"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
ओळ ८४: ओळ ८४:
===संकलकाचे निवेदन===
===संकलकाचे निवेदन===


आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये आहेत. कारण सह्याद्री मध्ये असणारे महादेव कोळी, यांची बोलीभाषा, देव, रूढी परंपरा, लग्न पद्धती, जन्म मृत्यू पद्धती या इतर कोळी लोकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत, आणि याच वेगळ्या असणाऱ्या बाबी त्यांना इतर कोळी या सबबी पासून अंतर दर्शवितात. याबद्दल कृपया आपण चुकीची माहिती पसरवू नये हि विनंती.
आदिवासी कोळी महादेव सह्याद्री पर्वतामध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात आहेत. सह्याद्रीमध्ये असणारे महादेव कोळी, यांची बोलीभाषा, देव, रूढी परंपरा, लग्न पद्धती, जन्म मृत्यू पद्धती स्थळ काळपरत्वे थोडयाफार फरकाने बदललेल्या आहेत असे कॅप्टन ए. मॅकिनटोश यांनी पुढील ओळीवरुन सुस्पष्ट‍ केले आहे. A number of Kolies from the Ballaghaut '''and''' the Mhadeo hills were assembled and taken to the deserted dwellings of the Goullies, and invited to occupy them and cultivate their fields. या वेगळ्या बाबी त्यांना इतर महादेव कोळी पासून अंतर दर्शवू शकत नाहीत. यामुळे महादेव कोळी जमातीबाबत कृपया आपण चुकीची माहिती पसरवू नये हि विनंती.


==उपजीविका व व्यवसाय==
==उपजीविका व व्यवसाय==

१०:११, ११ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

अहमदनगर जिल्ह्या मध्ये पण अदिवासी जमाती आहेत. या सर्व जमाती सहयाद्री च्या भागात जास्त आहेत.

वसतिस्थान

कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान

सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर नाशिक, ठाणे रायगड पालघर ह्याच जिल्ह्यामध्ये आहेत असे नाही. सखोल संशोधन न झाल्यामुळे हे आपल्या जमतीला ज्ञात नाही. हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते तसे बाँम्बे कर्नाटकामध्ये सुध्दा आढळते. यांना Aboriginal and hill tribe चा दर्जा 1950 पुर्वी होता.जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.


कोल्हापूर जिल्हयात आ‍दिवासी कोळी महादेव असल्याचे सबळ पुरावे :-


1.       भारत सरकारच्या कायदा व न्याय विभागाचे प्रधान सचिव मा. सुभाष चंद्र जैन यांनी संपादीत केलेल्या Adaptation of Laws Orders-2002, Part-2 हे राज्यघटनेतंर्गत जारी केलेल्या कायद्यांचे आदेश आणि नविन राज्यांच्या प्रादेशिक समायोजन व रचनांशी संबंधित अधिनियमांचे रुपातंर, या कायद्याच्या पुस्तकाच्या पान क्रं 223 वर स्पष्टपणे नमुद केले आहे की, "(a) 'backward tribes' means the Scheduled Tribes as defined in clause 25 of article 366 of the Constitution and, until a notification is issued under clause 1 of article 342 of the Constitution, the tribes specified in Part IV of the Thirtieth Schedule to the Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936" असे नमुद आहे.

2.       भारताचे गृह मंत्रालय तथा भारतीय सेन्सस विभागाचे सुप्रिटेडंट श्री A. H. Dracup यांच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या The Census of India-1941, Vol-III, Bombay Tables पान नंबर 85 वर, Tribe ची व्याख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे, The "tribes" means those castes declared as "backward tribes" under part II of the Thirteenth Schedule to the Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 dated 30th April 1936.  या 1936 च्या शासकिय आदेशाच्या अनुक्रमांक 12 वर Koli Mahadev या जमातीला Backward Tribe चा दर्जा दिलेला आहे. ब्रिटीश शासनाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेला 1936 चा हा आदेश 1937 मध्ये, "Orders in Council under the Government of India Act 1935" या शासकिय कायदे प्रसिध्द केलेल्या पुस्तकामध्ये पहावयाला मिळतो. या पुस्तकामध्ये पान नंबर 44 वर "Backward tribe" ची व्याख्या दिलेली आहे आणि पान क्रं 184 वर "Backward tribe" आदिवासींची यादी दिलेली आहे. (सदरचा कायदा पान नं. 27 पासून प्रसिध्द झाला आहे.) Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 dated 30.04.1936 प्रमाणे चंदगड (पेठा) तालुक्यात आढळणा-या Koli Mahadev जमातीची लोकसंख्या Census of India-1941, Vol-III, Bombay Tables च्या पान क्रं 121 वर "Tribes" म्हणूनच दर्शवली आहे. याचे कारण असे की, मुंबई राज्याच्या दिनांक 30.04.1936 च्या आदेशान्वये "Backward tribe" म्हणून जाहीर केलेल्या एकुण 24 जमातीपैकी, चंदगड तालुक्यामध्ये केवळ Koli Mahadev ही एकच जमात आढळते, त्यांचीच ही लोकसंख्या असून यांनाच 1941 च्या जनगणनेमध्ये Tribe चा दर्जा देण्यात आले आहे.

3.  मा श्री. ए. व्ही. ठक्कर (चेअरमन) यांनी, "अध्यक्ष अधिकृत हक्कांची सल्लागार समिती मुंबई" यांना दिनांक 18 ऑगष्ट 1947 रोजी CONSTITUENT ASSEMBLY OF INDIA, EXCLUDED AND PARTIALLY EXCLUDED AREAS SUB-COMMITTEE REPORT, VOLUME-I, सन-1947 चा अहवाल सरकारला सादर केला आहे. सदर अहवालाच्या पान क्रं. 23 वर मुंबई राज्यात एकुण 1614298/- आदिवासींची (Tribals) लोकसंख्या दर्शविण्यात आलेली असून पान क्रं. 25 वर या लोकसंख्येची जिल्हानिहाय विभागणी (आवडेवारी) नमुद केलेली आहे, यामध्ये अर्जदाराच्या तत्कालीन बाँम्बे कर्नाटका बेळगाव जिल्हयात 1674 आदिवासी लोकसंख्या दाखविण्यात आलेली आहे. या लोकसंख्येमध्ये अर्जदाराच्या चंदगड तालुक्यातील (पेठा) आदिवासी कोळी महादेव अनुसूचित जमातीची लोकसंख्या समाविष्ट‍ असल्याचे जनगणना-1941 च्या पान क्रं 121 वर पहावयास मिळते. याचाच अर्थ अर्जदाराचा चंदगड तालुका, पर्यायाने अर्जदाराचे गाव अंशत: वगळलेले क्षेत्र यामध्ये समाविष्ट होता, तसेच अर्जदाराच्या चंदगड तालुक्यात आदिवासी कोळी महादेव जमात पुर्वापार आहेत हे पुढील माहितीवरुन सुध्दा सुस्पष्ट होते. CENSUS OF INDIA_1961, Vol._X, MAHARASHTRA, PART_V-A, SC & STs in Maharashtra-Tables सन 1964 मध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये पान क्रं. 219 वर अनुसूचित जमातीची महाराष्ट्राची लोकसंख्या 23,97,159/- शासनाने दाखवलेली असून या अहवालाच्या पान क्रं. 220 वर विभागनिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखविणेत आलेली आहे, यामध्ये कोल्हापूर जिल्हयाची सन 1961 ची अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1518/- इतकी आहे. CENSUS OF INDIA_1961, DISTRICT CENSUS HANDBOOK KOLHAPUR सन 1964 च्या अहवालामध्ये सुध्दा पान क्रं. 104 वर राज्याचे विभाग व जिल्हानिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवणेत आलेली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्हयात 1518/- इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवणेत आलेली आहे. या अहवालामध्ये नमुद असलेल्या 1518 अनुसूचित जमाती लोकसंख्येपैकी अर्जदाराच्या चंदगड तालुक्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या 775 नमुद केलेली असून, पान क्रं. 70 वर अर्जदाराच्या चिंचणे-कामेवाडी या गावची अनुसूचित जमातीची लोकसंख्या 707 असल्याचे सुस्पष्टपणे नमुद आहे. याशिवाय GOVERNMENT OF BOMBAY, BELGAUM DISTRICT CENSUS HANDBOOK 1951 च्या अहवालात, मुंबई राज्याची भाषावार प्रांतरचना होण्यापुर्वी बेळगाव जिल्ह्यातील, बेळगाव/चंदगड तालुक्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या 864 दाखवलेली आहे.

4.  Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 dated 30.04.1936, Backward Tribe, Bombay, Part_2 मध्ये दर्शविलेल्या 24 जमातीपैकी Koli Mahadev जमात वगळता इतर कोणतीही अनुसूचित केलेली जमात चंदगड तालुक्यामध्ये आढळत नाही यासंबंधीची पुरावे पुढीलप्रमाणे आहेत. कारण, मा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प‍ कार्यालय घोडेगाव ता.आंबेगाव जि.पूणे यांचेकडील पत्र क्रं. शाआशा-102921/ प्रं.क्रं.1/ का.3(3)/ 2919 दिनांक 13.09.2001, मा. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने RTI अंतर्गत दिलेले पत्र क्रं. आसंप्रसं/ एक्षेविका/ का-4/ केंमाअ-2017/ 391 दिनांक 22 नोव्हेबंर 2017 आणि ग्रामपंचायत कामेवाडी गावसभा ठराव दिनांक 15.08.2014 व 26.01.2020 नुसार अर्जदाराच्या गावात फक्त आणि फक्त कोळी महादेव ही जमात आढळून येते. विशेषत: Census of India 1931, Vol.8, Part-2 of Bombay Presidency पान नंबर 422 ते 425 च्या दरम्यान दर्शविलेल्या Aboriginal & Hill Tribes जमातीपैकी, पान क्रं. 424 वर बेळगावच्या चंदगड महालातील 263 कोळी महादेव जमातीची लोकसंख्या बेळगावमध्ये विशेषत्वाने दर्शविलेली आहे, यांनाच Aboriginal & Hill Tribe OR Primitive Tribes चा दर्जा दिलेला आहे, याचे कारण असे आहे की, 01.11.1956 पुर्वी चंदगड महाल हा पुर्वी मुंबई प्रांतातील बेळगाव तालुका व जिल्हयाचा भाग होता, चंदगड तालुका सध्या 01.11.1956 पासून कोल्हापूर जिल्हयाचा भाग झालेला आहे, त्यामुळे 1961 च्या जनगणनेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या वाढलेली पहायला मिळते. Census of India 1931, Vol.8, Part-2 च्या सेन्ससमध्ये दर्शविलेल्या Aboriginal & hill tribes हेच आताचे चंदगड तालुक्यामधील काही Koli Mahadev Scheduled Tribe आहेत हे सन 1941 च्या सेन्सस रिपोर्टमधील पान क्रं. 121 नुसार दिसून येते.

