"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो नंदकुमार माेरे (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ ४१: ओळ ४१:


महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री [[चिं.ग. कर्वे]] अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री [[चिं.ग. कर्वे]] अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.


डॉ.सरोजिनी बाबर यांची ‘समाज शिक्षण माला'



लोकसाहित्याच्या संशोधिका व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सरोजिनी बाबर यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्त त्यांनी 46 वर्षे मोठ्या ध्येयनिष्ठेने व एकहाती चालविलेल्या "समाजशिक्षणमाला' या मासिकाचा परिचय करून देणारा हा विशेष लेख...

कृ.भा.बाबर हे विसाव्या शतकातील एक समाजसुधारक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, संपादक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी भेट म्हणून दिलेले साडेचार हजार रूपये व पदरचे पाचशे रूपये अशा पाच हजार रूपयांच्या भांडवलावर त्यांनी ‘समाज शिक्षण माला’ हे मासिक 20 ऑक्टोंबर 1950 रोजी सुरू केले. सर्वसामान्यांना लेखनवाचनाची गोडी लागावी आणि सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देता यावे, या हेतूने "माले'चा प्रारंभ झाला. ‘माले’च्या पहिल्या अंकापासून ते 550 व्या अंकापर्यंत डॉ.सरोजिनी बाबर यांनी संपादिका म्हणून काम केले. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला अंक प्रकाशित होत असे. "माले'तील सर्वात छोटे पुस्तक 26 पानांचे आहे. तर सर्वाधिक पृष्ठांचा अंक 184 पानांचा आहे. प्रत्येक अंकामध्ये एका लेखकाने एका विषयावर लेखन केले आहे. प्रत्येक अंकामध्ये लेखाविषयी संपादकीय आहे. ‘इकडे तिकडे’ हे सदर बातम्यांच्या स्वरूपात आहे. 340 व्या अंकापासून ‘मननीय विचार’, ‘वाचण्याजोगे थोडेसे’ ही सदरे चालू झाली. मालेची वार्षिक वर्गणी प्रारंभी रू.3.50 होती. मुखपृष्ठावरील व आंतील चित्रे आकर्षक आहेत. ‘माले’च्या आर्थिक व्यवस्थापनाची परिस्थिती कठिण होत गेल्यामुळे 20 जुलै 1996 च्या अखेरच्या अंकानंतर "समाज शिक्षण माला' बंद करण्यात आली.

"माले'मध्ये मराठीतील अनेक मान्यवर लेखक, संशोधक, कलावंत तसेच नवोदित अभ्यासकांनी लिहिले आहे. कृ.भा.बाबर(99 पुस्तके ), डॉ.सरोजिनी बाबर (87 पुस्तके ), कुमुदिनी पवार (18 पुस्तके ), शरदिनी मोहिते (51 पुस्तके) यांनी अखंड लेखन केले. ग.ल.ठोकळ, नामदेव व्हटकर, म.म.द.वा.पोतदार, डॉ.सुमती क्षेत्रमाडे, बा.भ.बोरकर, दुर्गा भागवत, डॉ.आप्पासाहेब पवार, रियासतकार गो.स.सरदेसाई, कुमुदिनी रांगणेकर, व्यंकटेश माडगूळकर, ताराबाई मोडक, डॉ.द.वि. केळकर, वि.द.घाटे, शंकर पाटील, शांताबाई जोशी, नरूभाऊ लिमये, ब.मो. पुरंदरे, सेतू माधवराव पगडी, कमलाबाई टिळक, इंदिरा संत, वामनराव चोरघडे, आनंदीबाई शिर्के, बापू वाटवे, शरश्चंद्र गोखले, द.म.सुतार यांसारख्या लेखकांनी लेखन केले आहे.

