"विनायक विश्वनाथ पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1665542 by कल्याणी कोतकर on 2019-02-12T09:45:34Z
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|अप्पा पेंडसे (पत्रकार)}}
{{गल्लत|अप्पा पेंडसे (पत्रकार)}}


डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९१६; मृत्यू : १९ ऑगस्ट, इ.स. १९८३) ) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.
डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९१६; - १९ ऑगस्ट, इ.स. १९८३) ) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.


स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.
स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.

०४:२२, २८ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९१६; - १९ ऑगस्ट, इ.स. १९८३) ) हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.

स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.

ब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते. त्यावेळी जुन्या आणि नव्या हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात सायमन कमिशनचा धिक्कार करणारा लांबलचक मोर्चा काढला होता. भारताचे भवितव्य ठरवणाऱ्या या कमिशनमध्ये एकही भारतीय का नसावा हा त्यांचा सवाल होता. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.

अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते; भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३०मधे ते सामील झाले. १९३२मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँड पथकात ते बॅँंड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणार्‍या भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने ते भारले गेले होते.

भारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात ज्ञान प्रबोधिनी नावाच्या शिक्षणसंस्थेची इ.स. १९६२ मध्ये स्थापना केली.

चरित्र

अप्पांच्या सहकारी डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.


(अपूर्ण)