The Belgaum District Census Handbook Report-1951 (Bombay Presidency) च्या पान क्रमांक 118 वर, बेळगाव आणि चंदगड पेठामधील अनुसूचित जमाती लोकसंख्या सन 1951 च्या जनगणनेमध्ये दर्शविलेली असून अनुसूचित जमातीची एकुण 864 लोकसंख्या नमुद आहे. ही लोकसंख्या चंदगड तालुक्यामधील चिंचणे-कामेवाडीचे असल्याचे या स्पष्टीकरणामधील पॅरा क्रं. 3 आणि 7 ते 10 वरुन सुस्पष्ट होते आणि चिंचणे-कामेवाडी गावातून कोळी महादेव या एकाच जमातीचे लोक राहतात हे पॅरा क्रं. 5 ते 8 प्रमाणे सुस्पष्ट होते. याचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे की, सन 1931 च्या जनगणनेमध्ये ज्या कोळी महादेव जमातीची Aboriginal & hill Tribe OR Primitive Tribe म्हणून गणना झालेली आहे, त्यांचीच 1941 च्या जनगणनेमध्ये Backward Tribe म्हणून गणना झालेली आहे व 1951 च्या जनगणनेमध्ये Scheduled Tribe म्हणून गणना झालेली आहे. अर्जदाराच्या तत्कालीन चंदगड पेठामध्ये 864 अनुसूचित जमाती लोकसंख्या सन 1951 मध्ये नमुद असून चंदगड तालुक्यामध्ये पुर्वापार अनुसूचित जमातीचे लोक वास्तव्य करतात हे यावरुन सुस्पष्ट होते.

5.       भारताच्या स्वातंञ्य प्राप्तीनंतर मा. राष्टपती महोदयांनी राज्याच्या राज्यप्रमुखाशी तथा गव्हर्नर साहेब यांच्याशी सल्लामसलत करुन, भारतीय संविधान अनुच्छेद-342 नुसार, THE CONSTITUTION SCHEDULED TRIBE ORDER, 1950 Dated 06.09.1950 अन्वये Aboriginal & Hill Tribes च्या लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे. चिंचणे-कामेवाडी मधील आम्ही सर्वजण समुहाने वंशपंरपंरागत संहयाद्रीच्या डोंगराळ भागात रहात असून Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 आणि मा. राष्टपती महोदयांच्या 06.09.1950 आणि 18.09.1976 च्या आदेशाप्रमाणे आम्ही कोळी महादेव अनुसूचित जमातीचे आहोत.

6.       Adaptation of Laws Orders-2002 आणि वरील Census 1931 & 1941 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील मौजे कामेवाडी, चिंचणे व कल्याणपूर चे लोक अनुसूचित जमातीचे आहेत हे सुस्प्ष्ट आहे, आणि स्थानिक माहितीनुसार यांची आडनावे व्हंकळी, डांगे, पाटील, मुत्नाळे, मोटूरे, शिरगे, आलोरी, नाईक, कुरणे, गुरव, गुंजगी आणि चिगरी अशी आहेत, यासंबंधी आदिवासी ग्राम पंचायत कामेवाडीचा दिनांक 26.01.2020 चा ठराव सोबत जोडलेला आहे.

7.  मुंबई राज्य आदिवासी जंगल कामगार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री व्ही. पी. वर्दे यांचेकडून दिनांक 30.11.1949 रोजी तत्कालीन ऑफीसिअल हिंदी भाषेत काढलेल्या परिपत्रकानुसार दिनांक 10 आणि 11.12.1949 रोजी महात्मा गांधी रोड मुंबई येथे होणा-या सर्व आदिवासी जंगल कामगार सहकारी सोसायटीच्या "Adivasi life Exhibition" करिता मौजे चिंचणे-कामेवाडी तालुका बेळगाव (सद्या चंदगड तालुका) येथील 5 आदिवासी प्रतिनिधींना आदिवासी साहित्य प्रदर्शनमध्ये सहभाग घेण्याकरिता (वस्तूसह) उपस्थित रहाणेसाठी निमंत्रित केलेचे परिपत्रक व तत्कालीन ठराव उपलब्ध आहे. सदर जंगल कामगार सहकारी सोसायटी चिंचणे-कामेवाडीचा नोंदणी क्रमांक P-523 of 1948 Dated 17th January 1948 असा आहे. या पुराव्याव्दारे मौजे चिंचणे-कामेवाडी तालुका बेळगाव येथे (सद्या चंदगड तालुका) पुर्वापार आदिवासी राहत असल्याचे स्पष्ट होत असून सदर जंगल कामगार सहकारी संस्था   स्थानिक आदिवासींच्या उन्नतीकरीता कार्यरत होत्या असे 1979 ते 1989 अखेर हजारो अनुसूचित जमातीची वैधता प्रमाणपत्रे वितरीत केलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे माजी अध्यक्ष तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे चे संचालक डॉ. गोविंद मोघाजी गारे साहेब यांनी सन 1974 मध्ये लिहिलेल्या संहयाद्रीतील आदिवासी महादेव कोळी या संदर्भ पुस्तकाच्या पान क्रं.188 आणि आदिवासी समस्या : विचार आणि विश्लेषण सन 1976 या संदर्भ पुस्तकाच्या पान क्रं.162 वर स्पष्टपणे नमुद आहे की, मुंबई राज्यात  जंगल कामगारांची चळवळ 1947 मध्ये सुरु झाली. या चळवळीचा उददेश, "खाजगी जंगल ठेकेदारांना सनदशीर मार्गाने दूर करुन, जंगल कामगार सहकारी सोसायटयामार्फत आदिवासी मजूरांना योग्य मजूरी मिळवून देणे, त्यांचा सर्वागीण विकास साधणे व आदिवासींमधून नवे नेतृत्व निर्माण करणे" हा होता. सदरची संस्था अर्जदाराच्या गावात होती. सदर संस्थेच्या माध्यमातून चिंचणे-कामेवाडी येथील स्थानिक आदिवासी हिरडा, कपिलपीठ, वायवडींग, डींक (Gum), टेंभूर्णीची पाने, करंजी-बी, मधमेन, बीब्बा ईत्यादी जंगलाशी संबंधीत पदार्थ गोळा करुन ते विकून उदरनिर्वाह करत होते [1994 SCC (6) 241] असे दिनांक 15 मार्च 1950 च्या पत्रावरुन सुस्पष्ट होते. याशिवाय कोळसा काढणे, शिकार करणे आणि पशूपालन करणे असे व्यवसाय आदिम करत होते. चिंचणे-कामेवाडी येथील जंगल कामगार सहकारी सोसायटीच्या सदस्यांची यादी यासोबत जोडली आहे, यामध्ये अर्जदाराचे वडील या संस्थेचे सदस्य असलेचे नमूद आहे, व अर्जदाराचे सख्खे काका यांना 1960 मध्ये महादेव कोळी जमातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. तसेच, अर्जदाराला 1981 मध्ये तत्कालीन सक्षम प्राधिकारी यांचेकडून कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.  

8.       चिंचणे कामेवाडी ही गावे महाराष्ट्राच्या संहयाद्री पर्वतातील डोंगराळ भागात वस्ती करुन राहिले आहेत याबाबत महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्रं. डोंगरी भाग क्षेत्र विकास-2009/ प्र.क्रं.6/ का.1483 मंत्रालय मुंबई-32 दिनांक 18 जानेवारी 2010 च्या, पेज नंबर 10 वर संपुर्ण चंदगड तालुका हा डोंगरी क्षेत्र म्हणून सुस्पष्टपणे जाहीर केलेला आहे. मौजे चिंचणे, कामेवाडी ही गावे संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रापैकी आहेत, यासबंधीचा दाखला मा. तहसिलदार सो चंदगड यांनी त्यांचेकडील पत्र दिनांक 09.12.1994 अन्वये श्री कृष्णा आप्पया पाटील रा. चिंचणे यांना आदा केलेला आहे, तो प्रकरणी जोडला आहे. तसेच अर्जदाराचे शिक्षण हे डोंगराळ भागात झाले असून, अर्जदार हा डोंगराळ भागात रहात असल्याचे सक्षम प्राधिकारी मा. तहसिलदार सो चंदगड यांचे दि. 30.7.2020 चा दाखला प्रकरणी हजर केला आहे.

भारतीय सर्वेअर जनरल ऑफ इंडिया ढेअराडून यांचेकडील टोपोग्राफीकल शिट क्रमांक 47L-8 आणि महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचेकडील गाव नमुना नं.7/12 गट नंबर 160, 502, 297, 298 आणि 299 प्रमाणे अर्जदाराची गावे मौजे चिंचणे, कामेवाडी ही 1933 पुर्वीपासून महाराष्ट्राच्या संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रापैकी आहेत हे सुस्पष्ट करतात. Government of Bombay, General Department, Resolution No. 9330 Bombay Castle dated 29th May 1933 च्या परिच्छेद-3 प्रमाणे, Such of them as live or did live, until recent times, in forest area should be shown as "Aboriginal and Hill Tribes" असे नमुद केले आहे. म्हणजे, जी जमात आतापर्यंत जंगली भागात राहते किंवा राहत होती अशा जमातीला "आदिवासी आणि डोंगरी जमात" संबोधावे असे या आदेशामध्ये म्हटले आहे आणि कोळी महादेव ही जमातीला Aboriginal and Hill Tribes च्या लिस्टमध्ये अनुक्रमांक 15 वर समाविष्ट केलेली आहे.

