"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
{{संदर्भहीन लेख}}

{{माहितीचौकट व्यक्ती
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चौकट_रुंदी =
ओळ ९: ओळ १०:
| चित्रशीर्षक_पर्याय =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = [[जानेवारी २३]],[[इ.स. १९२६]]
| जन्म_दिनांक = [[जानेवारी २३]], [[इ.स. १९२६]]
| जन्म_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| जन्म_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]
| मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]
ओळ १५: ओळ १६:
| मृत्यू_कारण = हृदयविकाराचा झटका
| मृत्यू_कारण = हृदयविकाराचा झटका
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान = [[शिवाजी पार्क]], [[दादर]], [[मुंबई]]
| चिरविश्रांतिस्थान = [[शिवाजी पार्क]], [[दादर]], [[मुंबई]], महाराष्ट्र
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान = मातोश्री, कलानगर, [[वांद्रे]], [[मुंबई]]
| निवासस्थान = मातोश्री, कलानगर, [[वांद्रे]], [[मुंबई]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे = बाळासाहेब, हिंदूहृदय सम्राट
| टोपणनावे = बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट
| वांशिकत्व =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| नागरिकत्व = [[भारतीय]]
ओळ ४५: ओळ ४६:
| अपत्ये = [[उद्धव ठाकरे|उद्धव]], बिंदूमाधव, जयदेव
| अपत्ये = [[उद्धव ठाकरे|उद्धव]], बिंदूमाधव, जयदेव
| वडील = [[केशव सीताराम ठाकरे]]
| वडील = [[केशव सीताराम ठाकरे]]
| आई =रमाबाई केशव ठाकरे
| आई = रमाबाई केशव ठाकरे
| नातेवाईक = [[राज ठाकरे]] (पुतण्या)
| नातेवाईक = [[राज ठाकरे]] (पुतण्या)
| पुरस्कार =
| पुरस्कार =
ओळ ५५: ओळ ५६:
}}
}}
'''बाळ केशव ठाकरे''' ऊर्फ '''बाळासाहेब ठाकरे''' ([[जानेवारी २३]], [[इ.स. १९२६]]; [[पुणे]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]; [[मुंबई]]) हे महाराष्ट्रातील [[शिवसेना]] पक्षाचे [[संस्थापक]], राजकारणी व व्यंगचित्रकार होते. [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
'''बाळ केशव ठाकरे''' ऊर्फ '''बाळासाहेब ठाकरे''' ([[जानेवारी २३]], [[इ.स. १९२६]]; [[पुणे]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]; [[मुंबई]]) हे महाराष्ट्रातील [[शिवसेना]] पक्षाचे [[संस्थापक]], राजकारणी व व्यंगचित्रकार होते. [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.

.


== व्यंगचित्रकार ==
== व्यंगचित्रकार ==

१२:१७, २९ जून २०२० ची आवृत्ती


बाळ केशव ठाकरे
जन्म जानेवारी २३, इ.स. १९२६
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर १७, इ.स. २०१२
मातोश्री, कलानगर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका
चिरविश्रांतिस्थान शिवाजी पार्क, दादर, मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान मातोश्री, कलानगर, वांद्रे, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट
नागरिकत्व भारतीय
पेशा व्यंगचित्रकार, राजकारणी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९५०-इ.स. २०१२
प्रसिद्ध कामे शिवसेना पक्षाची स्थापना
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू
जोडीदार मीनाताई ठाकरे
अपत्ये उद्धव, बिंदूमाधव, जयदेव
वडील केशव सीताराम ठाकरे
आई रमाबाई केशव ठाकरे
नातेवाईक राज ठाकरे (पुतण्या)
संकेतस्थळ
shivsena.org

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.

व्यंगचित्रकार

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.[१]

'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. थेट बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांच्याकडून ‘मार्मिक रेषां’चे धडे घेण्याच्या अद्वितीय संधीला ‘कॉमन मॅन’ने भरभरून प्रतिसाद दिला आहे. या दोन दिग्गजांच्या तोंडून ‘व्यंगचित्र कसे काढावे’ याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देणाऱ्या डीव्हीडी ‘अखिल भारतीय व्यंगचित्रकार साहित्य संमेलना’त विक्रीस ठेवल्या असून गेल्या सहा दिवसांत या डीव्हीडींच्या प्रत्येकी एक हजार प्रती खपल्या आहेत. सांगली- शिवसेनाप्रमुख, प्रसिद्ध व्यंगचित्रकार, "मार्मिक‘ आणि "सामना‘चे संपादक म्हणून महाराष्ट्रात दबदबा असणारे बाळासाहेब ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम‘ या पाक्षिकाचे संपादक होते. ते मुलांसाठी खास व्यंगचित्रे रेखाटायचे.

शिवसेनेची स्थापना

महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाही..

सामना

वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरेप्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असे.कालांतराने सामना हे वृतपत्र सृष्टीतील मुख्य वृत्तपत्र म्हणून ओळखले जाऊ लागले .

शिवसेना - भाजप युती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.

हिंदुत्व

हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. त्यांना हिंदुहृदयसम्राट तसेच सरसेनापती या नावानेही जाणले जाते.

राजकीय कार्य

झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, Bombayचे Mumbai असे स्पेलिंग... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.

जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था - साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वतः प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.

अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.


निधन

बाळ ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी भाप्रवेनुसार १५:३० वाजता मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले [२].

ठाकरेंवरील प्रकाशित साहित्य

  • जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - पुस्तक, लेखक प्रकाश अकोलकर.
  • पहिला हिंदुहृदयसम्राट - पुस्तक, लेखक - अनंत शंकर ओगले
  • बाळासाहेब : ए्क अंगार - पुस्तक, लेखक - नागेश शेवाळकर
  • बाळासाहेब ठाकरे - पुस्तक, लेखक - यशराज पारखी
  • हृद्य सम्राटाची जीवनगाथा - भारत भांड यांनी लिहिलेला पोवाडा आणि गीतांची सीडी.

चित्रपट

बाळ ठाकरे यांच्या जीवनावर ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत निघाला आहे. निर्मिती संजय राऊत यांची आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी हे बाळासाहेबांच्या भूमिकेत आहेत.दि.25 जानेवारी 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

संस्था

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) वैद्यकीय महाविद्यालय (विले पार्ले)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ बाल ठाकरे की पसंदीदा कार्टून कैरेक्टर थी इंदिरा गांधी. BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 16-03-2018 रोजी पाहिले. कॉंग्रेस के ख़िलाफ राजनीति करने वाले बाल ठाकरे ने अपनी कूची से इंदिरा गांधी पर कई बार निशाना साधा. लेकिन उसी बाल ठाकरे ने उनकी हत्या पर उन्हें श्रद्धांजलि भी कार्टून बनाकर दी. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "बाळासाहेब ठाकरे यांचे निधन". १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्यदुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत