"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
===काढणी=== |
===काढणी=== |
||
बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची एक दिवसाआड तोडणी करतात. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अन् तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवल्यस उत्तम. |
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत= बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची एक दिवसाआड तोडणी करतात. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अन् तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवल्यस उत्तम.}} |
||
==भेंडीच्या जाती== |
==भेंडीच्या जाती== |
१०:१२, १ जून २०१८ ची आवृत्ती
भेंडी (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅलशियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते. महाराष्ट्रामध भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्हाळयात भाज्यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी-९०%, प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स - ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ' - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ % आहेत.
भेंडीची लागवड
हंगाम
भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता बी टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरतात.
हवामान
या पिकास २० अंश ते ४० अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य मानले जाते. ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात फुलांची गळ होऊ शकते. तर दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
खत व पाणी
जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळतात. तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश देणे उत्तम. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र व लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी देतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी देतात. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी व हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी दिल्यास पुरते.
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करून पिकाला मातीची भर देतात. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घॆतात. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.
काढणी
भेंडीच्या जाती
फायदे
- भेंडी सेवन केल्याने कॅन्सर होत नाही
- भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते
- डायबेटीज होण्याची शक्यता नसते
- भेंडी अॅनिमियामध्ये फारच लाभदायक असते
- पोटफुगी, बद्धकोष्ट, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
- हाडे मजबूत होतात
- वजन घटण्यास मदत होते
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
- मेंदूचे कार्य सुधारते
- गरोदर स्त्रियांसाठी उत्तम
संदर्भ
http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies
http://www.drbawasakartechnology.com/m-June2013-BhendiLagwad.html#.Wuh5wuhubrc
http://www.thehealthsite.com/marathi/fitness/health-benefits-of-ladys-finger-in-marathi-l715/