अर्जदार व त्याची संपुर्ण जमात ही महाराष्ट्राच्या संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रामध्ये आजअखेर राहत असून, ते सर्व डोंगरी क्षेत्राशी संबंधीत व्यवसायाशी निगडीत आहेत. तसेच कोळसा काढणे, शिकार करणे आणि शेती व पशूपालन करणे या आदिम व्यवसायाशी संबंधीत होते व आहेत. Kumari. Madhuri Patil 1994 SCC (6) 241, च्या परिच्छेद-5 प्रमाणे, महादेव कोळी ही जमात केवळ डोंगरी क्षेत्रात आढळते या तत्त्वाप्रमाणे अर्जदार व त्याची जमात आजही संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रात 1931 च्या पुर्वीपासून राहत असल्याने अर्जदाराच्या चिंचणे-कामेवाडी-कल्याणपूरच्या डोंगरी क्षेत्रात राहणा-या डोंगर कोळी/ महादेव कोळी जमातीच्या लोकांना Aboriginal & hill tribe चा दर्जा 1931 सेन्सस आणि 1933 च्या शासन निर्णयाव्दारे प्राप्त होते. तसेच, कायदा 108/1976 नुसार आम्हा लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा आहे. महाराष्ट्राच्या समुद्र किनारपटटी भागात आढळणारा आणि ST मध्ये समाविष्ट नसलेला व पुर्णत: मच्छीमार व्यवसाय करणारा आणि त्याच्यावरच उपजिविका करणारा कोळी OBC/SBC चिंचणे-कामेवाडीच्या जंगलामध्ये (रहात) नाही, त्यामुळे अर्जदार डोंगर कोळी/कोळी महादेव जमातीचा आहे.

9.       बॉम्बे लॅन्ड रेव्हयूनी कोड :-

(I)    The Bombay Land Revenue Code 1879 च्या पेज नंबर 172-173 वरील कलम 62 च्या परिच्छेद G.I नुसार कोळीसह अन्य जंगली (आदिवासी) जमातीं यांना The grantee shall not transfer it in any way to another person या तत्त्वानुसार ब्रिटीश सरकाने आम्हा आदिवांसीना तत्कालीन शासनाचे सरकार उपयोगी गाव नोकर (Village servants) म्हणून काम केल्याबद्दल "depressed classes" मधील अनुक्रमे-

(a)  Aboriginal and hill tribe

(b) Criminal tribes आणि

(c)  Untouchables यांना वंशपंरपरात जमिनी कसण्यासाठी बहाल केल्या आहेत असे Indian Franchise Committee-1932 (भारतीय विशेष हक्क कमिटी) Volume-I च्या अहवालात पान क्रमांक 108 आणि 123 वर स्पष्टपणे नमुद केले आहे.

(II) Bombay Land Alienation Register, Taluka Belgaum, सन 1890-91 च्या पान क्रमांक 170-175 मध्ये सरकार उपयोगी हलके गाव नोकर म्हणून काम केल्याबद्दल depressed classes मधील आम्हा अॅबॉरिजनल अँन्ड हिल्ल ट्राईब्ज् आदिवांसीना इनाम जमिनी ब्रिटीश सरकारने वंशपंरपरागतपणे बहाल केल्या आहेत. सदर 1890-91 च्या Land Alienation Register Belgaum प्रमाणे मौजे चिंचणे-कामेवाडी मधील आदिवासीं धारकांना जमिनी प्राप्त झाल्याचे पुरावे प्रकरणी सोबत जोडले आहेत.

(III) Government of Bombay, General Department Resolution No.1933 Bombay Castle dated 29th May 1933 नुसार वरील परिच्छेद "I" मधील अनुक्रमे

         अॅबॉरिजनल अँन्ड हिल्ल ट्राईब्ज्     मध्ये -  कोळीमहादेव

         अनटचेबल्स  (scheduled Caste)  मध्ये  -  कोळीढोर

……..या जमाती येतात असे दिनांक 29 मे 1933 आणि 23 एप्रिल 1942 च्या शासन आदेशामध्ये दर्शविण्यात आलेली आहे. तसेच, Notes on Criminal Classes in the Bombay Presidency-1908 मध्ये महादेवकोळी ही जमात क्रीमिनल ट्राईब्ज मध्ये दर्शविण्यात आली आहे. वरील पुराव्यानुसार मौजे चिंचणे व कामेवाडी येथील लोक हे अॅबॉरिजनल अँन्ड हिल्ल ट्राईब्ज् मधील कोळीमहादेव या अनुसूचित जमातीपैकीच आहेत.

10.       मुंबई राज्याचे सुप्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ श्री एम. ए. शेरींग व्दारा संशोधीत व लिखित "Hindu Tribes and Castes 1879" Vol-II, या पुस्तकाच्या पान क्रं.312 वर डोंगर कोळी ची व्याख्या DEFINITION दिलेली आहे. The term dungari evidently comes from dungar, a hill; and hence Kolis of the hills are sometimes called Dungari Kolis. येथे Dungari हा शब्द Dungar (डोंगर) या शब्दापासून आलेला आहे; म्हणून डोंगरी क्षेत्रामधील कोळी जमातीला काहीवेळेला डोंगर कोळी म्हणून संबोधतात. पुर्वी ब्रिटीश अधिकारी डोंगरासाठी Dungari, Dungar आणि Dongar असे शब्द अपभ्रवंशाने वापरत होते हे यामधुन दिसून येते. मुंबई राज्याचे सुप्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ श्री आर. ई. इंथोवेन (I.C.S.) व्दारा संशोधीत व लिखित पुस्तक The Tribes & Castes of Bombay-1920, Vol. No. I, Page-341 वर सुस्पष्टपणे नमुद केले आहे की, Dongar Koli is a Synonym name for Mahadev Koli tribe. डोंगर कोळी हे महादेव कोळी जमातीचेच दुसरे (टोपन) नाव आहे असे सुप्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ श्री आर. ई. इंथोवेन (I.C.S.) नमुद करतात. याचा अर्थ डोंगरकोळी हेच महादेव कोळी आहेत हे स्पष्ट आहे आणि हे महत्वपुर्ण संशोधन Start Committee-1930 आणि शासनाने सन 1967 मध्ये मान्य केले आहे. याशिवाय THE SC & ST ORDERS (AMENDMENT) ACT No. 108 of 1976 dated 18.09.1976 च्या अनुसूचित जमाती लिस्टमध्ये कोळीमहादेव व डोंगरकोळी यांना एकच अनुक्रमांक दिलेला आहे, या स्वतंत्र जमाती दर्शविलेल्या नाहीत. सबब संहयाद्रीच्या डोंगराळ भागात रहाणारे मौजे चिंचणे कामेवाडी चे लोक हे आदिवासी कोळी महादेव/डोंगर कोळी अनुसूचित जमातीचे आहेत हे सुस्पष्ट आहे.

