"बारामती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७: ओळ २७:
==इतिहास==
==इतिहास==
बारामती शहर [[कऱ्हा नदी स|कऱ्हा नदी]]च्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संदर्भ critical Analysis of the Social Movement in Baramati Taluka, Minor Research project submitted to UGC Dece2015 by Dr D.A. More pp. 1 शिवकाळात बारामती तालुक्यातील
बारामती शहर [[कऱ्हा नदी स|कऱ्हा नदी]]च्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संदर्भ critical Analysis of the Social Movement in Baramati Taluka, Minor Research project submitted to UGC Dece2015 by Dr D.A. More pp. 1 शिवकाळात बारामती तालुक्यातील
सूपे परगणातील समावेश होता.सूपे परगणाचे प्रमुख संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई या शहाजीराजे यांची पत्नी.सुपे हि शहाजी भोसले यांची सासरवाडी होती . आजही सूपे गावात इतिहासाच्या खुणा सापडतात. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे .बारामती तालुक्यात साखर कारखाने सहकारी व खाजगी तत्वावर चालणारे आहेत .बारामती मधील एम आय डी सी ला चांगला नावलौकिक मिळालेला आहे .वेस्पा हि दुचाकी येथील प्रशिद्द गाडी आहे. बारामतीच्या औद्योगिक वसाहतीचा देखील मोठा विकास राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे झालेला आहे. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि लोकनेते म्हणून ज्यांना लोक मान्यता मिळालेली आहे. अशा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण बारामती तालुक्याचा कायापालट घडून आलेला आहे. कृषी, उद्योग, शेती पूरक व्यवसाय, सहकारी संस्था यांचं संपूर्ण जाळं तालुक्यांमध्ये निर्माण केलेल आहे. बारामती ला एक नियोजित शहर बनवण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावण्यात माननीय अजितदादा पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून कविवर्य मोरोपंत सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. या वाचनालयाचा लाभ बारामती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण विद्यार्थी, महिला तसेच मुले घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. बारामतीच्या भिगवण चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयाचा सर्वांना लाभ मिळतो.बारामती ग्रामीण भागात पाणी फौंडेशनचे काम सुनंदाताई पवार व राजेंद्र पवार यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात केले आहे . मुलींच्या शैक्षणिक, क्रीडा, शेती, उद्योग क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे .तसेच ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे .भीमथडी उत्सव भरवण्यात त्यांचा उल्लेखनीय सहभाग आसतो .बारामती परिसरातील साखर कारखाने उत्तम स्थितीत चालवण्यात पवार कुटुंबातील सदस्यांचा खूप मोठा सहभाग आहे .सध्या शिवशाही बस सुद्धा मोठ्या प्रमाणात बारामती शहरातून पुणे व इतर ठिकाणी जातात .
सूपे परगणातील समावेश होता.सूपे परगणाचे प्रमुख संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई या शहाजीराजे यांची पत्नी.सुपे हि शहाजी भोसले यांची सासरवाडी होती . आजही सूपे गावात इतिहासाच्या खुणा सापडतात. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे .बारामती तालुक्यात साखर कारखाने सहकारी व खाजगी तत्वावर चालणारे आहेत .बारामती मधील एम आय डी सी ला चांगला नावलौकिक मिळालेला आहे .वेस्पा हि दुचाकी येथील प्रशिद्द गाडी आहे. बारामतीच्या औद्योगिक वसाहतीचा देखील मोठा विकास राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे झालेला आहे. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि लोकनेते म्हणून ज्यांना लोक मान्यता मिळालेली आहे. अशा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण बारामती तालुक्याचा कायापालट घडून आलेला आहे. कृषी, उद्योग, शेती पूरक व्यवसाय, सहकारी संस्था यांचं संपूर्ण जाळं तालुक्यांमध्ये निर्माण केलेल आहे. बारामती ला एक नियोजित शहर बनवण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावण्यात माननीय अजितदादा पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून कविवर्य मोरोपंत सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. या वाचनालयाचा लाभ बारामती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण विद्यार्थी, महिला तसेच मुले घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. बारामतीच्या भिगवण चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयाचा सर्वांना लाभ मिळतो.बारामती ग्रामीण भागात पाणी फौंडेशनचे काम सुनंदाताई पवार व राजेंद्र पवार यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात केले आहे . मुलींच्या शैक्षणिक, क्रीडा, शेती, उद्योग क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे .तसेच ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे .भीमथडी उत्सव भरवण्यात त्यांचा उल्लेखनीय सहभाग आसतो .बारामती परिसरातील साखर कारखाने उत्तम स्थितीत चालवण्यात पवार कुटुंबातील सदस्यांचा खूप मोठा सहभाग आहे .सध्या शिवशाही बस सुद्धा मोठ्या प्रमाणात बारामती शहरातून पुणे व इतर ठिकाणी जातात . अशाप्रकारे एकूणच बारामतीच्या विकासामध्ये पवार कुटुंबीयांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे


==भूगोल==
==भूगोल==

१४:४२, २७ जुलै २०२० ची आवृत्ती

  ?बारामती

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ०९′ ००″ N, ७४° ३४′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५३८ मी
जिल्हा पुणे
तालुका/के बारामती
लोकसंख्या ५१,३४२ (२००१)
नगराध्यक्ष
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३१०२
• +०२११२
• एम. एच. ४२
संकेतस्थळ: http://www.baramatidiary.com

बारामती हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. इतिहासात हे नगर "भीमथडी" या नावाने प्रसिद्ध होते.साचा:संदर्भ हवा (criticle Analysis of the social movement in baramati taluka , minor research project submitted to ugc dece2015 by dr. D.A. More , pp. 1 ) कृषी हा बारामतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय असून ऊस, द्राक्षे व गहू ही येथील व्यापारी महत्त्वाची पिके आहेत. येथून मध्यपूर्वेत व युरोपात द्राक्षे व साखर निर्यात केली जाते.बारामती हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांचे जन्मगाव आहे. बारामती ला वैभवशाली अशी सामाजिक राजकीय व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे पूर्वीच्या भीमथडी म्हणून ओळखल्या गेलेल्या या शहराला आज एक वेगळा लौकिक प्राप्त झालेला आहे

इतिहास

बारामती शहर कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संदर्भ critical Analysis of the Social Movement in Baramati Taluka, Minor Research project submitted to UGC Dece2015 by Dr D.A. More pp. 1 शिवकाळात बारामती तालुक्यातील सूपे परगणातील समावेश होता.सूपे परगणाचे प्रमुख संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई या शहाजीराजे यांची पत्नी.सुपे हि शहाजी भोसले यांची सासरवाडी होती . आजही सूपे गावात इतिहासाच्या खुणा सापडतात. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे .बारामती तालुक्यात साखर कारखाने सहकारी व खाजगी तत्वावर चालणारे आहेत .बारामती मधील एम आय डी सी ला चांगला नावलौकिक मिळालेला आहे .वेस्पा हि दुचाकी येथील प्रशिद्द गाडी आहे. बारामतीच्या औद्योगिक वसाहतीचा देखील मोठा विकास राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे झालेला आहे. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि लोकनेते म्हणून ज्यांना लोक मान्यता मिळालेली आहे. अशा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण बारामती तालुक्याचा कायापालट घडून आलेला आहे. कृषी, उद्योग, शेती पूरक व्यवसाय, सहकारी संस्था यांचं संपूर्ण जाळं तालुक्यांमध्ये निर्माण केलेल आहे. बारामती ला एक नियोजित शहर बनवण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावण्यात माननीय अजितदादा पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून कविवर्य मोरोपंत सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. या वाचनालयाचा लाभ बारामती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण विद्यार्थी, महिला तसेच मुले घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. बारामतीच्या भिगवण चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयाचा सर्वांना लाभ मिळतो.बारामती ग्रामीण भागात पाणी फौंडेशनचे काम सुनंदाताई पवार व राजेंद्र पवार यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात केले आहे . मुलींच्या शैक्षणिक, क्रीडा, शेती, उद्योग क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे .तसेच ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे .भीमथडी उत्सव भरवण्यात त्यांचा उल्लेखनीय सहभाग आसतो .बारामती परिसरातील साखर कारखाने उत्तम स्थितीत चालवण्यात पवार कुटुंबातील सदस्यांचा खूप मोठा सहभाग आहे .सध्या शिवशाही बस सुद्धा मोठ्या प्रमाणात बारामती शहरातून पुणे व इतर ठिकाणी जातात . अशाप्रकारे एकूणच बारामतीच्या विकासामध्ये पवार कुटुंबीयांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे

भूगोल

बारामती तालुका दुष्काळी प्रदेश आहे. येथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु निरा डाव्या कालव्यामुळे बारामतीचा काही प्रदेश सिंचनाखाली आल्यामुळे तेथील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बारामती शहराला पिण्याचे पाणी याच कालव्यामधून शुद्ध करून दिले जाते. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथील उन्हाळाही कडक असतो. हिवाळ्यामध्ये येथील वातावरण छान असते. क-हा नदीमुळे बारामती शहराचे दोन भाग पडतात ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वहात जाते.हि नदी सासवड मधून बारामतीकडे येते. पुण्यापासून बारामती तालुका 110कि. मि. अंतरावर आहे.नीरा नदीचे पाणी बारामती तालुक्यातील बरयाच गावांना शेतीसाठी उपयुक्त झाले आहे त्यामुळे नीरा नदी किनार्यालगतचा शेती उद्दोग उत्तम चालतो.

अर्थव्यवस्था

निरा डाव्या कालाव्याच्या सिंचनामुळे बारामती तालुक्यातील पूर्वेकडील भागाने शेती उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. येथे मुख्यत्वे ऊस, गहू, मका इ. चे उत्पन्न घेतले जाते. काही ठिकाणी फळबागही आहेत. येथे पारंपारिक आणि आधुनिक या दोन्हीही प्रकारची शेती केली जाते. येथे ऊस पिकाचे भरघोस उत्पादन होत असून उसापासून साखर तयार करणारे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा भवानीनगर (इंदापूर) येथे स्थित असून बारामती आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यातील उसाचे गाळप या कारखान्यात केले जाते. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा माळेगाव येथे स्थित असून येथे साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीही केली जाते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर येथे स्थित आहे. या साखर कारखान्यांमुळे सभासद शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. हे साखर कारखाने येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्याचबरोबर येथे भाजीपाला, फळे इ. चेही उत्पादन घेतले जाते. येथील भाजीपाला पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो.

बारामतीचा पश्चिमेकडील भाग कमी पाऊस व सिंचनाच्या सोयीअभावी कोरडवाहू आहे. येथे फक्त पावसाळ्यात ज्वारी व बाजरीचे उत्पादन घेतले जाते. या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वाहन उद्योग, कापड उद्योग इ. चे कारखाने उभारण्यात आले आहेत. अलीकडे बारामती चे औद्योगिकिकरण झाल्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.तसेच शैक्शणिक संस्थामुळे देखिल अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतात.दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो .डायनामिक्स डेअरी व नंदन दुध प्रसिद्ध आहे .गोदरेज पशुखाद्य निर्मिती कारखाना येथे आहे .कॅडबरी कंपनीची किंडर जॉय हि येथील प्रसिद्ध चॉकलेट आहे . बारामतीमध्ये अजिंक्य बझार ,अजिंक्य बिग बझार,सिती मॉल, रिलायन्स मॉल, सुभद्रा मॉल यासारखे अनेक मॉल आहेत.या ठिकाणी बारामती जवळच्या अनेक गावातील लोक खेरिदीसाठी  येतात. चंदुकाका सराफ , ज्योतिचंद भाईचंद सराफ हि दोन मोठी सोने चांदीचे व्यापारी दुकाने आहेत.


  • ==वाह्तुक व दळणवळण==

बारामती मध्ये दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. बारामती महाराष्ट्रातील इतर तालुके व जिल्हे यांना पक्क्या आणि रुंद रस्त्यांनी जोडलेली आहे. बारामती रेल्वे मार्गाने दौंड रेल्वे जंक्शनला जोडलेली आहे. दौंड रेल्वे जंक्शन उत्तर भारत व दक्षिण भारतातील मुख्य शहरांना रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. बारामती ते दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे.

बारामती मध्ये विमानतळ आहे. त्यामुळे बारामती देशातील मुख्य शहरांना हवाईमार्गाने जोडली जाऊ शकते. बारामतीचे विमानतळ आहे (बारामती विमानतळ), जेथे सध्या विमान चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. बारामती  विमानतळ हे देशातील भावी विमानतळांपैकी एक मानले  जाते, मोठ्या विमानांची सोय करण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढविली जात आहे. आतापर्यंत, छोटी विमाने व्

आणि हेलिकॉप्टर उतरण्यास हे विमानतळ सक्षम आहे. हे विमानतळ बारामतीपासून  सुमारे 8 कि.मी. अंतरावर आहे व  बारामती औद्योगिक क्षेत्राच्या (एमआयडीसी) भागात वसलेले आहे[१].

बारामती पुणे प्रवास करण्यासाठी जलद बस सेवा (विना वाहक विना थांबा) दर अर्धा तास कालावधी मध्ये बस उपलब्ध आहेत त्यासाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध आहे.सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजे पर्यंत बस उपलब्ध आहेत. बारामती येथुन सातारा, कोल्हापूर, सांगली, भूम ,पंढरपूर ,मुंबई, तुळजापूर, धुळे ,औरंगाबाद ,जळगाव, सोलापुर, रावेर अशा लांब पल्ल्याच्या गाडी दररोज सोडल्या जातात.


  1. ==शिक्षण==

बारामती मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय अभिमत विद्यापीठ झाले आहे . , विद्यानगरी(विद्या प्रतिष्ठान) तसेच माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शारदाबाई पवार महिला महाविद्यालय गव्हमेंट वैद्यकीय महविद्यालय ही पाच महत्त्वाची महाविद्यालये आहेत. विविध जिल्ह्यातील तसेच परराज्यातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यावयास येतात. शिक्षणाच्या बाबतीत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, आरोग्य, संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान, कायदा, मनुष्यबळ विकास, कृषी, शास्त्र, वित्तसहाय्य, ॲनिमेशन , कला, वाणिज्य, डिझायनिंग, पाकशास्त्र, मानव्यशास्त्र, मुक्‍त शिक्षण अभ्यासक्रम यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा सरकारी, खासगी, एनजीओ यांच्याद्वारे उपलब्ध आहेत.कृषक प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरते महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शेतकरी येथे प्रदर्शन पाहण्यासाठी येतात .शारदाबाई पवार कृषी महाविद्यालय शारदानगर येथे असून अत्यंत प्रसिद्ध आहे .विदयानागरी येथे बायोटेक्नॉलॉजी कॉलेज नामांकित आहे .तसेच येथील इंजिनीअरिंग कॉलेज सुद्धा नामांकित आहे. विद्या प्रतिष्ठान इंगजी आणि मराठी मध्यमाच्या शाळा सुद्धा प्रसिद्ध आहेत.पोतदार इंटरनॅेशनल स्कूल येथे आहे.

शहरात एम.ई .एस. (महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी)[२] चे 100 वर्ष जुने  हायस्कूल आहे. स्वातंत्र्य सेनानी वासुदेव बळवंत फडके यांनी मार्च ३, १९११ रोजी स्थापन केलेल्या या शाळेने २०११ मध्ये १०० वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले. पाटस रस्त्याच्या मार्गावर श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, बारामती येथे श्री. शरद पवार यांनी आठवी इयत्तेत एक वर्षासाठी (1954-55) शिक्षण घेतले. श्री छत्रपती शाहू हायस्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज, बारामती १९४४ मध्ये पद्भूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी शाहू बोर्डिंग यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केले.

कृषी विकास प्रतिष्ठान, शारदानगर येथे मुलींसाठी समर्पित महाविद्यालय आहे. शारदानगर संकुलामध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, डे स्कूल, बेसिक ग्रॅज्युएशन, ज्युनियर कॉलेज, अ‍ॅग्री कॉलेज, बी.सी.ए, होम सायन्स, बी.व्होक.,औधोगिक प्रशिक्षण संस्था, शिक्षणशास्त्र महाविद्यालय इ. चा समावेश होतो.

के व्ही के ही शारदानगर येथे स्थित एक केंद्र सरकारची संस्था आहे, जी शेतकर्‍यांना शेती सुविधा व निदर्शने प्रदान करते. शारदानगरची  के. व्ही. के. प्रत्येक वर्षी कृषिक प्रदर्शनाचे आयोजन करते.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळ[३], शिवनगरची स्थापना 1972 मध्ये ग्रामीण भागातील मुलांना  पूर्व-प्राथमिक[४] ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केली गेली. हे प्रायोजित आहे मालेगाव सहकारी साखर कारखाना[५] लि. शिवनगर, ता. बारामती जि. पुणे यांचे .  मा.श्री.शरदचंद्रजी पवार[६] यांच्या दूरदृष्टी व गतिशील नेतृत्वात  येथील  शैक्षणिक संस्था चालवल्या जातात.  या  संकुलात  अभियांत्रिकी[७][८], फार्मसी [९][१०]आणि व्यवस्थापन[११][१२] मध्ये व्यावसायिक उच्च शिक्षण दिले जाते .

प्रेक्षणीय  स्थळे

  • कृषि विद्यान केंद्र कृषी पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे ( शारदानगर )
  • विद्या प्रतिष्ठान वस्तु संग्रहालय
  • सिद्धेश्वर मंदिर
 सिद्धेश्वर मंदीर - बारामती

बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते. औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. सन 1723 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.

  • काशीविश्वेश्वर मंदिर
  • पांढरीचा महादेव मंदिर
  • गणपती मंदिर सायली हिल् (एम.आय.डी.सी. बारामती)
  • माळावरची देवी मंदिर
  • पूनावाला गार्डन
  • श्री शिरसाई देवी (शिर्सुफळ)
  • श्री जानाई देवी (कटफळ)
  • मोरेश्वर मंदिर (मोरगाव)
  • स्वामी समर्थ मंदिर
           *  बारामतीचा सामाजिक इतिहास 

बारामतीतील सत्यशोधक समाज:- प्रस्तावना:- इंग्रजांच्याआगमनाने वंचित समाजालाआधुनिक शिक्षणाचीदरवाजे उघडली गेली. कायद्यापुढे सर्व समान, सर्वाना समान संधी वगैरे इंग्रजी तत्वामुळे शुद्रातिशूद्रांचा भाग्योदय उजाडला.हे इंग्रजी शिक्षण भलेही ख्रिस्तीप्रणीत का असेना,परतु ते मानवतावाद शिकविणारे होते. या शिक्षणामुळे ' समज' निर्मान झाली,म्हणून पुढील काळात महामानव क्रांतिबा फुले घडले.ज्योतिराव स्कॉंटीश मिशनच्या शाळेत शिकले. " पुण्यातील स्कॉंचम मिशन व सरकारी इंन्स्टिट्यूशन यांच्यामुळेच मला थोडेबहुत शहानपण प्राप्त होउन मनुष्यमात्राचेआधिकार कोणते हे समजले" ( संदर्भ :- धनजय किर, स. ग.मालसे, संपा. 'म. फुले समग्र वाड:मय' महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सं. मंडळ मुबई -प्रकाशित पान क्र. 264 ) असे स्वतःज्योतिराव फुले यांनीच नमुद करून ठेवले आहे. थॉंमस पेन या महान विद्वानाच्या लिखानाचा बराच मोठा प्रभाव त्याच्यांवर पडलेला दिसून येतो.थॉंमस पेन हे एकेश्वरवादी विचारवंत होते. त्यांचे ग्रंथ Right of the Man आणि Age of Reason हे फुलेंनी वाचले होते.विशेषत: Age of

Reason वाचून फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापन

करण्याचा निर्धार केला असे केळूस्करानी लिहिले आहे. ( संदर्भ:-उदघ्रूत डॉं. सदानंद मोरे" म. फुले यांचे राजकिय विचार, शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथील प्रसिद्ध- व्याख्यान1990")

        ज्योतिराव फुलेंनीआपल्या सहका-य़ाशी विचार विनिमय करून 24 सप्टे1873 रोजी सत्यशोधक 

समाजाची स्थापना केली. सत्यशोधक म्हणजे "सत्याचा शोध घेणारा " होय.( टिप : महेश जोशी नामक लेखकाने असे अनैतिहासिक विधान केले आहे की महात्मा फुलेच्या तोंडी सत्यशोधक आणि मानव धर्म, असे शब्द प्रयोग जे आढळतात तर त्या पैकी सत्यशोधक हा शब्द बाबा पदमनजी यांचेकडून आणि मानवधर्म हा शब्द दादोबा पांडूरंग तरखडकरांकडूनआलेले दिसतात - --सत्यशोधक समाजाचा इतिहास- प्रस्तावना खंड पान क्र . 218 खरेतर हे शब्द बुद्ध काळापासून विद्वानात रूड आहेत फुले तथागताचेचाहाते होते त्यांनी ते शब्दबुद्धाकडूनच घेतलेले असावेत काऱण त्यानी वज्रसूची हा बौद्ध ग्रंथ चाळला होता )

1) सत्यशोधक समाजाची तत्वे: -

       धर्म मानसा मानसात भेद करीत नाही. जे सत्य असेलतोच खरा धर्म होय.फुलेंनी राम ,क्रूष्ण गणपती 

सरस्वती वगैरेचे देवत्व नाकारलेआहे . याचा अर्थ त्यांनी ईश्वरसंकल्पना नाकारली असे नाही.विश्वनिर्मानकर्त्या शक्तीला त्यांनी"निर्मिक "असा शब्द वापरलेला दिसतो. (संदर्भ: - हरि नरके , संपा- म.फुले: शोधाच्या नवीन वाटा.- प्रकाशन म. फुले चरित्र साधनेप्रकाशन समिती महाराष्ट्र शासन , 3 जाने1998 पान क्र.70)

  फुलेच्या मते  " ज्या प्रमाने आई वडीलांची भेट घेण्यासाठी मुलाला मध्यस्थाची गरज नसते त्या प्रमाने

ईश्वराची प्रार्थना करण्यास भट-भिक्षूकांची गरज नसावी कोणतीही व्यक्ती आपला धार्मिकविधी स्वतःकरू शकते. धर्मातील दलाली करणारे धर्ममार्तंडआणि कर्मकांड याचा अतिरेक याला ज्योतिबांचा कडवा विरोध होता. म्हणुनच त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजाची तत्वे मोठी विचारपुर्वक ठरविली. ती खालील प्रमाणे-- 1) ईश्वर एक आहे आणि निर्गूण, निराकारआहे. 2) सर्व मानव ईश्वराची लेकरे आहेत सर्वांना भक्तीचा

      आधिकार आहे.

3) प्रत्येक मानवाला ईश्वराची प्राप्ती शक्य आहे त्यासाठी

    मध्यस्थाची (ब्राम्ह्णण पुरोहित वगैरेची ) गरज नाही.

4) मानसाचे श्रेष्ठत्व जन्मावर अवलंबुन नसून ते गुन- कर्मावर अवलंबून आहे. 5) कोणताही ग्रथ ईश्वर निर्मित नाही. ( संदर्भ:-डॉं. दिनेश मोरे - आधुनिक महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा इतिहास कैलाश प्रकाशन. औरंगाबाद 2006 पा.393 )

         वरील तत्वे फुलेनी सार्वजनिक  सत्यधर्म या ग्रथात

विस्ताराने दिली आहेत. 2) सत्यशोधक चळवळीचा विस्तार:-

               ज्योतीराव फुलेंनी आपल्या जीवन काळाच्या

अखेरच्या टप्यात सत्यशोधक चळवळीची निर्मिती करुन बहूजनांना त्यांचे पहिले संघटन मिळवुन दिले. फुलेनी त्यांच्या कार्यकाळात पुण्यात सत्यशोधकी तत्वे चांगलीच रूजविली, परंतु त्या चळवळीचा विस्तार त्यांना आपल्या

हयातीत मोठ्या प्रमाणात करता आला नाही. परंतु ही बहुजनांची पहीली चळवळ त्यांच्या नंतरच सर्व महाराष्ट्रात विस्तार पावली. प्रारंभी पुण्यात नतंर मुंबई 

आणि नगर, त्या नंतर सातारा, कोल्हापुर आणि मग संपुर्ण महाराष्ट्र या चळवळने व्यापला.

         " कोणत्याही महापुरूषाच्या विचाराला म्रूत्यूच काय प्रत्यक्ष काळ देखील मारू शकत नाही, हे कितीही खरे असले तरीदुसरे सत्य असे की महापुरूषांनाचकाय त्याच्या एकुन विचाराला मारून टाकण्याची ताकद शत्रू

पेक्षा त्यांच्याच अनुयायात असते " ( डॉं. दिनेश मोरे, सुधारकांचा सुधारक: क्रांतिबाफुले, प्रकाशन - के. एस. पब्ली. औरंगाबाद 2008 पान क्र. प्रास्तविक 2 )

       पण सुदैवाने ज्योतिरावांना प्रारंभीच्या काळात 

प्रमाणिक एकनिष्ठ पण कष्टाळू अनुयायी मिळाले त्यामुळे सत्यशोधक चळवळ फोफावू शकली. अ) स्वामी मारूतराव रामराव नवले :-

                इ. स.1882 च्या सुमारास स्वामी म्हणून गाजलेले फुलेंचे एक अनुयायी सत्यशोधक मारूतराव

रामराव नवले हे समाजाचे सदस्य झाल्यावर त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड्यापाड्या पर्यत चळवळ पोहचविली त्यंचे व्यक्तिमत्व आणि तत्व समजावुन सांगण्याची पद्धत इतकी प्रभावी होती की ग्रामीन भागातील लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी दुर दूरूनयेत असत. अतिशय कठीन काळात सत्यशोधक चळवळीला त्यांनी ऊर्जा मिळवून दिली. डॉं. गेल ऑंमव्हेट लिहीतात की " रा. नारायन मेघाजी लोखंडे इ. स.1897 च्या प्लेगमध्ये कालवश झाले,आणि त्यांच्या आश्रयाने चालणारे 'दिनबंधू 'हे वर्तमानपत्र तात्काळ बंद पडले.प्लेग, कॉंलरा या रोग राईची साथ टोळधाडीचा पिकांना उपद्रव,त्यानंतर जवळपास आठदहा वर्षे राहीलेला दुष्काळ

सत्यशोधक समाज थोडा विस्कळीत झाला. कार्यकर्त्या मडळीला चरितार्थासाठी इकडे-तिकडे पांगावे लागले त्यामुळे सत्यशेधक समाजाची वाताहात होउन एक प्रकारच्या उपेक्षांचे काळे ढग चळवळीवर घोंगावु लागले (टिप: या स्थिती विषयी लिहीतांना सुप्रसिद्ध तत्कालिन

सत्यशोधकी विचारवंत भास्करराव जाधव यांनी म्हटले

" .....या काळात सत्यशोधक समाजाचे पुण्यातील कार्य संपले होते म.फुल्यामची पुस्तकेही मिळत नव्हती. कशातही नियमितपणा नव्हता तत्वांचू स्पष्ट मांडणी नव्हती,आणि त्यामुळे अराजकी स्थिती निर्मान झाली होती."--- पहा ,'मी सत्यशोधक कसा झालो' )

    या काळात विरोधकांनी सत्यशोधक समाजा विऱूद्ध

प्रचार करावयास सुरूवात केली. गणपती उत्सव शिवजयंती या सारख्या उत्सवांचे हेतु बदलून आता "खोटा राष्ट्रवाद अडानी जनतेत भिनविलाआणि पुन्हा पेशवाई प्रस्थापित करण्याची भव्य योजना आखली." ( संदर्भ : -डॉं. गेल ऑंम्व्हेट,Cultural Revolt in Colonial Society. वासाहतिक समाजातील सांस्क्रूतिक बंड -अनुवाद, डि.पी. दिघे सुगावा प्रकाशन, 1995 पान क्र. 127-28 )

               ऐतिहासिक पातळीवरून पारंपारीक तत्का

लिन इतिहासकारांनी 'फुल्यांच्या म्रूत्यूनतंर सत्यशोधक समाजाची चळवळ संपली अशी विधाने प्रस्रूत केली. त्यंच्या योजनेत काही ब्राम्हणेतर स्वकिय देखील फसू लागले. अशा कठीन प्रसंगी स्वामी " मारूतरावांनी पुणे जिल्ह्यत अनेक ठिकानीभाषणे देउन लोकजाग्रूती करून पुन्हा सत्यशेधक समाजात प्राण ओतला. ते म्हणत की " हुरळली मेंढी लागली लांडग्याच्यामागे, या म्हणी प्रमाणे पुर्वी सत्यशोधक असलेलेअनेक लोक देशद्रोह्याच्या सापळ्यात सापडले, नंतर त्यांना आपण केलेली भयंकर चुक लक्षात आली. "(संदर्भ :- उपरोक्त , गेल ओम्हव्हेट पान क्र. 128 )

            अशा प्रकारची शब्द रचना करून मारोतराव यांनी काठावरच्या सत्यशोधक  म्हणविणा-य़ा लोकाना 

ताळ्यावर आणले.तेव्हा पुन्हा चळवळीत जोम भरला.

        इ.स.1884 नंतर सत्यशोधकी पद्धतीने शेकडो विवाह लावण्यात आले.विधवांचेही विवाह करण्यात आले. त्याचे आहवाल वेळोवेळी तत्कालीन वर्तमान

पत्रात आलेले दिसतात. " मारोतराव नवल्यांच्या चरित्रावरून असे स्पष्ट होते की या काळातील हालचालीची माहीती ' दिनबंधू' या सत्यशोधकी वर्तमान पत्राकडून समाजात मोठ्या प्रमाणात प्रस्रूत केली जात होती. इ. स. 1890 पर्यत हे पत्र स्वतःचे वर्णन "श्रमजीवी हितसंबधियांचे मुखपत्र"असे करावयास लागले होते.कदाचित असा द्रूष्टीकोन घेणारे ते पहीलेच व्रुत्तपत्र होते.( संदर्भ:- उपरोक्त ,गेल ओम्हव्हेट पान क्र.

129. ) या पत्रावरून  असेही दिसते की  " मारोतराव स्वामी केवळ सत्यशोधक समाजाचे तत्वे च सांगत होते असे नाही तर,त्यांनी बहुजन समाजात शिक्षणाचाही जोरदार प्रसार केला"परिणामी सासवडमध्येच मागासलेल्या जमातीतील विद्यार्थीसंख्या इतकी वाढली की सरकारी शाळातही मुलांना जागा पुरेना "(संदर्भ : - Dr D.  A More,  Critical Analysis of the Movement in Baramati Taluka-Minor Rearch project ,Submitted to  UGC  pp.  8. )

ब) भिमथडी (बारामती,इंदापूर) भागातील विस्तार:---पुणे जिल्ह्यातील विविध भागात सत्यशोधक विचारांचा प्रचार आणि प्रसार होत असतांना इंदापूर किंवाभीमथडी (बारामती ) आलिप्त राहूच शकत नव्हती . सासवडला या समाजाचे काम जोरात होते . त्याची धग इदापूर आणि बारामती परिसरीत येणे अपरिहार्यच होते.

        " पुणे जिल्ह्याच्याभीमथडी,इंदापुर तालुक्यात काही कट्टर सत्यशोधकी कार्यकर्ते  ब्राम्हणांचा जाच सहन करीत घट्टपणे उभे राहीलेले होते. त्यांना खरोखरच इ. स.

1912च्या सुमारास बारामती या भागातील प्रमुख गावी एक कार्यप्रवन मराठा पुढारी येईपर्यंत आणि परिषदा पुन्हा भरण्यास सुरूवात झाल्याने प्रोत्साहन मिळे पर्यंत हालचाल करणे अशक्य झाले होते. तरीही त्या नतंरच्या काळात बारामती पेक्षा खेडेगावातील शाखात सत्यशोधकांची हालचाल ज्यास्त झाल्याचे आढळते" (संदर्भ:- गेल ऑंम्हव्हेट , उपरोक्त पान क्र . 131 )

           पाचव्या परिषदेचा रिपोर्ट सांगतो की " इदापुर

तालुक्यातील 'खरोची ' सारख्या छोट्या गावात देखील सत्यशोधक समाजाचे कार्य चालू असल्याचे रेकॉंर्ड मिळते" (संदर्भ :- सत्यशोधक- पाचव्या पकिषदेचा रिपोर्ट सन 1915 ) इदापूर तालूक्याच्या सिमेवरील भागात भीमथडीचा प्रदेश मोडत होता ,म्हणून कधी कधी. भीम- थडी/बारामतीचा उल्लेख इंदापूर म्हणूनही येतो हे तत्कालीन कागदपत्रावरून दिसून येते.

            इ.स. 1880 साली बारामती तालूक्यातील

' स्वामीची चिंचोली या ठिकाणी शेतक-य़ाची पहिली सभा भरविली गेली होती. क्रूष्णराव पांडूरंग भालेकर

या सत्यशोधकीयांनी इ. स.1815. मध्ये 'दीनबंधू '-

सार्वजनिक सभा पुण्यातील सार्वजनिक सभेच्या विरोधात निर्मान केली होती " ( संदर्भ:- डॉं. एरंडे आशोक, सत्यशोधक मुकूंदराव पाटील ' दीनमित्र ' स्फुर्तीस्थान, अहमदनगर ,1996 पान क्र. 26) त्याचा फार मोठा आधार शेतकरी बहुजनवर्गाच होता.

  " बारामती भागात सत्यशोधक धायगुडे मास्तर 

कार्यरत होते ते खाटीक गल्लीत रहात असत तेथील सत्यशोधक गालिंदे (उद्धवराव इंगोले वकील यांचे मामा) हे देखील चळवळीचे काम करीत असत. या समाजाच्या दोन सभा ' दाने बाजारात' घेतल्या जात . जेथे दहा बारा लोक जमले की ही मंडळी सत्यशोधकी विचार सांगत ". ( संदर्भ :- स्वातंत्रसैनिक श्री. ऱणदिवे ( बारामती) यांची मुलाखत , दि. 23/2/2012 )

             इ.स. 1880 पर्यत सत्यशोधक समाजाची 

पाळेमुळे पुणे, मुबंई, ठाणे , अहमद नगर वगैरे जिल्ह्यतील काही भागआणि पुणे जिल्ह्याच्या सिमांवरील

चार तालुक्यात  (जुन्नर,खेड, पुरदर , इंदापुर-भीमथडी) 

चागंलीच रोवली गेली.या परिसरात सत्यशोधकांचे काम जोरात होते. सत्यशाेधकी पद्धतीने या भागात अनेक विवाह पार पडले. त्याचे अहवाल सत्यशोधक परिषदेत वाचले जात असत. " इ.स.1875 मध्ये बारामती भागात 'सोळा' धार्मिक विवाहविधी पार पडल्याचा अहवाल वाचला गेला " ( संदर्भ:- काडंगे राम , ' महा- महात्मा ज्योतिराव फुले:व्यक्ति व कार्य', राजश्री प्रकाशन , पान क्र.184-85 )

          या अहवालाच्या नोंदीत असे म्हटले गेले की

सत्यशोधकांना संदेश पोहचविण्यासाठी या वर्षात प्रचाराच्या ' तीन पद्धती ' वापरण्यात आल्या. त्या खालील प्रमाणे... 1) पुढा-यांची भाषणे. ( दौरे, व्रूत्तपत्रे, व पुस्तके 2) पोवाडे. ( तत्वविचार, व कार्यावर कवने ) 3) जलसे (तमाशा सारखा प्रकार पण तमाशा नाही )

  • सत्यशोधक केन्द्रे व लोक संख्या:-
*तालूका.         गाव/शहर.          लोकसंख्या.     .                                                          
                       .                      1921चा अहवाल         1) हवेली -        पूणे -                 1,63,713.             2,) हवेली -        घोरपडी -           पूणे शहराचा भाग  
3) हवेली-         हडपसर-            खेडेगाव.                4)   इदापूर-       खोरांची.-            खेडेगाव
 5)   इंदापूर-      वरकुट बु!!         खेडेगाव
  6)भिमथडी -     बारामती -          11,905                                                                                  
  7) भिमथडी-     वागज कडेपठार.   खे़डेगाव
   8)  पुरंदर -        सासवड.          5019 
    9) खेड -           खेड.              खेडेगाव

1921च्या अहवालानुसार बारामतीच्या आजूबाजूच्या गावांची माहीती वरील प्रमाणे आहे इ.स.1918 पर्यंत ब्राम्हेणेतर पुढा-यांनी पूणे ,अहमदनगर ,आकोला, आमरावती, कोल्हापूर वगैरे भागात व्यापक पाठींबा

मिळविला होता ( संदर्भ:- गेल ऑंम्हवेट पुर्वोक्त पान 117  )  .
*सत्यशोधकांच्या प्रचाराची पद्धत :-

सत्यशोधक चळवळचे तन्त्र या काळात फार अनोखे होते चळवळीचा प्रचार प्रथम छोट्या खेडेगावात 'मुळ' धरीत असे. आणि तेथून उभारी घेउन शहरातील ज्या म्रूतप्राय झालेल्या संघटना होत्या, त्यांचे पुनरूज्जीवन करीत असे . महादेव डोंगरे यांनी 1913 सालच्या तिस-या परिषदेच्याअहवालात लिहीले की , "माझे मित्र भास्करराव जाधव , श्री लठ्ठे आणिमी दौरे करतो आणि लोकांच्याभाषेत बोलतो, त्यांचे निरनिराळे प्रश्न समजाउन घेतो व त्याना मार्गदर्शन करतो. सुूवातीला जेव्हा आम्ही

सुसंस्क्रूत भाषेत बोलत  असू तेव्हा गावक-याना काहीही कळत नसे. परंतु केवळ आदर व्यक्त करण्याकरीता  ते

शांतपणे ऐकून घेत असत." प्रागतिक पक्ष, आणि वैयक्तिक. स्वराज्य " असले शब्द त्यांना कळत नसत. (संदर्भ: - सत्यशोधक समाज  : तिस-या परिषदेचा अहवाल: 1913 )

 *धार्मिक उपक्रम :- सत्यशोधकांच्या शपथेत सभासदानी
    "    सर्वांना समान मान द्यावा, आणि धार्मिक बाबतीत

पुरोहिताशिवाय कार्य करावे, एवढेच नाही तर त्यांनी आपल्या मुला - मुलींना शिक्षण द्यावे " असे जवळ जवळ सक्तीनेच सांगितले होते.( संदर्भ :- गेल ऑंमव्हेट पूर्वोक्त पान क्र. 152 )

              पारंपारीक धर्मविधीला फाटा देउन सत्यशोधकी पद्धतीने विधी करण्याचे प्रशिक्षण देखिल दिले जाउ लागले.  कर्जत विभागाकडे "...जेवरे मास्तर

हे धार्मिक विधी कसे करावेत हे सागंत असत. एकदा प्रात्यक्षित दाखवित आसतांना 24 अस्प्रूशांसह 200 लोक पहावयास हजर होते. ( संदर्भ : -दिनमित्र -दि. 7-8-1918 चा अंक, दिबी खेड्याबद्दलचा उल्लेख)

अशी दिनमित्र पत्रकातील बातमी आहे.                                        
              सत्यशोधक पद्धतीने प्रारंभीचे विवाह समारंभ

