"विकिपीडिया:धूळपाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
NicoScribe (चर्चा | योगदान) + खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! |
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
*मराठीत लिहिणे जमले नाही तर :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::४)तुमची नेमकी कन्फ्युजन्स आम्हाला सांगा |
*मराठीत लिहिणे जमले नाही तर :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::४)तुमची नेमकी कन्फ्युजन्स आम्हाला सांगा |
||
== |
==स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट २०१५ साठी आपला शुभेच्छा संदेश (केवळ मराठीतून) नोंदवा== |
||
[[संदर्भ : ]] |
|||
== म ......मम अभिमान असे माझा रा .....येथे झाला शिवाजी राजा ठी.....ठीक असे जोवर मराठी भाषा == |
== म ......मम अभिमान असे माझा रा .....येथे झाला शिवाजी राजा ठी.....ठीक असे जोवर मराठी भाषा == |
२०:५१, १८ जानेवारी २०२० ची आवृत्ती
कोल्हापुरी लोक
- नंदकुमार मोरे
व्यवहारात आपण ‘लोक’ हा शब्द खूप सैलसर अर्थाने वापरतो. ज्ञानक्षेत्रातही तो अनेक अर्थाने वापरला जातो. काही ठिकाणी तो समग‘ परिसरातील लोकांची स्थिती सांगण्यासाठी वापरला जातो. तर काही ठिकाणी तो सामान्य जनता किंवा खेड्यात राहणारे या अर्थानेही वापरलेला दिसतो. ‘लोक’ शब्दाची एक व्या‘या, खेड्यात आणि शहरात राहणारे असे लोक, की जे परंपरेने चालत आलेले जीनव जगतात, अशी आहे. तर काही अभ्यासकांनी ‘लोक’ म्हणजे परंपरेने चालत आलेल्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा वर्ग, असेही सांगितले आहे. एकूणच हा शब्द लोकांविषयी वापरला जातो. परंतु विशिष्ट समाजातील, गावातील ‘लोक’ म्हणजे कोण, हे सांगणे मात्र सोपे नाही. येथे आपण ‘कोल्हापुरी लोक’ असा विचार करताना, कोल्हापुरी कोण? या प्रश्नावर थबकतोच. कोल्हापुरी असे म्हणत असताना, कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरात राहून कोल्हापुरी संस्कृती जगतात, जपतात ते कोल्हापुरी, असे म्हणता येईल का? तर म्हणता येईल. कारण आपली प्रादेशिक अस्मिता आपण आपल्या प्रदेेशापासून जसे दूर जाऊ तशी जागृत होत जाते. दि‘ीत आपण महाराष्ट्रीयन, मुंबईत कोल्हापुरी आणि कोल्हापुरात गडहिंग्लजकर, चंदगडकर किंवा गगनबावडेकर असतो. कोल्हापूरपासून दूर गेल्यानंतर जे स्वत:ला कोल्हापुरी म्हणवतात, ते भाषिक, धार्मिक आणि प्रादेशिकदृष्ट्या एक नसतात. म्हणून तात्विकदृष्ट्या शाहूवाडीपासून चंदगडपर्यंत आणि जयसिंगपूरपासून गगनबावड्यापर्यंत सार्या लोकांना कोल्हापुरी म्हणता येतील काय? हा प्रश्न गोंधळात टाकणारा आहे. कारण या विस्तृत प्रदेशातील लोक स्वत:ला कोल्हापुरी म्हणून घेत असले तरी, या सर्वांची जगण्याची रीत, संस्कृती, आहार, सणसणावर, श्रद्धा आणि देवदेवता एकसार‘या नसतात. या प्रदेेशात आज चाळीस लाखांहून अधिक लोक राहतात. यामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, निरनिराळे व्यवसाय करणारे आणि निरनिराळी भाषा बोलणारे लोक आहेत. या सर्वांमध्ये बारश्यापासून लग्नाचा विधी ते अंत्यविधी अशा सर्व बाबतीत सांस्कृतिक भिन्नता दिसते. कोठेच एकसारखेपणा नसतो. घरचे खानपान वेगळे. भाषिक संस्कृती भिन्न. मराठीबरोबर उर्दू, कन्नड, हिंदी, गुजराती या शेजारी आणि नित्य संपर्कातील भाषिकांबरोबरच आसामी, बंगाली, मल्याळम, ओरिया, पंजाबी भाषिकही या प्रदेेशात स्थिरावलेत. हिंदू, मुस्लिम, जैन, लिंगायत, ख्रिश्चन, बौद्ध या धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. तरीही हे सारे स्वत:ला स्वत:ची भाषा, धर्म आणि जात बाजूला ठेऊन ‘कोल्हापुरी’ म्हणवून घेतात. स्वत:ही तसे समजतात. हे प्रत्येक प्रदेशातील लोकांमध्ये दिसते. याचे कारण प्रदेश माणसाला बांधतो. म्हणूनच मी मुंबईकर, मी पुणेकर, मी नागपुरी, मी कोल्हापुरी हे शब्द रुजलेले आहेत. भाषा अशी उगाच तयार होऊन रुजत नाही. तिला जीवनाचा खोल आधार असतो. प्रदेश समुहाला बांधतो. ही बांधणी अतूट असते. कोल्हापुरकरांना कोणत्या गोष्टी एकत्र बांधून ठेवतात आणि एक आहोत याचा अनुभव देतात. तर त्याची उत्तरे अनेक आहेत. कोल्हापुरकरांना आपला सांस्कृतिक वारसा फार प्रिय आहे. कोकणच्या घाटमाथ्यावरील हिरव्यागार पर्वतरांगांमधून येणारी गारगार हवा त्याला प्रिय आहे. शेेेकडो वर्षांपासून येथे आकारलेली संस्कृती प्रिय आहे. ही संस्कृतीच त्याच्या जगण्याचा आधार आहे. ही संस्कृती कोणत्याही जातीधर्माआड येत नाही. व्यक्ती कोणत्याही जातीधर्माची, भाषेची असो ही प्रादेशिक संस्कृती त्याला प्रदेशाशी, गावाशी घट्ट बांधते. म्हणूनच ही संस्कृती त्यात्या प्रदेेशातील लोकांच्या जगण्याचे संचित असते. भावा काय?, हारकलाईस? गुडग्याव पडलाईस काय? रांड्या कुठं गेलतास? असे शब्द कानावर आदळले की आपण आपल्या कोल्हापुरात असल्याचा फिल येतो. आपण कोणत्याही जातीधर्माचे असो अंबाबाई आपली असते. येथील तालमी, मंडळे ही व्यक्तीच्या ओळखीचा भाग होतात. जशी पंचगंगा सर्वांची असतेे. तसा रंकाळाही सर्वांचा असतो. कारण त्याभोवतालच्या काही आठवणी प्रत्येकाने जपलेल्या असतात. येथे राजर्षी शाहूच्या कार्याचा दरवळ सर्वांभोवती असतो. या दरवळीचा गंध घेत आपण जगत असतो. तांबडा पांढरा रस्सा पिण्याला जातीधर्माची बंधने नाहीत. छत्रपती शिवाजींपासून ताराराणीचा येथील इतिहास प्रत्येकाला आपला इतिहास वाटतो. म्हणून पन्हाळा आपला असतो. कोल्हापुरी चप्पल ते मिसळ आणि भेळ-भेवडा ते तिकट्यांवरचे धारोष्ण दुध आपले असते. येथील कस्त्यांपासून रेड्याच्या टकरी आपली ओळख बनतात आणि आपल्याला या गावशी घट्ट बांधून ठेवतात. या सार्या गोष्टी एकदा मुरल्या, की त्या कोणालाही ‘कोल्हापुरी’ बनवतात.
चांभारगडबद्दल इतिहासात फार नोंदी उपलब्ध नाहीत. पण पूर्वी जवळपास एखादा महत्वाचा किल्ला असेल तर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी काही छोटे किल्ले बांधण्याची पद्धत होती. या किल्ल्यांना प्रभावळीतील किल्ले असे संबोधले जायचे. चांभारगड हा रायगडाच्या प्रभावळीतील एक किल्ला मानला जायचा. गडाचा घेर तसा कमीच आहे. थोड्याफार खोदीव पायऱ्या, एक-दोन पडके बुरुज आणि बरीचशी पाण्याची आटलेली टाकी. माथ्यावरून महाड प्रांतावर एक नजर फिरवून परत गावात उतरलो ¤ चांभार गड ¤ * चांभार खिंड * रायगडाच्या पायथ्याजवळ चांभार खिंड का आहे.
- उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::>::::::>::::::::>::::::::::::::>:::::::::::::१) इथे उजव्या कोपऱ्यातटिचकी मारा (क्लिक करा)
- उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::::::>::::::::::>::::::::::::::::::::::::२अ) या उजव्या कोपऱ्यात,इथेवर किबोर्डचे अतीछोटे चित्र येईल त्यावर क्लिककरा
- उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::>२ब) हे वाचताना क्लिक करण्याच्या आत चित्रचिन्ह गेले तर पुन्हा क्लिक करा,आठवणीने चित्रचिन्हावर क्लिककरा
- उजव्या कोपऱ्यात:::>:::::::>:::::::>::::::::>:::::>::::::::::>:::::::::::: ३) आणि मग अक्षरांतरण पर्याय निवडा,इन्स्क्रिप्टची सवय असल्यास मराठी लिपी निवडा
- हि ":>:" बाण चिन्हे तुमचे उजवी कडे लक्ष जावे आणि चिन्हावर चटकन टिचकी मारता यावी म्हणून उजवी कडे टिचकवण्यास सांगते.टायपींग साठी या :>: बाण चिन्हांची आवश्यकता नाही.
- कंट्रोल + एम ने सुद्धा मराठी निवडू शकता; अथवा आपण आपल्या आवडीची इतर युनिकोड टंकन पद्धती वापरू शकता.
- मराठीत लिहिणे जमले नाही तर :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::४)तुमची नेमकी कन्फ्युजन्स आम्हाला सांगा
स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट २०१५ साठी आपला शुभेच्छा संदेश (केवळ मराठीतून) नोंदवा
म ......मम अभिमान असे माझा रा .....येथे झाला शिवाजी राजा ठी.....ठीक असे जोवर मराठी भाषा
म ......मम अभिमान असे माझा
रा .....येथे झाला शिवाजी राजा
ठी.....ठीक असे जोवर मराठी भाषा
पटका
भारतात अनेक भागात डोक्याला बांधले जाणारे हे एक प्रकारचे वस्त्र आहे. आधुनिक काळात याचा वापर कमी झाला असला तरी अजूनही विवाह समारंभ, मिरवणूक यासारख्या प्रसंगी हे वस्त्र मानाने परिधान केले जाते.