"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
*भेंडी सेवन केल्याने कँसर होत नाही |
*भेंडी सेवन केल्याने कँसर होत नाही |
||
*भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते |
*भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते |
||
*डायबेटीज होण्याची शक्यता नसते |
*डायबेटीज होण्याची शक्यता नसते |
||
*भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते |
*भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते |
||
*पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही. |
*पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही. |
||
⚫ | |||
⚫ | |||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies |
http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies |
२०:११, १ मे २०१८ ची आवृत्ती
भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली ८१९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते.भेंडीचे पिक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पिक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते. उन्हाळयात भाज्यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
भेंडी लागवड
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू शकते.
हंगाम
भेंडी लागवड खरीप (जून – जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी – फेब्रुवारी) हंगामात करतात. कोकण विभागात भेंडीची लागवड रब्बी हंगामात करता येते. निर्यातीसाठी सतत पुरवठा करण्याकरिता पीक टप्प्या टप्प्यात १५ – २० दिवसाच्या अंतराने पेरावे.
हवामान
या पिकास उष्ण हवामान जास्त मानवते. २० अंश ते ४० अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य मानले जाते. ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात फुलांची गळ होऊ शकते. तर दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
फायदे
- भेंडी सेवन केल्याने कँसर होत नाही
- भेडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते
- डायबेटीज होण्याची शक्यता नसते
- भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते
- पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
- हाड मजबूत होतात