"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १४: ओळ १४:


==संदर्भ==
==संदर्भ==
'''कथा मुंबईच्या गिरणगावाची''' लेखन- ''नीरा आडारलर व मीना मेनन', मौज प्रकाशन ISBN 81-7486-649-3
'''कथा मुंबईच्या गिरणगावाची''', (२००७) लेखन- ''नीरा आडारलर व मीना मेनन'', मौज प्रकाशन, ISBN 81-7486-649-3


==संकेतस्थळ==
==संकेतस्थळ==

१८:०९, १० मे २००८ ची आवृत्ती


चित्र:United.JPG
हुतात्मा स्मारक,मुंबई

मुंबई आणि आणि बेळगांवसह महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याच्या हेतुने ही चळवळ् उभारली गेली.या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संयुक्‍त महाराष्ट्राकरिता मराठी माणसांनी प्रखर लढा दिला. त्याचा इतिहास गेली पन्नास वर्षे दाबला गेला. १०६ बळी घेऊन त्यावेळचे ५६ कोटी म्हणजे आताचे २१००० कोटी रूपये आणि नद्या देऊनसुध्दा संयुक्‍त महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्णच राहिले. स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकमान्य टिळक आणि गांधी प्रभृतींनी एकभाषिक राज्याची मागणी केल्यामुळे बंगाल, ओडिसा, बिहार अशी वेगळी राज्ये झाली. महाराष्ट्र राज्याच्या मागणीला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अखेरीस संयुक्‍त महाराष्ट्राची मागणी नेहरूंनी नाकारल्यामुळे चिंतामणराव देशमुखांसारख्या आंतरराष्ट्रीय विद्वान आणि अर्थतज्ञाने नेहरूंच्या मंत्रीमंडळातून २३ जानेवारी १९५६ रोजी अर्थमंत्रीपदाचा त्याग केला.

बंगालमधून बिहार आणि ओडिसा देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच वेगळे झाले होते.

१९०५ साली एकभाषिक असूनसुध्दा बंगाल प्रांताची लॉर्ड व्हाईसरॉय कर्झन याने धर्माच्या आधारावर फाळणी केली. महाराष्ट्राच्या लोकमान्य टिळकांनी कडाडून विरोध केला. फाळणी रद्द करण्यासाठी कैक लोक हुतात्मे झाले. १९१० साली बंगालची फाळणी रद्द झाली. लॉर्ड हार्डिंजने त्याच्या १९०९ च्या खलित्यामध्ये नमुद केले की, बिहा-यांसाठी बिहार या वादाचा उल्लेख करून बंगालपासून बिहारला वेगळे करावे लागेल, कारण बिहा-यांची बंगाल प्रांतात राहण्याची इच्छा नाही. मात्र तेच बिहारी त्यांना बंगालमधून वेगळे केल्यावर बिहारमधील ओडिसी लोकांची ओडिसा राज्याची मागणी मान्य करीत नव्हते. १९३० नंतर ओडिसा बंगाल राज्यापासून वेगळा करण्यात आला.

बाकीचे प्रांत मात्र...

पण बंगालचा अपवाद सोडला तर बाकीचे प्रांत तसेच बहुभाषी खिचडीचे राहिले. बलुची, पख्तुनी, पंजाबी या भाषांचा एक पंजाब इलाखा. सिंधी, गुजराथी, मराठी व काही कन्नड अशा चार भाषांचा मुंबई इलाखा. तेलुगु, तमिळ, काही मल्याळी कुर्गी व काही कन्नड अशा पाच भाषांचा मद्रास इलाखा तर व-हाड जोडून हिंदी मराठीचा एक इलाखा असे प्रांत इंग्रजांनी केले होते.

संदर्भ

कथा मुंबईच्या गिरणगावाची, (२००७) लेखन- नीरा आडारलर व मीना मेनन, मौज प्रकाशन, ISBN 81-7486-649-3

संकेतस्थळ

http://samyuktamaharashtra.org