"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२: ओळ ३२:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''राम गणेश गडकरी''' (टोपणनावे: '''गोविंदाग्रज''', '''बाळकराम''') ([[मे २६]], [[इ.स. १८८५]]; [[नवसारी]], [[गुजरात]] - [[जानेवारी २३]], [[इ.स. १९१९]]; सावनेर) हे [[मराठी]] कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. [[गोविंदाग्रज]] ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि [[राम गणेश गडकरी|बाळकराम]] ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला '[[एकच प्याला]]', '[[प्रेमसंन्यास]]', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
'''राम गणेश गडकरी''' (टोपणनावे: '''गोविंदाग्रज''', '''बाळकराम''') ([[मे २६]], [[इ.स. १८८५]]; [[नवसारी]], [[गुजरात]] - [[जानेवारी २३]], [[इ.स. १९१९]]; सावनेर) हे [[मराठी]] कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. [[गोविंदाग्रज]] ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि [[राम गणेश गडकरी|बाळकराम]] ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला '[[एकच प्याला]]', '[[प्रेमसंन्यास]]', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.


राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’[[शेक्सपियर]]’ समजले जाते.
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’[[शेक्सपियर]]’ समजले जाते.

०१:०५, १५ मे २०२० ची आवृत्ती

राम गणेश गडकरी
जन्म नाव राम गणेश गडकरी
टोपणनाव गोविंदाग्रज , बाळकराम, सवाई नाटकी
जन्म २६ मे १८८५
गणदेवी, जि. नवसारी , गुजरात
मृत्यू २३ जानेवारी १९१९
सावनेर ,जि. नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटककार, कवी, लेखक
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटके, विनोदी कथा
विषय मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती

नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव

भावबंधन
वडील गणेश वासुदेव गडकरी
आई सरस्वतीबाई गणेश गडकरी
पत्नी

प्रथम पत्नी - सीताबाई गडकरी

द्वितीय पत्नी - रमाबाई गडकरी

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.

विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.

जीवन

गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

नाटके

गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

काव्य

वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती राजहंस माझा निजला ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.

विनोदी लेखन

गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

अन्य साहित्य

नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

याशिवाय, गडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य:-

  • चिमुकली इसापनीती
  • समाजात नटाची जागा आणि इतर दोन निबंध
  • नाट्यकलेची उत्पत्ती
  • गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र

राम गणेश गडकरी यांची एक अप्रसिद्ध गद्य कविता

भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :-

भांबूराव : आंबेमोहर काय भाव?
दाणेवाला : असडी सत्तविसाने दिला.
भांबूराव : बोला; एकच गोष्ट
दाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला.
भांबूराव : जातो.
दाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या.
भांबूराव : साडे पंच्विस द्या.
दाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा?)
भांबूराव : पल्ला.
दाणेवाला : चला माप घ्या.

हाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :-

आंबे॒मो | हर का | य भाव | असडी
सत्तावि |साने | दिला
बोला; | एकच गोष्ट |
हा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.|
जातो |
माल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या |
साडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा? |
पल्ला. || चला माप घ्या. ||