इ.स.1873. ते. 1874मध्ये माळी समाजातील फुलेंच्या नातेवाईकात, मित्रमंडळीत पार पडले. सत्यशोधक समाजाची स्थापनाझाल्या नंतरच्या पहील्या सन1873 मधील कार्तिक शुदध 12रोजी तुळशीचे लग्न आपल्याचघरी ब्राम्हणाविना लावले. या लग्नासाठी गंजपेठेतील व-हाड मंडळी आणि ज्योतिबांचे निकटवर्ती मित्रमंडळी उपस्थित होती.त्यात रामशेठ उरवणे, विठ्ठल राव कुढाळ, न्यान गिरीबाबा, कुेुशाबा माळी, पंडीत धोंडीराम, नामदेव कुंभार आणि तुकाराम पिंजन इत्यादी होय. (संदर्भ :-कांडगे राम , ' महा-महात्मा ज्योतीराव - --फुले : व्यक्ति व कार्ये ' राजश्री प्रका. पान क्र 183 )

               या लग्नाचे विशेष असा की लग्नविधीचे 
 पौरौहित्य स्वतः फुलेंनीच केले. त्यांनी तयार केलेली
 मंगलाष्टके जमलेल्या मंडळीनी म्हटली.त्याचा प्रभाव
 लोकांवर पडला. लोक गावोगावी फुलेंचे अनुकरण 
 करू लागले. 
        फुलेचे एक धाडसी कार्यकर्ते मारूतराव नवले 

यांनी ' सासवडच्या सभोवताली (भीमथडीच्या/ बारा- मतीच्या सीमेवर) तणावपुर्ण परिस्थिती असतांनाही फुलेंचे कार्ये चालूच ठेवले. इ.स. 1884 नंतर सत्यशोधक समाजाच्या वतीने ब्राम्हणाविना शेकडो विवाह आणि इतरही धार्मिक कार्ये पार पाडले. या कामाची दखल तत्कालिन वार्तापत्रकांनी घेतली नाही त्यामुळे. मोठ्या

प्रमाणात  लिखीत दस्ताऐवज मिळत नसला तरी त्या
वेळच्या कार्याचे विशेषत: विवाह समारंभाचे अहवाल
समाजाच्या वार्षिक परिषदेत वाचले जात असत.

सुदैवाने त्यातील बहुतेक अहवाल आज उपलब्ध आहेत. " 1915 साली भीमथडी/ बारामती भागात सोळा धार्मिकविधी झाल्याचे अहवाल वाचले गेले " (संदर्भ:- - गेल ऑंमव्हेट- पुर्वोक्त - 133)

   भीमथडी/बारामतीभागातील सामाजिक व धार्मिक
 उपक्रम मो्ठया प्रमाणात झाल्याचे जाणवतात. पण आगोदर सांगितल्या प्रमाणे खेड्यापाड्यातील सर्वच

बातम्या व्रूत्तपत्रातयेत नव्हत्या.

  • सत्यशोधकांवर खटले: - इ. स. 1916 साली सत्यशोधकाच्या प्रचारामुळे आणि शिकवणुकीमुळे

ब्राम्हण पुरोहितात मोठी खळबळ उडाली. त्याचे आर्थिक नुकसान होवू लागले. पारंपारिक नुकसानामुळे साहाजिकच त्यांनी एकत्र येउन कोर्टाचे दरवाजे ठोठावले

   इ.स. 1917  साली. चान्द्रे (कर्जत) येथे सेनाजी बाबर

पाटील यांच्या पुढाकाराने एका शेतक-याचा विवाह सत्य- शोधकी पद्धतीने लावला. (विना ब्राम्हण विवाह )तेव्हा आपल्या जोशीपणाच्या हक्कावर गदा आली असे म्हणुन एका ब्राम्हण पुरोहिताने कर्जत कोर्टात ' साडेचार आणे' दक्षिणा बुडाल्याचा दिवानी दावा दाखल केला.

        मुकूंदराव पाटील यांना हे व्रूत समजत्तच ते कर्जतकर सत्यशोधक मंडळीच्या मदतीस धावुन आले

या खटल्यात भास्करराव जाधव ,मुकूंदराव पाटील,

रा. व. डोंगरे यांची साक्ष झाली. त्यावेळी न्यायाधिश

कर्णिक हे प्रभू जातीचे होते. त्यानी विवाहकर्त्यात जोशी पुरोहिताचा हक्कभंग झाला असा ब्राम्हण पुरोहितांच्या बाजूने निर्णयदिला , तेव्हासत्यशोधक समाजाने अहमदनगरच्या वरिष्ठ कोर्टात आपील केले. त्या ठिकाणी साक्षी पुरावे याची छाननी होउन

12जाने 1919रोजी सत्यशोधक समाजाच्या बाजूने

निर्णय झाला. दोन्ही कोर्टात सत्यशोधक समाजाचा

झालेला खर्च ब्राम्हण पुरोहीताने भरून द्यावा असा 
हुकूम कोर्टाने दिला (संदर्भ :- डॉं एरंड  आशोक , 
"सत्यशोधक मुकूंदराव पाटील - दिनमित्र " स्फुर्ती प्रका. अहमद नगर 1996 पान क्र. 53  ) 
    या घटनेचा इष्ट परिणाम होउन सत्यशोधक  कार्य-
-कर्त्याला मोठा हुरूप चढला. कर्जतच्या सीमेवर इंदापुर
 भीमथडी/ बारामतीअसल्यामुळे या भागात वरील सर्व

घडामोडीचा प्रभाव पडून या परिसरात चळवळीला

विशेष जोर चढला.
  *सत्यशोधक चळवळ आणि शेतकरी :-
                सत्यशोधक चळवळीचा महत्त्वाचा घटक
गरिब शेतकरीवर्गच होता.त्यांची पिळवणूक तत्कालीन
 'शेटजी- भटजी-आणि सावकार या तीनही घटका-
 कडून होत होती. त्यामुळे या चळवळीने शोषितांची
 बाजू घेउन आदोलन उभे केले. शेतक-यांना त्यांच्या
शोषणाची  जाणिव  त्यांना करून दिली.त्यामुळे ह्या
वर्गात मोठी जाग्रूती आली.
      सत्यशोधक मुकूंदराव पाटील आपल्या वर्तमानपत्रात
लिहीतात की " शेतकरी दडपले गेले आहेत  काऱण ते तांत्रिक शिक्षणााबद्दल आडानी आहेत ते आपल्या मुलांना

शाळेत पाठविण्याऐवजी शेतात पाठवितात, कि जेथे ते. तेरावा बैल बनतात. आणि त्याचा परिणाम म्हणुन आज मारवाडी आणि ब्राम्हण तुमचे पीकघेतात बाजाराला पाठविण्यासाठी तुमच्या डोक्यावर भार देतातआणि लाखांनी मिळवितात." ( संदर्भ: - दिनमित्र, विचार किरण पान क्र 10 )

  गरिब आणि आडाणी शेतक-याची बाजू प्रामाणिकपणे
या सत्यशोधकीयांनी मांडलेली दिसते. " पुणे जिल्ह्यातील मुठा आणि नीरा नदीच्या काठावरील जमीनी

खंडाने घेणे अथवा विकत घेणे या प्रकारामुळेआमच्या शेतक-य़ाच्याशेतीमध्ये जी प्रगती झाली त्याचे मुख्य कारण सत्यशोधक समाज होय या बाबतीत आम्ही सहमत आहोतआणि हे मोकळेपणाने मान्यकरतांना आम्हाला आनंद होत आहे "( संदर्भ : - गेल ऑंमव्हेट ,

 पान क्र. 127 ) अशी प्रतिक्रिया एका तत्कालिन वर्त-
मान पत्राने दिली.
       सत्यशोधकांचे असे मत होते की एकीकडून दुष्काळातही सरकार. 'कर 'वसुलीचा आग्रह धरून 

शेतक-याला मेटाकुटीस आणित आहे,तर दुसरीकडून कर्ज वसूलीचे निमित्त करून सावकार शेतक-याची जमिन गिळक्रूत करीत आहेत.

