"काळभैरवनाथ मंदिर (आगडगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
== बाह्यदुवा == |
== बाह्यदुवा == |
||
⚫ | |||
⚫ |
१४:०४, ९ मे २०२१ ची आवृत्ती
अहमदनगर पासून २० किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. छोटेच, पण टुमदार असं हे मंदिर आहे. त्यावर शिलालेख नाही. मात्र, मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे, असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम
केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. त्यांच्या नावांवरून याला दुजोरा मिळतो. आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत.
कालभैरव मंदिरातील सेवा
नित्य पूजा-विधी
उत्सव
भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी भव्य मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात. सर्वश्रुत आहे. ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्रीशंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली.काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात 10 काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, असे सांगितले जाते.
चित्रपट
देणगी'
दर्शनाची वेळ
अन्नदान
देवस्थान ट्रस्टने अन्नदानाचा उपक्रम सुरु केला. प्रत्येक रविवारी मोफत भरपूर जेवण दिले जाते. बाजरीची भाकरी, आमटी, कांदा, लिंबू, भात, मिरचीचा ठेचा असे या जेवणाचे स्वरूप असते.