सण, उत्सव, चिंतन, धर्मकारण, राजकारण, पुरातत्व, लोकसंस्कृती, लोकपरंपरा, इतिहास, शेती, प्राणीजीवन, खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान, वैज्ञानिक प्रगती, भूगोल, वाङ्मय, आठवणी व अनुभव, कथन, प्रवास वर्णने, शिक्षण, भाषा, व्यक्तिविशेष, चित्रकला, अलंकार, वस्त्रोद्योग, खेळ, संगीत, कला, नागरी संरक्षण, मूलभूत हक्क, आरोग्य, आहार, औषधे, भूजल, निसर्ग, सृष्टी, पर्यावरण, पत्रकारिता, अपंग, अंध:श्रध्दा निर्मूलन, तत्वज्ञान, बालसंगोपन वगैरे विषयांवर "माले'मध्ये विपुल लेखन झालेले आहे. समाजातील सर्व स्तरांतील वाचकांचे मानसिक व बौध्दीक भरणपोषण "माले'ने केले. विषयांचे वैविध्य, मांडणीचे सूत्रबध्द स्वरूप, व्यासंग, आकलनसुलभता, कलात्मकता, भाषाशैली यांसारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे मराठी साहित्यामध्ये "माले'ने मोठी भर घातलेली आहे.

"माले'ने लोकशिक्षणाचा वसा घेऊन वाटचाल केली. सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून दरवेळी एका विषयावर त्या क्षेत्रातील जाणत्या लेखकांकडून साध्या सोप्या भाषेमध्ये जाणीवपूर्वक लिहून घेतले. सामान्य लोकांच्या बोलीशी संवादी अशी घरगुती वळणाची सर्वजनसुलभ भाषा हे मालेचे वैशिष्ठ्य होते. "माले'ने बहुजन समाजामध्ये वाङ्मयीन अभिरूची निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले. "माले'नेकेवळ प्रौढांचेच नाही तर सर्व अबाल वृध्द, नवशिक्षित, सुशिक्षितांचे ज्ञानसंवर्धन केले. ग्रामीण जीवनाची साहित्यिक अभिरूची घडविणे, वाढविणे, टिकविणे आणि सांस्कृतिक जीवनाला आधार प्राप्त करून देणे या उद्दिष्टांची पूर्ती या "माले'तून झाली. मालेचे ध्येयधोरण लोकांच्या पसंतीला उतरले. मालेच्या पुस्तकांनी सामान्य शेतकर्‍यांपासून विद्यापीठाच्या पदवीधरांपर्यंत सर्वांना मोहवून टाकले. मालेची पुस्तके वाचून अनेकजण लेखनास प्रवृत्त झाले, ही "माले'ची मोठी उपलब्धी आहे.

एका निखळ उद्देशाने चालविलेली आणि सातत्य टिकविलेली ही एकमेव माला म्हणता येईल. खेड्यापाड्यातील सामान्य माणसांच्या दारात मालेने ज्ञानाची पाणपोई उघडली. ज्ञानाची तहान भागवत आणि खुलवत नेण्याची किमया "माले'ने जनसामान्यांसाठी करून दाखविली. मालेची खूप वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यात मुख्य आहे दीर्घकाळ चालविलेला ध्येयवाद. त्यासाठीचे कष्ट. डॉ. यु. म. पठाण ‘माले’संदर्भात म्हणतात, “समाजशिक्षणमालेची शेकडो छोटी छोटी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यातले विविध विषय अनेकविध आहेत. इतिहास, विज्ञान, धर्म, अर्थ, राजकारण, साहित्य, कला इत्यादी जीवनाच्या किती तरी अंगांना स्पर्शून जाणारे विषय समाजशिक्षणमालेने निवडले. मालेचा वाचकवर्ग सर्वसाधारण समाज आहे. त्याला साक्षर करायचं, त्याला सुसंस्कृत करायचं, त्याचं उद्बोधन करायचं, जीवनाच्या अनेक पैलूंचा परिचय त्याला करून द्यायचा, सुविचारांचा त्यावर ठसा उमटवायचा आणि अशा प्रकारे जनसामान्यांच्या उन्नतीसाठी झटायचं हा समाजशिक्षणमालेचा निर्मितीहेतू. यासाठी अण्णा नि अक्काताई यांनी आपली हयात वेचली. आपलं आयुष्य समर्पित केलं. याबद्दल मराठी मन त्यांचेबद्दल कृतज्ञताच प्रकट करील.”

