"कुसुमावती देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
Misslinius (चर्चा | योगदान) |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
== निधन == |
== निधन == |
||
१९६१ ला ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. त्या संमेलनानंतर महिन्याभरातच १७ नोव्हेंबर १९६१ या दिवशी कुसुमावतीबाईंचं हृदयक्रिया बंद पडून निधन झालं. |
|||
एका कार्यक्रमाला कवी अनिल गेले होते. परत आल्यावर घराचे दार वाजवले पण काहीच प्रतिसाद आला नाही. |
|||
<ref>{{स्रोत बातमी|last1=भागवत|first1=डॉ. गीता|शीर्षक=अनिलांची रुसलेली ‘प्रिया’|दुवा=https://www.loksatta.com/chaturang-news/atmaram-ravaji-deshpande-original-poem-abn-97-1966263/|अॅक्सेसदिनांक=7 सप्टेंबर 2019}}</ref> |
|||
अनिलाना वाटले नेहमी सारखी आपली प्रिया रुसून बसली आहे.रात्रभर अनिल बाहेरच थांबले. पण नंतर दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांची जीवनसंगीनी चिरनिद्रेत गेली होती.जिच्या सोबतीने आयुष्य काढण्याची शपथ घेतली होती तिचा निष्प्राण देह बघून नशिबी हे काय आलं? या विचाराने अनिल पूर्ण कोसळून गेले.तेव्हा अनिलांच्या लेखणीतून ही कविता उमटली. |
|||
ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ [[कुमार गंधर्व]] गातील असा अनिलांचा आग्रह होता. त्याप्रमाणे ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरात गायली आणि अमर केली. |
|||
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना |
|||
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! |
|||
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे |
|||
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे |
|||
ते आज का नसावे, समजावणी पटे ना |
|||
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! |
|||
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे |
|||
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ? |
|||
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना |
|||
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना ! |
|||
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग |
|||
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? |
|||
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? |
|||
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! |
|||
कवि - आ. रा. देशपांडे ’अनिल’ |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
०४:२९, १२ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कुसुमावती आत्माराम देशपांडे | |
---|---|
जन्म नाव | कुसुम रामकृष्ण जयवंत |
जन्म |
१० नोव्हेंबर १९०४ अमरावती |
मृत्यू |
१७ नोव्हेंबर १९६१ २६ ,मीना बाग , दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | दीपमाळ |
वडील | रामकृष्ण रावजी जयवंत |
आई | सीताबाई रामकृष्ण जयवंत |
पती | आत्माराम रावजी देशपांडे |
अपत्ये | किशोर , शिरीष , उल्हास , अभय |
कुसुमावती देशपांडे (माहेरचे नाव कुसुम जयवंत) (जन्म : अमरावती, १० नोव्हेंबर, १९०४; मृत्यू : नागपूर, १७ नोव्हेंबर, १९६१) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या. त्यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे. कुसुमावती यांचे वडील अमरावतीत वकिली करत. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) हे त्यांचे पती होत.
शिक्षण
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून १९२१ साली मॅट्रिक झाल्यावर त्या दोन वर्षे पुण्याच्याच फर्ग्युसन कॉलेजात होत्या. त्यानंतर नागपूरला जाऊन त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९२६ साली बी.ए.ची पदवी घेतली. इंग्रजी वाङ्मयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडमधील वेस्टफील्ड कॉलेजात दाखल झाल्या. तेथून त्या १९२९ साली बी.ए.(इंग्रजी वाङ्मय) झाल्या.
कारकीर्द
नवी दिल्ली येथे त्या आकाशवाणीवरील स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या एक प्रमुख निर्मात्या होत्या.
"पासंग" या १९५४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.
विवाह
१९२९ साली त्यांचे कवी अनिल यांच्याशी लग्न झाले. हा प्रेमविवाह होता. जात वेगळी असल्याने घरातून झालेला प्रचंड विरोध सहन करून हे लग्न झाले.
निधन
१९६१ ला ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. त्या संमेलनानंतर महिन्याभरातच १७ नोव्हेंबर १९६१ या दिवशी कुसुमावतीबाईंचं हृदयक्रिया बंद पडून निधन झालं. [१]
प्रकाशित साहित्य
- कुसुमानिल (कुसुमावती आणि पती अनिल यांच्यामधील पत्रांचा संग्रह)
- दीपकळी (१९३४)
- दीपदान (१९४०)
- दीपमाळ
- पासंग (१९५४)
- मराठी कादंबरी (पहिले शतक) (१९५३)
- मोळी (१९४५)
गौरव
- २६ ते २९ ऑक्टोबर १९६१ या कालावधीत ग्वाल्हेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. १८७८ साली सुरू झालेल्या या संमेलन परंपरेत पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
- डॉ. अनंत देशमुख यांनी कुसुमावती देशपांडे यांच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास करणारा ’कुसुमावती देशपांडे’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
- ^ भागवत, डॉ. गीता. https://www.loksatta.com/chaturang-news/atmaram-ravaji-deshpande-original-poem-abn-97-1966263/. 7 सप्टेंबर 2019 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)