"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
छो →सुरुवात |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
== सुरुवात == |
== सुरुवात == |
||
मॅडम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली एका पारशी कुटुंबात झाला. मॅडम कामांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मॅडम कामांचे |
मॅडम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली एका पारशी कुटुंबात झाला. मॅडम कामांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मॅडम कामांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. श्री. कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते. |
||
== कार्य == |
== कार्य == |
२०:०९, १५ मे २०११ ची आवृत्ती
मॅडम भिकाजी कामा (१८६१ - १९ ऑगस्ट १९३६) या एक स्वातंत्रसंग्रामातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या मुळात एक फ़्रेन्च नागरिक होत्या.
सुरुवात
मॅडम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली एका पारशी कुटुंबात झाला. मॅडम कामांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मॅडम कामांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. श्री. कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.
कार्य
मॅडम कामा यांनी थोर समाजसेवक दादाभाई नौरोजी यांची सेक्रटरी म्हणून काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. मॅडम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तीवर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. १९०७ साली जर्मनीतल्या स्ट्रटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारांच्यावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मॅडम भिकाजी कामांनी साडी नेसून त्या परिषदेत भारतीय झेंडा घेऊन त्या लोकांना भारताबद्दल माहिती दिली.
मॅडम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा
मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे. तसेच ८ कमळाचे फुले भारताचे ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंदु मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते.