"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
(काही फरक नाही)

१७:५२, २ जुलै २०२० ची आवृत्ती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
ब्रीदवाक्य अंतरी पेटवू ज्ञानज्योत।
Campus शहरी, ६५०एकर




या विद्यापीठाची स्थापना १९९० साली झाली. जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात येतात.[१]विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे करण्यात आले आहे. विद्यापीठ परिसर हा जळगावपासून ८ कि.मी अंतरावर आहे आणि आशिया महामार्ग क्र. ४६ पासून दीड किमी अंतरावर आहे. गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशातील हे क्षेत्र ६५० एकर (२.७ चौरस किमी ) विस्तारलेले आहे.

मुख्य प्रशासकीय इमारत

अध्यासने

  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
  • विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्रे सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.


संदर्भ

  1. ^ "विद्यापिठ संकेतस्थळ". विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ. १५ मार्च २०१९ रोजी पाहिले.