राम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • अप्रकाशित गडकरी (आचार्य अत्रे, १९६२)
  • कवितेतला राजहंस-कविश्रेष्ठ गोविंदाग्रज (प्रवीण दवणे)
  • कवी गोविंदाग्रज (भ.श्री. पंडित)
  • किर्लोस्कर, देवल, गडकरी यांच्या नाटयकृतीचे मूल्यमापन व रसग्रहण (ना.सी. फडके)
  • गडकरी जीवन चरित्र (वि.ना. कोठीवाले)
  • गडकरी ह्यांच्या आठवणी (गो.गो. अधिकारी)
  • गडकरी, व्यक्ति आणि वाङ्‌मय (वि.स. खांडेकर, (१९३२)
  • गडकरी - सर्वस्व (आचार्य अत्रे)
  • गडकऱ्यांची नाट्यप्रकृति व नाट्यसृष्टी (वसंत वरखेडकर)
  • गडकऱ्यांची नाट्यशैली (रु.पां. पाजणकर)
  • गडकऱ्यांचा नाट्यसृष्टी (वसंत शांताराम देसाई)
  • गडकऱ्यांचा वाग्विलास (पां.ग. क्षीरसागर)
  • गडकऱ्यांचा विनोद (शिवराम गोविंद भावे)
  • गडकऱ्यांची संसार नाटके (त्र्यं.वि. सरदेशमुख)
  • गडकऱ्यांचे अंतरंग (रा.शं. वाळिंबे)
  • गोविंदाग्रज (रा.ग. हर्षे)
  • गोविंदाग्रजांची गूढगीते (कृ.रा. परांजपे)
  • गोविंदाग्रज शैली : स्वरूप व समीक्षा (डॉ. सुरेश भृगुवार)
  • गोविंदाग्रज समीक्षा (अक्षयकुमार काळे) या पुस्तकाचे प्रकाशन १९८५ साली वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते.
  • गोविंदाग्रज - समीक्षा (साहित्य समीक्षा); लेखक - उल्हास कोल्हटकर
  • नाट्यस्वरूप गडकरी (शं.ना. सहस्रबुद्धे)
  • प्रतिभावंत राम गणेश गडकरी (डॉ. नीला पांढरे)
  • प्रतिभासम्राट राम गणेश गडकरी (माधव यशवंत गडकरी)
  • संगीत भावबंधन नाटकावरील टीका (वा.ह. घारपुरे)
  • मराठी नाटक .... राम गणेश गडकरी (ललिता कुंभोजकर)
  • राम गणेश गडकरी (चिं.ग. कोल्हटकर)
  • कै. राम गणेश गडकरी यांच्या आठवणी (प्रभाकर सीताराम गडकरी) (१९३८ व १९४४)
  • राम-सुधा अथवा गडकऱ्यांच्या नाटकातील सुभाषिते (सुमंत जोशी)
  • राष्ट्रीय चरित्र माला : राम गणेश गडकरी (चरित्र, १९८२).


(अपूर्ण)

स्पर्धा

राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-

सन्मान

राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी उद्यानात उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तथाकथित गलिच्छ लिखाण केले असल्याचा निखालस खोटा आरोप ठेवून त्यांचा पुतळा ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी उचकटला व मुठा नदीत बुडवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केली. पुतळ्याच्या जागेवर तूर्तास गडकरींची तसबीर ठेवली आहे. लवकरच तेथे गडकरींचा नवीन पुतळा उभारला जावा अशी पुणेकरांची इच्छा आहे.

या गुन्ह्यासाठी संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांना अटक झाली. त्यांनी सांगितल्या जागी नदीच्या पात्रातून पुतळा आणि पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हातोडी आणि अन्य अवजारे बाहेर काढण्यात आली.

साखर कारखाना

कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी सन १९९८ मध्ये सावनेर तालुक्यात हेटीसुरला येथे राम गणेश गडकरी साखर कारखाना काढला. तो काही वर्षे चालला. पुढे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे त्यावरील कर्ज वाढत गेले. सन २००५मध्ये कर्जाची रक्कम ७१.४६ कोटी रुपयांवर पोहोचली. ६० दिवसांची जप्तीची नोटीस बजावायची आणि कारखान्याची संपत्ती विक्रीस काढायची, अशी कर्जवसुलीची पद्धत रूढ झाली होती. कारखाना विक्रीस काढण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन केले जाते. सावनेर तालुक्यातील या कारखान्याच्या ११०.८० एकर जमिनीचे मूल्यांकन के.आर.व्ही. चारी आणि व्ही.आर. देशकर यांनी २६ कोटी ३१ लाख रुपये इतके ठरवले. त्यात कारखान्याची यंत्रसामग्री, जमिनीची किंमत आणि इमारत अशा सगळ्यांचा समावेश होता. ही किमान रक्कम आल्याशिवाय कारखाना विक्री करू नये, असा नियम असला तरी या कारखान्याची केवळ १३ कोटी ३६ लाखांत विक्री करण्यात आली.

हा राम गणेश सहकारी साखर कारखाना सात वर्षे बंद होता. कसेबसे तीन उसाच्या हंगामांचे गाळप झाले होते. कारखाना बंद पडल्यावर तेथील यंत्र सामग्रीची चोरी झाली. कारखाना विकल्यावर तेथील यंत्रे राहुरीमध्ये आणून तो कारखाना सुरू करण्यात आला.

रामगणेशाय नमः

राम गणेश गडकरी यांच्या कारकिर्दीवर श्रीराम रानडे यांनी लिहिलेला आणि विजय गोविंद यांनी सादरीकरण केलेला हा श्राव्य कार्यक्रम आहे.

हेही पहा

बाह्य दुवे