"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''जैन धर्म''' हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरुप व वैदीक परंपरेसारखा प्राचीन आहे, हे पुराव्याने सिद्ध झाले आहे जैन धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आलेला असून तो आता एक स्वतंत्र धर्म आहे. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करणार आहे. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादा मधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केलं. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचं काम त्यांच्या काळामध्ये झालं. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. |
'''जैन धर्म''' हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरुप व वैदीक परंपरेसारखा प्राचीन आहे, हे पुराव्याने सिद्ध झाले आहे जैन धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आलेला असून तो आता एक स्वतंत्र धर्म आहे. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करणार आहे. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादा मधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केलं. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचं काम त्यांच्या काळामध्ये झालं. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये 62 धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये झरतृष्ट हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उद्याला आले असे मानले जाते. मात्र जैन धर्माला अति प्राचीन काळाची परंपरा लाभलेली आहे. |
||
{{संदर्भ हवा}} |
{{संदर्भ हवा}} |
||
२१:२०, १० ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरुप व वैदीक परंपरेसारखा प्राचीन आहे, हे पुराव्याने सिद्ध झाले आहे जैन धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आलेला असून तो आता एक स्वतंत्र धर्म आहे. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करणार आहे. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादा मधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केलं. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचं काम त्यांच्या काळामध्ये झालं. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये 62 धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये झरतृष्ट हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उद्याला आले असे मानले जाते. मात्र जैन धर्माला अति प्राचीन काळाची परंपरा लाभलेली आहे. [ संदर्भ हवा ]
जैन धर्म | |
---|---|
This article is part of a series on जैन धर्म | |
नवकार मंत्र · अहिंसा · | |
ब्रम्हचर्य · सत्य · निर्वाण · | |
अस्तेय · अपरिग्रह · अनेकान्तवाद | |
केवलज्ञान · त्रैलोक्यविज्ञान · संसार · | |
कर्म · धर्म · मोक्ष · | |
गुणस्थान · नवतत्व | |
२४ तिर्थंकर · रिषभ · | |
महावीर · आचार्य · गंगाधर · | |
सिद्धसेन दिवाकर · हरीभद्र | |
भारत · पाश्चिमात्य | |
श्वेतांबर · दिगांबर · तेरापंथी · | |
Early Jainist schools · स्थानकवास · | |
बिसापंथ · डेरावासी | |
कल्पसूत्र · Agama · | |
Tattvartha Sutra · सन्मती प्रकरण | |
Timeline · विषयांची यादी | |
Parasparopagraho Jīvānām परस्परोपग्रहो जीवानाम्[मराठी शब्द सुचवा] | |
या साचाचे संपादन | |
(संपादन · बदल) | |
जैन धर्म दालन |
जैन धर्माचे तत्त्वज्ञान
- जीव -जैन धर्मानुसार जीव हा चैतन्यमय आहे. जीव अविनाशी आहे. जीव हा देव, मनुष्य, पक्षी, पशू इ. विविध रूपात जन्म घेतो.
- अजीव - अजीवाचे धर्म, अधर्म, आकाश, पुदगल, काल, हे पाच प्रकार आहेत. अजीव हे चैतन्यविरहित आहेत. जीव व पाच प्रकारचे अजीव मिळून सहा द्रव्ये तयार होतात. जैनांच्या मते कोणत्याही द्रव्याची तीन अंगे असतात. जैन दर्शनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्शनात धर्म व अधर्म हे अजीव पदार्थ मानलेले नाहीत.
- पाप, पुण्य- पुण्य म्हणजे,जीवाशी संबंध असलेला व जीवाला स्वर्ग, ऐश्वर्य, इ.चांगले फळ मिळवून देणारा कर्म-समुदाय. पाप म्हणजे पुण्याच्या विपरीत असा कर्मसमुदाय. त्याची ८२ कारणे आहेत. त्यांनाच 'आश्रव' असे नाव आहे.
- ज्ञान-जैन तत्त्वानुसार ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष व अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान आत्मा कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते. परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा इंद्रियाद्वारा वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान.
- 'अहिंसा परमो धर्मः' हा मुख्य नियम या धर्मात मानला जातो.
- स्यादवाद - एखाद्या वस्तूसंबंधी किंवा विषयासंबंधी विचार करतांना ७ वेगवेगळ्या प्रकारे तो विचार मांडता येतो. हा सिद्धान्त सप्तभंगी सिद्धान्त म्हणून ओळखला जातो.
- स्यादस्ति - शक्य आहे, की ते आहे,
- स्यान्नास्ति - शक्य आहे, की ते नाही,
- स्यादस्ति च नास्ति च - शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
- स्यादव्यक्तव्यम् - शक्य आहे, की ते अवक्तव्य आहे,
- स्यादस्ति च अव्यक्तव्यं च - शक्य आहे, की ते आहे, आणि अवक्तव्य आहे,
- स्यान्नास्ति च अव्यक्तव्यं च - शक्य आहे, की ते नाही, आणि अवक्तव्य आहे,
- स्यादस्ति च नास्ति चाव्यक्तं च - शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अवक्तव्य आहे.[ संदर्भ हवा ]
- धर्म आणि संस्कृती ही उत्क्रांत मानवी जीवनाची प्रधान अंगे आहेत्.
पंचमहाव्रते
- सत्यं - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे.
- अहिंसा - अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची मन, वचन अथवा कायेद्वारे हत्या करू नये.
- अस्तेयं - अस्तेय म्हणजे चोरी करू नये.
- अपरिग्रह - अपरिग्रह म्हणजे द्रव्यसंग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा.
- ब्रह्मचर्य - मनामध्ये कामवासना बाळगू नये.
तीन गुणव्रते
- दिग्व्रत -
- कालाव्रत -
- अनर्थदंडव्रत
चार शिक्षाव्रते
- सामायिक
- प्रोषधोपवास
- भोगोपभोग परिणाम
- अतिथी संविभाग
जैन धर्मातील पंथ
- दिगंबर पंथ -
- श्वेतांबर पंथ -
- स्थानकवासी (उपपंथ)
तीर्थंकर
जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले त्यांची नावे -
- श्री वृषभनाथ भगवान
- श्री अजितनाथ भगवान
- श्री संभवनाथ भगवान
- श्री अभिनंद भगवान
- श्री सुमतिनाथ भगवान
- श्री पद्मप्रभ भगवान
- श्री सुपार्श्वनाथ भगवान
- श्री चंद्रप्रभ भगवान
- श्री पुष्पदंत भगवान
- श्री शीतलनाथ भगवान
- श्री श्रेयांसनाथ भगवान
- श्री वासुपूज्य भगवान
- श्री विमलनाथ भगवान
- श्री अनंतनाथ भगवान
- श्री धर्मनाथ भगवान
- श्री शांतिनाथ भगवान
- श्री कुन्थुनाथ भगवान
- श्री अरहनाथ भगवान
- श्री मल्लीनाथ भगवान
- श्री मुनिसुव्रतनाथ भगवान
- श्री नमीनाथ भगवान
- श्री नेमीनाथ भगवान
- श्री पार्श्वनाथ भगवान -
दिगंबर आणि श्वेतांबर परंपरेनुसार २३वे तिर्थंकर यांची शासन देवता पद्मावती हि होय. दोन हातांच्या प्रतिमेत अथवा नमस्कार मुद्रा या स्थितीत पद्मावती दिसते.
- श्री वर्धमान महावीर भगवान