"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ९: ओळ ९:


==स्मृतिग्रंथात मांडलेले विषय==
==स्मृतिग्रंथात मांडलेले विषय==
स्मृतींमध्ये प्रामुख्याने आचार,व्यवहार व प्रायश्चित्त या तीन बाबींचे वर्णन आले आहे.
स्मृतींमध्ये प्रामुख्याने आचार,व्यवहार व प्रायश्चित्त या तीन बाबींचे वर्णन आले आहे.<br />

आचार विषयाच्या संतार्ग्त ब्राह्मण,क्षत्रिय ,वैश्य व शूद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य,गार्हस्थ,वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम यांची कर्तव्य-कर्मे सांगितली आहेत.
आचार विषयाच्या संतार्ग्त ब्राह्मण,क्षत्रिय ,वैश्य व शूद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य,गार्हस्थ,वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम यांची कर्तव्य-कर्मे सांगितली आहेत.विद्यार्थ्यांची राहणी,त्याची दिनचर्या,त्याचे अध्ययनाचे विषय,आचार्याशी त्याची वागणूक ,अनध्याय इ. विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विषयांचे वर्णन स्मृतीत केले आहे.
{{विस्तार}}
{{विस्तार}}



१२:२०, १ जून २०१७ ची आवृत्ती

स्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे. धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे. धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे. मनु, याज्ञवल्क्य, शातातप, हारित, देवल, यम, पारशर यांच्या स्मृती विशेष प्रसिद्ध आहेत. या स्मृतींच्या संख्या शंभराहून जास्त आहे.

मुख्य विचार / स्वरूप

निरनिराळ्या संहितांत विवाह, त्यांचे प्रकार, पुत्रांचे विविध भेद ,दत्तक पुत्राचे विधान, धन विभाग, दायभाग, श्राद्ध, स्त्रीधन इ. विषयांवरील महत्त्वाचे सिद्धान्त आले आहेत, पण ही सर्व माहिती निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आहे. ती सर्व एकत्रित व व्यवस्थितपणे मांडलेली स्मृतिग्रंथात सापडते. स्मृतिग्रंथ हे धर्मशास्त्र विषयक सिद्धांतांत्चे भांडार आहे.[१]

महत्व

धर्मशास्त्राप्रमाणे सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्व आहे.हिंदुंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते. एकूणच भारतीय समाजाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल , तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते.भारतातील व्यवहाराचे म्हणजे कायद्याचे ज्ञान करून घ्यायचे असल्यासही स्मृतींचा अभ्यास आवश्यक आहे.इंग्रजी अमदानीत आणि सांप्रतच्या न्यायालयात दायभागाचे जे नियम केलेले आहेत , ते प्राचीन धर्मशास्त्रावर आधारलेले आहेत.[२]

स्मृतिग्रंथात मांडलेले विषय

स्मृतींमध्ये प्रामुख्याने आचार,व्यवहार व प्रायश्चित्त या तीन बाबींचे वर्णन आले आहे.

आचार विषयाच्या संतार्ग्त ब्राह्मण,क्षत्रिय ,वैश्य व शूद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य,गार्हस्थ,वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम यांची कर्तव्य-कर्मे सांगितली आहेत.विद्यार्थ्यांची राहणी,त्याची दिनचर्या,त्याचे अध्ययनाचे विषय,आचार्याशी त्याची वागणूक ,अनध्याय इ. विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विषयांचे वर्णन स्मृतीत केले आहे.

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा