"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ५९: | ओळ ५९: | ||
* पडघम |
* पडघम |
||
* प्रलय |
* प्रलय |
||
* प्रेमाची गोष्ट |
* प्रेमाची गोष्ट ? |
||
* मी जिंकलो मी हरलो |
* मी जिंकलो मी हरलो |
||
* वेटिंग फॉर गोदो |
* वेटिंग फॉर गोदो |
||
* |
* शीतयुद्ध सदानंद |
||
* सापत्नेकराचे मूल |
* सापत्नेकराचे मूल |
||
* सूर्य पाहिलेला माणूस |
* सूर्य पाहिलेला माणूस |
||
* क्षितिज |
* क्षितिज |
||
* समाजस्वास्थ्य |
|||
==अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके== |
==अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके== |
१४:२६, २२ मे २०१८ ची आवृत्ती
अतुल पेठे | |
---|---|
जन्म | अतुल पेठे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
अतुल सदाशिव पेठे (१४ जुलै, इ.स. १९६४ - ) हे एक मराठी नाट्यलेखक, नाट्यअभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत.
विशेष
- गावातील नाट्यगट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच पेठे त्यांचे नाट्यप्रयोग घडवून आणतात. ते नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतात. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून ‘आरोग्य-संवाद’ या संकल्पनेवर काम करणारे महाराष्ट्रात अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अतुल पेठे यांनी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे अशा समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करून हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशत असा विषयांवरची नाटके अतुल पेठे यांनी स्वीकारली आणि सादर केली. त्यांना या मार्गाने वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत.
- ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील नट नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले.
- ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचं नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले.
- कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजारच्या आसपास प्रयोग झाले.
अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके
- अंक दुसरा
- अवशेष
- आनंदीगावचा गंमतराव (बालनाट्य)
- आविष्कार
- गाणे गुलमोहोराचे
- दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य)
- चेस
- डायरीची दहा पाने
- पाऊस आता थांबलाय
- मंथन
- यात्रा
- शीतयुद्ध सदानंद (श्याम मनोहरांच्या कादंबरीचे
नाट्यरूपांतर)
- शोध अंधार अंधार
- क्षितिज (एकांकिका)
- दलपतसिंग येती गावा (सहलेखक)
अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके
- अतिरेकी
- घाशीराम कोतवाल
- चेस (एकांकिका)
- पडघम
- प्रलय
- प्रेमाची गोष्ट ?
- मी जिंकलो मी हरलो
- वेटिंग फॉर गोदो
- शीतयुद्ध सदानंद
- सापत्नेकराचे मूल
- सूर्य पाहिलेला माणूस
- क्षितिज
- समाजस्वास्थ्य
अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
- आनंद ओवरी
- आषाढातील एक दिवस
- उजळल्या दिशा (लेखक सदानंद मोरे)
- कचराकोंडी (माहितीपट)
- गोळायुग
- चौक
- दलपतसिंग येती गावा
- सत्यशोधक (लेखक गो.पु. देशपांडे)
- समाजस्वास्थ्य
- सूर्य पाहिलेला माणूस
अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट
- कथा दोन गणपतरावांची
- तेंडुलकर ॲन्ड व्हॉयलन्स
- म्हादू
आत्मचरित्रवजा आठवणी
- नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)
अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार (जानेवारी २०१७)