधारणपणे १६० किमी आहे तसेच शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबाद वरून रेल्वे सुद्धा उपलब्ध आहे. ती रेल्वे गुरुवारी सकाळी ४.३० वाजता असते

बाह्य दुवे