"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ १५८: ओळ १५८:
# प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
# प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
# आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
# आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
# शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
#[[शस्त्रक्रिया]] होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
# घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
# घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
# माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
# माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!

१४:०९, २५ जुलै २०१८ ची आवृत्ती

वसंत पुरुषोत्तम काळे
जन्म नाव वसंत पुरुषोत्तम काळे
टोपणनाव वपु, व.पु. काळे
जन्म मार्च २५, इ.स. १९३२
मृत्यू जून २६, इ.स. २००१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र स्थापत्यशास्त्र, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा
कादंबरी
कथाकथन
प्रसिद्ध साहित्यकृती ही वाट एकटीची, पार्टनर
प्रभाव ओशो रजनीश
वडील पुरुषोत्तम काळे
पुरस्कार पु.भा. भावे

वसंत पुरुषोत्तम काळे (मार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र), व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.
वसंत पुरुषोत्तम काळे, अर्थात व.पु. काळे, मराठी भाषेतील खुूूप प्रसिद्ध असे लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.

जीवन

वसंत पुरुषोत्तम काळे पेशाने वास्तुविशारद [श १] होते.

जून २६, इ.स. २००१ रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले.

प्रकाशित साहित्य


साहित्यकृतीचे नाव प्रकाशनवर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशक
आपण सारे अर्जुन वैचारिक
इन्टिमेट कथासंग्रह
ऐक सखे कथासंग्रह
कथा कथनाची कथा ललित
कर्मचारी कथासंग्रह
का रे भुललासी कथासंग्रह
काही खरं काही खोटं कथासंग्रह
गुलमोहर कथासंग्रह
गोष्ट हातातली होती! कथासंग्रह
घर हलवलेली माणसे कथासंग्रह
चिअर्स व्यक्तिचित्र
झोपाळा कथासंग्रह
ठिकरी कादंबरी
तप्तपदी कथासंग्रह
तू भ्रमत आहासी वाया कादंबरी
दुनिया तुला विसरेल ललित
दोस्त कथासंग्रह
निमित्त ललित
पाणपोई ललित
पार्टनर कादंबरी
प्रेममयी ललित(?)
प्लेझर बाँक्स भाग १ आणि २ पत्रसंग्रह
फॅन्टसी - एक प्रेयसी ललित
बाई, बायको आणि कॅलेंड‍र कथासंग्रह
भुलभुलैय्या कथासंग्रह
महोत्सव कथासंग्रह
माझं माझ्यापाशी? ललित
माणसं व्यक्तिचित्र
मायाबाजार कथासंग्रह
मी माणूस शोधतोय कथासंग्रह
मोडेन पण वाकणार नाही कथासंग्रह
रंगपंचमी ललित
रंग मनाचे कथासंग्रह
लोंबकळणारी माणसं कथासंग्रह
वन फॉर द रोड कथासंग्रह
वलय कथासंग्रह
वपु ८५ कथासंग्रह
वपुर्झा ललित
वपुर्वाई कथासंग्रह
सखी कथासंग्रह
संवादिनी कथासंग्रह
स्वर कथासंग्रह
सांगे वडिलांची कीर्ती व्यक्तिचित्र
ही वाट एकटीची कादंबरी
हुंकार कथासंग्रह
तप्तपदी कादंबरी(?)

पुरस्कार व सन्मान

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

व. पु. काळे यांचे विचार

  1. मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
  2. संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
  3. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
  4. जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!
  5. खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
  6. प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
  7. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
  8. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
  9. घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
  10. माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
  11. बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
  12. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
  13. पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
  14. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
  15. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
  16. आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
  17. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
  18. संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
  19. अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
  20. वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
  21. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
  22. सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  23. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
  24. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
  25. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
  26. गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
  27. अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
  28. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!
  29. आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

पारिभाषिक शब्द

  1. ^ वास्तुविशारद (इंग्लिश: Architect, आर्किटेक्ट)

http://vapurzaa.blogspot.in/

बाह्य दुवे

विकिक्वोट
विकिक्वोट
व.पु. काळे हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.
  • http://www.vapurzaa.blogspot.com. Missing or empty |title= (सहाय्य)