   याच काळात गो-या साहेबांनी केलेल्या जबर ' सारा'

आकारणीच्या वाढीमुळेअणखीच दुर्दशा झाली. या परी-

-स्थितीचे वर्णन लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी
 देखील केले, ते असे " जो भाव पुर्वीच्या पहाणीत पाचसे
  रुपायांचा ठरला होता तो पस्तीसशे रूपायांवर चढला
   आणि शंभर रुपायांचाभाव सातशेवर गेला " ( संदर्भ:
  - लोकहितवादी ' ग्रामरचना ' - संपा- मा .प. मंगुडकर
     पान क्र. 61 ) अशा त-हेने शेतकरी सरकार आणि 
    सावकार यांच्याकडून नागवला जात होता.
  • दख्खनचे दंगे( 1875 )  :-
        19 व्या शतकाच्या उत्तरार्धात वारं वारं पडणा-या 
  दुष्काळाने भयंकर रूप धारण केले. इंदापूर तालुक्यात
   1871- 72 साली पाऊस कमी झाला त्यामुळे पीक
  जेमतेम आले . जुलैमध्ये इंदापुरातील वतनदार गोपाळ.      
  नरसिंग देशमुख यांनी. 2500 शेतक-यांच्या सह्यांचा 
  अर्ज मुंबई सरकारकडे पाठविला  (संदर्भ:-western
  India in Nineteenth Century,  1968  - by
  Ravines Kumar,  app.  169 )
  ' आपले हक्क सावकारांनी व सरकार यांनी हिरावुन
 घेतल्यामुळे आमची स्थिती भू-दासा सारखी झालेली
 आहे. अशा त-हेचे गा-हाने संबधित अर्जात  मांडलेले 
 होते. पण सरकारने या अर्जाकडे फारसे लक्ष दिले 
 नाही. त्यामुळे या भागातील शेतक-यात असंतोष 
वाढला.
          इंदापूर - भीमथडी याभागात पुर्वी सांगितल्या
 प्रमाणे सत्यशोधक चळवळीचा चांगलाच जोर होता. 
 त्यामुळे हे संघटीत शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात
 आले. " सुरूवातीला शेतक-यांनी गुजर- मारवाडी या
 सावकारांच्या विरूद्ध सामाजिक बहिष्काराचे हत्यार
 उपसले.  12  मे 1875 रोजी भिमथडी तालुक्यातील
 सुपे येथे. आंदोलकांनी वाण्यांची घरे व दुकाने लुटली.
 कर्ज देतांना सावकारांनी कागदपत्रावर शेतक-याचा

आगंठा घेतलेला असे. कागदावरील मजकूर शेतक-याला

 वाचता येत नसे त्यामुळे' कगदावर लिहिलेले असे एक आणि शेतक-याला वाचुन दाखविले जाई भलतेच, अशा 
 पद्धतीचे दस्ताऐवज न्यायालयात सादर करून सावकार
 शेतक-याची जमिनीवर कायद्याने जप्ती आणित असे.
          वरील सर्व प्रकारामुळे 1875 सालच्या दंगलीत
 शेतक-यांनी कर्जरोखे व दस्ताऐवज जाळण्यावर भर
 दिला . ब-या बोलाने असे कागदपत्रे ज्या सावकारांने
 दिले नाहीत त्या सावकाराला हे आंदोलक बदडून 
  काढीत .
       सुप्याला सुरू झालेल्या या शेतक-यांच्या दंग्याचे
 लोन लवकरच इंदापुर, पुरंदर, पारनेर, श्रीगोंदा वगैरे
 ठिकानी पोहचले (रविन्द्र कुमार उपरोक्त  पान 186 )
  भिमथडी सुप्यातील शेतक-यांनी पेटविलेले हे आंदो 
 - लन  वा-या सारखे पसरले पुणे , अहमद नगर, सोला
  पूर, या तीन जिल्ह्यात सावकारावर मोठी दहशत.   
  बसली. शेतक-यांनी उभ्या केलेल्या या पहील्याच
आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. 

इंग्लडच्या पार्लमेन्टमध्ये प्रश्न विचारले गेले. म्हणुन या आंदोलनाची शासकीय दप्तरात ' दख्खनचे दंगे' या नावाने नोंद आहे (संदर्भ: रविन्द्रकुमार उपरोक्त .पान.- 187 )

           सरअर्सिकन पेरी साहेबांनी या दंग्याची मिमांसा
 करतांना लिहिले की " सावकारांची शक्ती कामकरी 
लोकांपेक्षा जास्त वाढत आहे. दुसरे म्हणजे पिळवणुक
 खोटे दस्ताऐवज, व्यावहार आणि दडपशाही करण्यास 
 त्यांना प्रोत्साहन मिळते.  याची जबाबदारी आपल्या
 कार्यपद्धतीवर येउन पडते. आपल्या राज्यात आपण
 महसुलाची अशी पद्धती ठेवली आहे की त्यामुळे जमिनीची किंमत वाढली आहेआणि म्हणूनरयतेची कर्जे
 काढण्याची शक्ती वाढली कर्ज वसूलीसाठी सावकार दंड वापरीतअसे, किंवा कर्जदारास लाज वाटेल अशी परि
-स्थिती निर्मान होत असे . आता आपण  कायदे केले
  आहेत . सावकारास त्यामुळे मदत होते आणि कर्ज
 चुकविल्यास खटला  वगैरे होउन त्याना शिक्षा होते "
 (तळवळकर गोंविद- Virat Dnyani -just. Rande
   pp.  76 )
   इ. स.1875. च्या शेतक-याच्या असंतोषाची दखल
घेवुन इ. स.. 1879 साली 'कर्ज निवारण कायदा ' आणला त्यात 1882 साली अणखी सुधाऱणा झाली.
 कर्जाच्या पोटी सावकारांनी अनेक खेटे उद्य़ोग करुन
 शेतक-याच्या जमिनी लुबाडल्या होत्या त्यास शक्य 
 तितकाआळा बसावा म्हणुन हा कायदा शेतीच्या 
 हस्तांतराच्या प्रकरणाचा तपास करण्याचा आधिकार 

सरकारला देत होता ( तळवळकर गोंविद , उपरोक्त. पान क्र. 87 ) अशा त-हेने सत्यशोधकी विचारधारेतुन झालेल्या जाग्रूती

 चे फळ शेतक-यांनी मिळाले पण त्यासाठी फार मोठी 
किमंत चुकवावी लागली.
  • सत्यशोधकांचे शैक्षणिक योगदान :-

सत्यशोधकांच्या शपथेमध्ये आपल्या मुलांना- मुलींना

शिक्षण द्यावेअसे कलम होते (गेल आँमव्हेट - पुर्वोक्त पान क्र 152 )
  ज्या ठिकानी ब्राम्हणेत्तर शिक्षक असत तेथे रात्रीच्या
 शाळा , प्रौढ शिक्षणवर्ग, स्वतंन्त्रपणे काढले. कर्जत
कडील बातमी सांगताना  दिनमित्रकार लिहीतात 

" निमळकर पाटील वगैरे उत्साही कार्यकर्ते आहेत.त्यानी

 24 मुले व काही मोठी माणसे घेउन सत्यशोधक रात्रीची
 शाळा  काढली. जाधव मास्तर संपुर्ण सत्यशोधकी आहेत आणि त्यांऩीसत्य शोधकी पदेही लिहिलेली आहेत
 (दिन मित्रकार - 7/8/1918 --कर्जतच्या दिबी खेड्याबद्दलचा  उल्लेख ' ) 
 सत्यशोधकांनी शिक्षणाला अतिशय महत्व देउन , 
कित्येक गावी बोर्डीग उभ्या केल्या आणि शेकडो 

बहूजनांच्या विद्य़ार्थाना त्याचा फायदा झाला.