11.       कॅप्टन ए. मॅकिनटोश, 27 वी मद्रास नेटीव्ह इन्फंट्री, कमांडींग पोलिस ऑफिसर व्दारा महादेव कोळी जमातीवर एक लेख लिहिलेला आहे. त्याचे नाव: "An Account of the tribe of Mhadeo Kolies-1836:38" असा आहे. हा केवळ अहमदनगर व नाशिक जिल्हयातील महादेव कोळी जमातीवर लिहिलेला सर्वात पहिला आणि महत्त्वपुर्ण लेख आहे. याचे प्रकाशन 1844 मध्ये झाले आहे. या लेखात पृष्ठ क्रमांक 237 वर स्पष्टपणे नमुद केले आहे की This account of the all Kolies having come from the Ballaghaut and Mhadeo hills. "बालाघाट आणि महादेव डोंगरांच्या टेकडयावरुन हे सर्व कोळी स्थलातंरीत होऊन आले आहेत." बालाघाट आणि महादेव डोंगरांगा दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकासह हैद्राबादच्या पश्चिम सरहद्दीवर पसरलेल्या आहेत. वरील अहवालातील पृष्ठ क्रमांक 266 वर हायलाईट केलेले वाक्य पुढीलप्रमाणे पुन्हा पुनर्मुद्रित झाले आहे.  A number of Kolies from the Ballaghaut and the Mhadeo hills were assembled and taken to the deserted dwellings of the Goullies, and invited to occupy them and cultivate their fields. बालाघाट आणि महादेव डोंगाराच्या टेकडयावरील असंख्य कोळीमहादेव या भागात पसरले आणि त्यांनी स्थानिक गवळी, कुणबी जमातीशी एकरुप झाले. डॉ. गोविंद गारे यांचेही तेच मत असून त्यांनी 1974 मध्ये लिहिलेल्या सहयाद्रीतील आदिवासी महादेव कोळी या पुस्तकात महादेव कोळी हे महादेव डोंगर रांगेतून आले असावेत, या डोंगर रांगेमुळेच महादेव कोळी असे नाव प्राप्त झाले आहे असे पान क्रं. 34 वर नमुद करतात. चिंचणे-कामेवाडीचे सर्व महादेव कोळी जमात बांधव महादेव डोंगरातून स्थलातंरीत आहेत व वेगवेगळ्या ठिकाणी भटकत चिंचणे-कामेवाडी येथे स्थाईक झाले आहेत हे हेळवी लोकांच्या दस्तावरुन स्पष्ट होते.

12.       सन 1951 मध्ये चंदगड तालुका मुंबई इलाख्याच्या बेळगाव तालुका व जिल्हयातच होता. The Belgaum District Census Handbook Report-1951 (Bombay Presidency) च्या पान क्रमांक 118 वर, बेळगाव आणि चंदगड पेठामधील अनुसूचित जमाती लोकसंख्या सन 1951 मध्ये दर्शविलेली असून अनुसूचित जमातीची एकुण 864 लोकसंख्या नमुद आहे. यावरुन चंदगड तालुक्यातील आम्हा लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा 1950 पासून आणि तत्पुर्वी aboriginal and hill tribe चा दर्जा प्राप्त आहे आणि आमची गणना/लोकसंख्या अनुसूचित जमातीमध्येच पुर्वापार आहे हे निर्विवाद सत्य आहे. चंदगड तालुक्याच्या विशिष्ट भागातच कोवाड सर्कल भागात समुहाने राहणा-या डोंगराळ भागातील चिंचणे, कामेवाडी, कल्याणपूर गावात महादेव कोळी हे अनुसूचित जमातीचे लोक पुर्वापार आहेत हे सुस्पष्ट‍ आहे.