"माले' ने प्रौढ व ग्रामीण वाचक डोळ्यांसमोर ठेवून, अत्यंत सुबोध भाषेत वाङ्मयीन अभिरूची निर्माण करण्याचे कार्य करून आपले ‘समाज शिक्षण माला’ हे नाव सार्थ केले. मराठी वाचकांची वाङ्मयीन अभिरूची विकसित करण्यात व मराठी संस्कृतीची अभिवृध्दी करण्यात मालेचे अनन्यसाधारण योगदान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्धशतकामध्ये महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक व वाङ्मयीन जडणघडण होत गेली. यामध्ये "समाज शिक्षण माले'चाही मोठा हातभार लागला आहे.


==सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ==
==सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ==

२०:४९, ११ जानेवारी २०२० ची आवृत्ती

सरोजिनी बाबर
जन्म जानेवारी ७, १९२०
बागणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल १९, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, कविता
विषय लोकसंस्कृती, लोकगीत

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर (जानेवारी ७, १९२० - एप्रिल १९, २००८) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्‍या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.

जीवन

सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. लोकसाहित्याचे अतिशय उत्तम प्रकारे संशोधन, संपादन आणि संकलन करून या संस्कृतीचा फार मोठा ठेवा त्यांनी महाराष्ट्राला कायमचा उपलब्ध करून दिला आहे.

सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद करणारी अशी होती.[१]

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री चिं.ग. कर्वे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.

सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ

महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचे सरोजिनी बाबर यांच्याकडे येणे-जाणे असायचे. त्यांपैकी काही जण : प्र.के. अत्रे, कवी गिरीश, बा.ग.जगताप, ग.ल.ठोकळ, रियासतकार सरदेसाई, सेतुमाधवराव पगडी, डॉ.वा.भा.पाठक, बाबासाहेब पुरंदरे, म.म. द.वा.पोतदार द.रा. बेंद्रे, श्री.म.माटे, आबासाहेब मुजुमदार, कवी यशवंत, डॉ. के.ना. वाटवे, आनंदीबाई शिर्के, डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे, वगैरे. या सर्वांच्या सहवासात साहित्यिक चर्चा घडत, इतिहासविषयक विवेचने होत असत. वडिलांशी (कृ.भा. बाबर यांच्याशी) देखील कितीतरी वेळा सरोजिनी बाबर यांची सांगोपांग चर्चा होत असे. बाबर यांचा लिहिता हात अत्यंत सुंदर अक्षरात कागदावर अहोरात्र सरसर लिहित राहिला.

वकृत्व आणि संगीत

सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम, अगदी ऐकत राहावी अशीच होती. त्यांनी गायनाचेही शिक्षण काही काळ घेतले होते. गजाननराव वाटवे, गोविंदराव टेंबे, वत्सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर यांचीही चांगली ओळख होऊन त्याच्याशी भेटीगाठी होऊन बाबरांवर गायनसंस्कार होत राहिले. त्याचमुळे अत्यंत सुरेल, गोड ठाम आवाजात त्या उत्तम प्रकारे लोकगीते म्हणत असत.

बाबर यांचा सहभाग असलेल्या समित्या

  • आकाशवाणीच्या पुणे केंद्राची सल्लागार समिती : आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमात सरोजिनी बाबर यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. शिवाय लोकवाग्मय -लोकगीते, लोकजीवन, लोकसंस्कृतीवर आधारित अशा १२ विषयांवर दरमहा एक अशा १२ उत्कृष्ट कार्यक्रमांची मालिका आपल्या सहभगिनींना सोबत घेऊन सदर केली. काही कार्यक्रम आकाशवाणी महोत्सवात (live) प्रक्षेपणाचे वेळी सादर केले. या कार्यक्रमांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
  • दूरचित्रवाणी : २३ जानेवारी १९९० पासून मुंबई दूरदर्शनने सरोजिनी बाबर यांची ’रानजा” ही १३ भागांची मालिका सादर केली. या मालिकेतून मराठी संकृतीचे नेटके आणि नेमके असे विलक्षण आणि प्रत्ययकारी दर्शन घडले. यातील प्रत्येक भागाचे लेखन करून अनेक मराठी ठिकाणांचे, गाण्यांचे, नृत्यांचे, रिवाजांचे चित्रण करून कवयित्री शांताबाई शेळके यांच्याबरोबर केलेली चर्चा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रंजक ठरली. हीही मालिका विलक्षण लोकप्रिय ठरली.
  • लोकसाहित्यविषयक संमेलन : मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्यविषयक संमेलन भरवले. त्यात अनेक परिसंवाद घडवले. लोककलांचे प्रदर्शनही उत्कृष्टपणे उभारले.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : या मंडळामुळे अनेक चांगल्यी माहितीपूर्ण पुस्तकांची निर्मिती होत होती.
  • गुरुवर्य सोनोपंत (मामा) दांडेकर प्रमुख असलेली नामदेव गाथा संशोधन समिती. या समितीने तब्बल ११ वर्षे संत नामदेवांच्या एकेका अभंगांचा निरनिराळ्या पोथ्यांतील पाठांचा अभ्यास करून नामदेवांच्या लेखनाची अधिकृत प्रत प्रसिद्ध केली.
  • नाट्य परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) : -रंगमंचावर सदर केल्या जाणार्‍या नाटकांच्या आणि तमाशांच्या संहिता तपासून त्यात वेळप्रसंगी दुरुस्त्या करवून घेऊन संमती देणारी ही समिती होती.
  • समाज शिक्षण माला : केवळ नवशिक्षित जनसामान्यच नव्हे, तर प्रचंड अशा विद्वानांमध्येही ’समाज शिक्षण माला’ प्रिय झाली. एकूण ५५० पुस्तकांमध्ये, स्वतः श्री कृ.भा.बाबर यांची एकूण ९९ पुस्तके, तसेच सरोजिनी बाबरांची एकूण ८७ पुस्तके, त्यांच्या दोघी धाकट्या भगिनी - कुमुदिनी पवार यांची १८ पुस्तके आणि शरदिनी मोहिते यांची ५१ पुस्तके, अशी एकूण २५५ पुस्तके ही या बाबर घराण्यातील लेखकांची झाली. या व्यतिरिक्त, समाजातील अनेक नामवंत विद्वान लेखकांनी उर्वरित २९५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये ग.ल. ठोकळ, डॉ.सुमती क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर, नरुभाऊ लिमये, शरदचंद्र गोखले, सेतू माधवराव पगडी, गंगुताई पटवर्धन, गोपीनाथ तळवलकर, डॉ.रा.ना. दांडेकर, रमेश मंत्री, शंकर पाटील, दत्तो वामन पोतदार, गोविंदस्वामी आफळे, बा.भ. बोरकर, दुर्गा भागवत, शंकरराव खरात, बापू वाटवे, बबनराव नावडीकर, ना.सी.फडके, मालतीबाई दांडेकर, मृणालिनी देसाई, नानासाहेब गाडगीळ, गो.नी. दांडेकर, शांता शेळके, राम शेवाळकर, जयंत नारळीकर ...अशा असंख्य लोकप्रिय व जीवनाच्या अनेक अंगांमधल्या प्रतिभावान लेखकांची नावे आहेत. या सा‍र्‍यांचासरोजिनी बाबर यांच्याशी जवळचा परिचय तर होताच, पण अतिशय आपुलकी देखील होती. वडील गुरुवर्य श्री कृ.भा.बाबर, म्हणजेच अण्णा असेपर्यंत मालेचे २८५ अंक निघाले. त्यानंतरही सरोजिनी बाबर यांनी नेटाने प्रकाशन चालू ठेवले. आणि ५५० पुस्तकांचा मनोरा उभा राहिला. या प्रकाशन सोहळ्याला महमहोपाध्याय द.वा. पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे विद्वान, साहित्यिक, राजकीय पुढारी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून असत. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, मधुकरराव चौधरी, ना.ग .गोरे, राजाराम बापू पाटील, मोहन धारिया, शरद पवार, नंदिनी सत्पथी असे काही पुढारी, शंतनुराव किर्लोस्कर, बी.जी. शिर्के यांच्यासारखे उद्योगपती आवर्जून येत असत. प्रौढ शिक्षणाचे समाज शिक्षण मालेने केलेले काम हे खरोखरीचे एकमेवाद्वितीय असेच आहे.
  • समाज शिक्षण प्रकाशन : या प्रकाशनाने सरोजिनी बाबर यांची अनेक पुस्तके प्रकाशित केली.