*बारामतीतील बोर्डींग : -
  "दिनमित्रात खेड तालुक्यातील बोर्डींग संबधाने लिहुन
 आले की येथे काम जोरात चालू आहे .लोकांनीसंस्थेकरीता पैसे व धान्य जमा करण्यास
सुरुवात केली आहे. विद्यार्थी बोर्डीमध्ये येत आहेत .
 परंतू  ब्राम्हणाांना त्याचा जाच वाटतो " (दिनमित्र -  
 2 आँगस्ट 1911)
      बारामतीमध्ये "देवी अहिल्या बोर्डीग " संघटित केले
 त्याचे उदघाटन. 24 फेब्रूवारी 1924रोजी  होउन त्याला
 बरीच मोठ-मोठी मंडळी हजर होती. इंदोरच्या महाराजा
 च्याआर्थिक पाठींब्यावरहे बोर्डीग उभे राहीले सदरील 
 बोर्डीग जरी धनगराकरीता असले तरी त्यामध्ये अस्प्रूश्यांनादेखील प्रवेश दिले जात होते " (गेल -
आँमव्हेट - पुर्वोक्त पान क्र. 175 तळ टिपेत )
 बारामतीत हा एक उदारमतवादी प्रयत्न होता .
 भीमथडीतील हे देवी अहिल्या बोर्डीग शाम थिएटर
 रोडवर  होते.(आज तेथे व्ही.पी. ची भव्य इमारत आहे)
 या बोर्डीगला डाँ बाबासाहेब आबेडकरांनी 500. रु. ची
 आर्थिक मदत केली होती ( संदर्भ :-Dr More D.  A. 
 Critical Analysis of the Social Movements 
 in Baramati Talks.   app.  17 )
    श्री.धायगुडे हे या बोर्डीगचे सर्व व्यवस्थापन पहात
 होते . पण पुढे त्याच्या कार्याकडे बारामतीतील काही
 सधन मंडळी संशयाने पाहू लागले. धायगुडे मास्तर हे 
 स्वत: धनगर समाजाचे होते त्यांनी येथील एका मराठा समाजातील महीलेशी विवाह केला . तेव्हा मात्र येथील 
 सधन मंडळीनी  बोर्डीगचा लगेच पाठिंबा काढून घेतला.
 म्हणुन काही दिवसातच बोर्डीग कोसळले. बारामतीत
 सत्यशोधकांच्या शैक्षणिक वाटचालीला काही काळ 
 खिळ बसली. 
  • बारामतीतील सत्यशोधकी परीषदा :-
 भिमथडी/बारामतीभागात सत्यशोधक चळवळीच्या 
 अंतर्गत विविध बहुजन जातींच्या संघटना बांधण्याचे
 प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने धनगरांची संख्या लक्ष-
 णिय होती. मेंढपाळ या व्यवसायामुळे बहूतेक धनगर 
 जमला- जमवीच्या द्रूष्टीने अतिशय विखुरलेले होते 
 म्हणुन ते काम अवघड असे. पण पहीला धनगरांना
 सघटीत करण्याचा प्रयत्न नाशिकच्या खाटीक 
 धनगरांनी केला.आपला स्वत:चा विकास आणि व्यापक 
 धनगर एकजूट या उद्देशाने त्यांनी 'क्षत्रिय मराठा धनगर
 संघ ' स्थापण केला .ही गोष्ट सत्यशोधक विचारांच्या 
 प्रभावामुळेच शक्य झाली. 
 1. बारामतीत हरी पिराजी धायगुडे हे त्या काळातील
      एक सुशिक्षित आणि सुधारणावादी धनगर नेते
       होते .त्यांनी या भागात खाटीक मंडळीच्या सुधार-
       णावादी प्रयत्नांना भक्कम पाठिंबा दिला " बारा-
        मतीत सत्यशोधक चळवळीत खाटीक समाजाचे
        अँड. उद्धवराव इंगुले यांचे मामा श्री गालिंदे, जाना
         साहेब ढाकाळकर, पणदरेकर जगताप आणि
         इतरही अनेकजन  सत्यशोधक चळवळीत कार्य-
         रत हेते." ( संदर्भ: श्री ऱणदिवे बाबा -वय 95 यांची
         मुलाखत दि. 23/3/2010 ) हरी धायगुडे यांनी
         'पुणे जिल्हा धनगर परिषदा ' 1925, 1932, व
         1939साली आयोजित केल्या होत्या. धायगुडे 
         या परिषदांचे चिटणिस होते. ( संदर्भ: गेल आँम-
         व्हेट पुर्वोक्त- पान क्र. 175 तळटिपेत )
       ग्रामीन भागात काम करीत असतांना हरी धायगुडे
      यांनाअनेक धोके जानवत होते. जरी ते  आपल्या
     जमातीचे मान्यता प्राप्त नेते होते तरी बारामती
     परीसरातील सर्वच धनगरांचा त्यांना पुर्णत: पाठींबा
    होता असे दिसत नाही. 
         सधन असलेली धनगर मंडळी त्यांच्या सत्यशो-
        धकी हालचालीकडे संशयाने पहात होती. डाँ. के.
        एल. कोल्हटकर यांच्यामते " सधन धनगर मंडळी
        हरी पिराजी धायगुडे यांना पाठींबा देण्यास तयारच 
       नव्हते, परंतु बारामती भीमथडी परीसरातील गोर-
      गरीब धनगर समाज त्यांच्या बरोबर होता. त्या 
      शिवाय य़ेथील दलित - महार समाज तसेच गुजर व
      इतरांचा मोठ्या प्रमाणात त्यांना पाठींबा होता.
     कारण सरकारी आधिका-य़ांशी संबधित कामात 
    त्यांना धायगुडे मदत करीत असत. ( संदर्भ: डाँ. गेल-
    आँमव्हेट , उपरोक्त, पान क्र. 175 )

2. इ. स. 1931च्या शिरगणती नुसार" पांचाळ अथवा

   विश्व ब्राम्हण  ' यांना पुढारलेल्या वर्गात घातले होते. 
  आणि त्यात पाच जातींचा समावेश आहे असे म्हटले
  गेले, पण सुतार , लोहार, आणि कासार यांना स्वतंत्र-
 पणे 'मध्यम जातीत' दाखविले होते  स्वत:स दैवद्न -
 ब्राम्हण म्हणवुन घेणारे सोनार यांना पुन्हा स्वतत्रपणे 
पुढारलेले म्हणुन दाखविले होते. या पध्दतिने सर्व शिर-
गणतीची नोंदनीझाली. इ. स. 1932 बारामतीत विश्व-
ब्राम्हण परीषद झाल्याची नोंद आहे. ( डाँ. गेल , पुर्वोक्त
पान क्र. 174 ) 
    सत्यशोधक चळवळीने जातीय संघटन मजबुत कर-
    ण्यास वातावरण निर्माण केलेले दिसते. सत्यशोधक चळवळीचा आधार तळागळाचे लोक असल्यामुळे 
अस्प्रूशतेची धग कमी झालेली होती. " सर्व मराठा 
हाँटेल्स , मराठेतर संबधित जातियांना खुली असत, 

आणि त्यापैकी बरीच अस्प्रूशांनाही तिस-या दशकात

खुली झालेली होती. नाशिकचे मराठा हाँटेल्स, बारामतीचे धनगर हाँटेल्स पुण्याचे मराठा फ्रीबोर्डीग

साता-याचे रयत शिक्षणसंस्थेचे बोर्डीग या सर्वामध्ये अस्प्रूश्य विद्या्र्थीहोते ( डाँ गेल आँमव्हेट उपरोक्त -

पान क्र 127)    
*सत्यशोधक जलसे:- 
     











  1. ^ "Baramati". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-10-13.
  2. ^ "Bhaurao Patil". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-30.
  3. ^ "Shivnagar Vidya Prasarak Mandal". svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  4. ^ "SHIVNAGAR VIDYA PRASARAK MANDAL'S ENGLISH MEDIUM SCHOOL, MALEGAON (BK)". ems.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  5. ^ "दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना". www.malegaonsugar.com. 2020-01-25 रोजी पाहिले.
  6. ^ "Sharad Pawar". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-18.
  7. ^ "College Of Engineering, Malegaon (Bk)". engg.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  8. ^ "Institute of Technology And Engineering Malegaon (Bk)". ite.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  9. ^ "College of Pharmacy, Malegaon (Bk)". pharmacy.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  10. ^ "Institute of Pharmacy, Malegaon (Bk)". iop.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  11. ^ "The Institute of Management, Malegaon". mgmt.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.
  12. ^ "College of Commerce Science And Computer Education, Malegaon (Bk)". ccsce.svpm.org.in. 2020-01-25 रोजी पाहिले.