13.       The Kolhapur District Census Handbook report 1961, च्या गावनिहाय यादीच्या अनुक्रमांक 70 वर मौजे चिंचणे-कामेवाडीची लोकसंख्या दर्शविण्यात आलेली असून 342 पुरुष व 365 महिला अनुसूचित जमातीचे दर्शविण्यात आलेली आहे. सन 1951 पेक्षा 1961 मध्ये कोल्हापूर जिल्हयाची अनुसूचित जमाती लोकसंख्या का वाढली? याचे स्पष्टीकरण देताना पान क्रं. 23 वर स्पष्टपणे नमुद केले आहे की,  "इ. स. 1951 च्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्हयात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 214 होती. ती 1961 मध्ये 1518 इतकी झाली. 1956 मध्ये चंदगड तालुका कोल्हापूर जिल्हयाला जोडल्यामुळे ही वाढ झाली". याचा अर्थ चंदगड तालुक्यात Scheduled Tribe चे लोक पुर्वापार राहतात हे सुस्पष्ट आहे. Census Report 1931 मधील Aboriginal and hill tribe आणि Census Report 1941 चंदगड पेठामधील Tribe ची म्हणजेच Backward Tribe ची लोकसंख्या विचारात घेता, चंदगड तालुक्यात केवळ आणि केवळ कोळी महादेव जमातीचे लोक पुर्वापार आहेत आणि ते अनुसूचित जमातीचेच आहेत हे यासोबत जोडलेल्या पुराव्याप्रमाणे सुस्पष्ट आहे.

"परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने Census Report 1961 मध्ये पान क्रमांक 70 वर चंदगड तालुक्यातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या दर्शवित असतांना कोळी महादेव अनुसूचित जमाती ऐवजी कोळी ढोर अनु. जमाती असे दर्शविण्यात आलेली आहे." परंतु वरील परिच्छेद 1 ते 11 मधील पुरावे विचारात घेता कोळी महादेव ऐवजी कोळी ढोर दाखवणे हा मानवी हस्तदोष आहे हे स्पष्ट होते. वरील दोन्ही जमाती अनुसूचित जमातीमध्ये असल्या तरी आम्ही कोळी महादेव जमातीचेच आहोत. कारण, 1961 पुर्वी चंदगड तालुक्यातील एकाही इसमाची नोंद कोळी ढोर अशी शालेय दप्तरी (नोंद) आढळत नसून, कोळी महादेव अशा नोंदी शालेय दप्तरी आढळतात., त्यामुळे चंदगड तालुक्यात केवळ आणि केवळ "कोळी ढोर" च्या ऐवजी "कोळी महादेव" अनुसूचित जमातीचे लोक 1931 चे पुर्वीपासून ते आजअखेर रहात आहेत हे सुस्पष्ट दिसत असल्याने अर्जदार कोळी महादेव जमातीचा आहे.

शिवाय, "कर्नाटक शासनाच्या वतीने Census Report 1961 मध्ये प्रसिध्द केलेल्या जातनिहाय जनगणना आकडेवारीमध्ये बेळगाव जिल्हयाच्या कोणत्याही तालुक्यात कोळी महादेव जमातीची लोकसंख्या दर्शविलेली नाही", त्यामुळे 1931, 1941, 1951 मध्ये दर्शविण्यात आलेली अनुसूचित जमातीची काही लोकसंख्या ही, केवळ आणि केवळ चंदगड तालुक्यातील कोळी महादेव जमातीची लोकसंख्या आहे, याशिवाय बेळगावमध्ये सुध्दा काही महादेव कोळी व काही ढोर कोळी आहेत.  

14.       The Kolhapur District Census Handbook report 1971 च्या पान क्रमांक 108 च्या अनुक्रमांक 93 वर चिंचणे-कामेवाडीमध्ये अनुसूचित जमातीचे 377 पुरुष आणि 365 स्त्रिया राहत असल्याचे दर्शविण्यात आले आहे आणि अनुक्रमांक 110 वर कल्याणपूर (कागणी) मध्ये अनुसूचित जमातीचे 104 पुरुष आणि 80 स्त्रिया राहत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. याप्रमाणेच सन 1981, 1991, 2001 आणि 2011 मध्ये चंदगड तालुक्यातील गावनिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या शासनाने दाखवलेली आहे. याचा अर्थ अर्जदार वा त्याचा जमातीसमुह 1976 चे क्षेत्रबंधन उठविलेचा कोणताही गैर-फायदा घेत नसून, मुळातच ते अनुसूचित जमातीचे आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार अर्जदाराच्या गावात 821 कोळी महादेव अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

15.       Ph.D. करीता शिवाजी विद्यापीठाकडे सादर केलेल्या "A Study of Social and Legal Dimensions of Atrocities against Scheduled Castes and Scheduled Tribes in Kolhapur District" या शोधप्रबंधामध्ये क्रमांक 6 वर Atrocities Against Scheduled Tribes By Caste Verification: Case Study Of Mahadeo Koli Tribe हे प्रकरण डॉ. मनोहर कोळी (कोल्हापूर) यांनी लिहिल्याने त्यांना शिवाजी विद्यापीठाने सन 2005 मध्ये Ph.D. प्रदान केले आहे. या शोधप्रबंधामध्ये डॉ. मनोहर कोळी यांनी चंदगड तालुक्यातील चिंचणे-कामेवाडी येथील आदिवासी महादेव कोळी जमातीची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. याशिवाय, श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडे Ph.D. करणारे श्री विठठल पाटील (कोल्हापूर) यांनी चंदगड तालुक्यातील चिंचणे-कामेवाडी येथील आदिवासी महादेव कोळी जमातीवर A Demographical Study Of Koli Mahadev Tribal Community In Chandgad Tahsil. या विषयावर Ph.D. चा शोधप्रबंध श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे सादर केल्याने त्यांना सन 2019 मध्ये विद्यापीठाने Ph.D. प्रदान केले आहे. या दोन्ही संशोधन प्रबंधाव्दारे चिंचणे-कामेवाडी चे जमात बांधव आदिवासी महादेव कोळी जमातीचे आहेत हे संशोधनाव्दारे सिध्द झाले आहे. शासनाने वरील दोन्ही Ph.D. च्या शोधप्रबंधाबददल सहमती दर्शवून ते मान्य केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयाच्या चंदगड तालुक्यातील चिंचणे कामेवाडी येथे आदिवासी महादेव कोळी जमातीचे लोक पुर्वापार आहेत हे दिसते.