सरोजिनी बाबर यांची पुस्तके

कादंबर्‍या

  • अजिता (१९५३)
  • आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
  • इथं गोष्ट संपली
  • कमळाचं जाळं (१९४६)
  • तू भेटायला नको होतास
  • स्वयंवर (१९७९)
  • हिरवा चुडा

कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह

  • आमची गाणी
  • काळी मखमल
  • कुलाचार
  • खिरापत
  • खुणेची पाने
  • गुलाबकळी
  • ग्रामलक्ष्मी
  • चंद्राची भारजा
  • चिंचेची पत्रावळी
  • झालं गेलं सांगते
  • डोंगरची मैना
  • देवदर्शन
  • धरित्रीच्या लेकी
  • नवलाख तारांगण
  • नवलाखी हार
  • नव्याची पुनव
  • निरशा दुधाची घागर
  • निळे डोळे
  • पाटपाणी
  • भांगातुरा
  • भिंगरी
  • भूक लाडू तहान लाडू
  • मंगलाक्षता
  • महिला मंडळ
  • मानवी प्रवास
  • माहेरचा चंद्र
  • मी माझ्या घरची
  • मुक्तांगणं
  • यशोधरा
  • राधाई
  • राही रुक्मिणी
  • रुखवत
  • सुशोभन
  • स्थित्यंतर
  • स्वारी सुखात आहे

काव्यसंग्रह

  • चाफेकळी
  • झोळणा (१९६४)

महिलांविषयक

  • मराठीतील स्त्रीधन
  • वनिता सारस्वत (१९६१)
  • स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  • स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)

बालवाङ्मय

  • काचेची पेन्सील
  • जम्माडी जम्मत : भाग १ आणि २
  • बालनाटिका : भाग १ ते ४
  • भारतीय स्त्रीरत्‍ने : भाग १ ते ४

इतर

  • भारतीय स्त्री शिक्षण संस्था
  • भाषा व संस्कृती
  • मराठी लोककथा
  • महाराष्ट्र : लोकसंस्कृती व साहित्य
  • रेशीम गाठी
  • लोकगीतातील सगे सोयरे
  • लोकसाहित्य शब्दकोश

संपादने

  • आदिवासींचे सण-उत्सव
  • एक होता राजा
  • कारागिरी (१९९२)
  • कुलदैवत
  • छंद माझा आगळा
  • जनलोकांचा सामवेद
  • जाई मोगरा
  • जा माझ्या माहेरा
  • तीर्थांचे सागर
  • दसरा दिवाळी
  • नंदादीप
  • नादब्रम्ह
  • बाळराजे
  • भोंडला भुलाबाई
  • महाराष्ट्र लोकसाहित्य माला : ए्कूण ५ भाग
  • मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
  • रांगोळी
  • राजविलासी केवडा
  • लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती - संमेलन वृतांत
  • लोकसाहित्य - भाषा आणि संस्कृती
  • लोकसाहित्य : शब्दकोश
  • लोकसाहित्य साजशिणगार
  • वसंतदादा गौरव ग्रंथ
  • वैजयंती
  • श्रावण भाद्रपद
  • समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
  • सांगीवांगी
  • स्त्रियांचे खेळ आणि गाणी

सहसंपादित केलेली पुस्तके

  • इयत्ता ७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
  • एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
  • साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : डॉ.वि.म.कुलकर्णी).
  • सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी

आत्मचरित्र

  • माझ्या खुणा माझ्या मला

मुलाखत

मुंबई दूरदर्शनवरून २३ डिसेंबर १९८४ ला प्रक्षेपित झालेली "प्रतिभा आणि प्रतिमा" यामध्ये डॉ .सरोजिनी बाबर यांची श्री सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत अतिशय दर्जेदार अशी झाली.

भूषविलेली पदे

  • १९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
  • १९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
  • १९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य

सन्मान व पुरस्कार

  • २५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.
  • ५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
  • ७ सप्टेंबर १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
  • ३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
  • २६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
  • १० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
  • २३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
  • पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गौरव
  • मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार
  • जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यात डॉ.सरोजिनी बाबर यांनाही आवर्जून आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
  • १ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
  • १२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
  • २७ डिसेंबर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.

संदर्भ

  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १०३. ISBN 978-81-7425-310-1. Missing or empty |title= (सहाय्य)