"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २३: ओळ २३:
==वाक्यसंश्लेषण ==
==वाक्यसंश्लेषण ==


(वाक्य संकलन) :एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवलवाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात.
(वाक्य संकलन) : एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात. यात तीन प्रकार आहेत.
#दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे

दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे
#दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
#दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.
दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.


== संदर्भ व नोंदी ==
== संदर्भ व नोंदी ==

१७:५६, २१ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

'पूर्ण अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्दव्याकरण) एक आहे.

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतो. ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद आणि शब्दात फरक आहे. मराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषत: नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. (उदा० बदक-> बदका ->बदकाला). हिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) मराठीतील एक पद हे एका शब्दाचे बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेवून) वाक्य बनते.

केवल वाक्य

ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात [१]

उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.

वरील वाक्यात एकेकच विधान आहे. म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश (कर्ता-Subject) व एकच विधेय (Predicate) आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी' ही उद्देशे आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो आमुच्या गावा' व दुसऱ्या वाक्यात 'लढता लढता मेला' ही विधेये आहेत.[१]

मिश्र वाक्य

एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात आणि तेव्हा मोर नाचू लागतो.

आकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.

संयुक्त वाक्य

दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

वाक्यसंश्लेषण

(वाक्य संकलन) : एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात. यात तीन प्रकार आहेत.

  1. दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे
  2. दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
  3. दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै. मो.रा. वाळंबे, पृ.क्र. १२२ वर