16.      मा. तहसिलदार सो चंदगड यांचेकडील पत्र क्रं. जमिन/कावि/735/18 दिनांक 23.07.2018 अन्वये मौजे कामेवाडी येथील असलेल्या आदिवासी देव-देवता यांच्या भंग पावलेल्या मुर्तींचा पंचनामा करणेत आलेला असून, यामुधून गावात भैरोबा, वाघोबा, मसोबा, यल्लामा ईत्यादी आदिवासी    देव-देवता आहेत हे स्पष्ट होते. सदर देवता प्राचिन काळापासून आदिवासीमध्ये असल्याचे सुप्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ श्री आर. ई. इंथोवेन यांनी त्यांच्या The Tribes & Castes of Bombay-1922, Vol. No. II, Page-255 वर सुस्पष्टपणे नमुद केले आहे.


17.     वरील पुराव्यानुसार कोल्हापूर जिल्हयाच्या चंदगड तालुक्यातील चिंचणे कामेवाडी येथे आदिवासी महादेव कोळी जमातीचे लोक पुर्वापार आहेत हे दिसते.

संकलन व लेखन :- Mahadev Vhankali 9423279559

महादेव कोळी या जमातीचे वास्तव्य जास्त आणि मोजकेच आढळते अपवाद जे फक्त आपल राहत घर सोडून नोकरी करीता बाहेर गेले. तसे मूळ गाव सोडून कायमचे कोणीही स्थलांतरीत झालेच्या नोंदी बोटावर मोजन्या इतक्या आहेत. तरी देखील नामसदृश चा फायदा घेत बोगस लोकांनी शिक्षकांच्या झालेल्या चुकांचा फायदा घेत. सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आणि आदिवासी महादेव कोळी या शब्दांमध्ये गफलत करत बोगासांनी खऱ्या आदिवासींचे हक्क अडवले. नाशिक जिल्ह्याच्या जव्हार मोखाडा या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी ही जमात आढळून येते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील महादेव कोळी या जमातीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसते ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्र मध्ये कोळ्यांचे उठाव घडून आले 1828 ते 1848 या काळामध्ये कोळी समाजाने इंग्रजांच्या विरोधात उठाव केले या उठाव मध्ये इंग्रजांना हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत या उठावासाठी इंग्रजांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा स्टेट मधील राजे भगवंतराव नीलकंठराव पवार यांनी या काळामध्ये कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले व कोळ्यांचा उठावला मोठा पाठिंबाही दिला या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरसुल याठिकाणी महादेव कोळी जमातीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले दंगल घडवून आणली हे उठाव मोठ्या शर्तीने ब्रिटिशांना शमवावे लागले, मोडून काढावे लागले यावेळी या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या भगवंतराव निळकंठराव पवार यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली

Supplementary  Rule 8-  In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli.   Do not enter sub-divisions.    Thus you need not enter the kind of Koli or  Bhil such as  Chunvalya Koli or Patelia  Bhil, if the person enumerated states he is a Koli or  Bhil.

१९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होत नाही कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.

संकलकाचे निवेदन

आदिवासी कोळी महादेव सह्याद्री पर्वतामध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात आहेत. सह्याद्रीमध्ये असणारे महादेव कोळी, यांची बोलीभाषा, देव, रूढी परंपरा, लग्न पद्धती, जन्म मृत्यू पद्धती स्थळ व काळपरत्वे थोडयाफार फरकाने बदललेल्या आहेत असे कॅप्टन ए. मॅकिनटोश यांनी पुढील ओळीवरुन सुस्पष्ट‍ केले आहे. A number of Kolies from the Ballaghaut and the Mhadeo hills were assembled and taken to the deserted dwellings of the Goullies, and invited to occupy them and cultivate their fields. या वेगळ्या बाबी त्यांना इतर महादेव कोळी पासून अंतर दर्शवू शकत नाहीत. यामुळे महादेव कोळी जमातीबाबत कृपया आपण चुकीची माहिती पसरवू नये हि विनंती.

उपजीविका व व्यवसाय

महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[१] तसेच अकोले तालुक्यातील महादेव कोळी समाज देखील रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.

महादेव कोळ्यांच्या शिवनेरीवर झालेल्या संहाराचा

शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. [२]

संदर्भ

  • Transactions of the Bombay geographical Society
  • Ahmadnagar Gazetteer
  • The Tribes And castes of the Central Provinces of India
  • The Tribes And castes of Bombay
  • Report of the auxiliary And territorial forces committee.
  • The mahadev kolis
  • Imperial gazetteer of India
  • Census of India 1901
  • ठाणे गॅझेटीअर- 1882,
  • अहमदनगर गॅझेटीअर - 1881
  1. ^ http://www.loksatta.com/daily/20090428/opd03.htm
  2. ^ https://mr.wikipedia.org/s/183