"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
==महत्व==
==महत्व==
धर्मशास्त्राप्रमाणे सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्व आहे.हिंदुंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते.
धर्मशास्त्राप्रमाणे सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्व आहे.हिंदुंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते.
एकूणच भारतीय समाजाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल , तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

११:५८, १ जून २०१७ ची आवृत्ती

स्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे.धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे.धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे.मनु,याज्ञवल्क्य,शातातप, हारित, देवल ,यम यांच्या स्मृती विशेष प्रसिद्ध आहेत. शंभर पेक्षा अधिक स्मृती आहेत असे आढळून येते.

मुख्य विचार / स्वरूप

निरनिराळ्या संहितात विवाह, त्यांचे प्रकार,पुत्रांचे विविध भेद,दत्तक पुत्राचे विधान धन विभाग, दायभाग , श्राद्ध, स्त्रीधन इ. विषयांवरील महत्वाचे सिद्धांत आले आहेत.पण ही सर्व माहिती निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आहे.ती सर्व एकत्रित व व्यवस्थितपणे मांडलेली स्मृतिग्रंथात सापडते.स्मृतिग्रंथ हे धर्मशास्त्र विषयक सिद्धांतांचे भांडार आहे.[१]

महत्व

धर्मशास्त्राप्रमाणे सामाजिक दृष्टीनेही स्मृतींना खूप महत्व आहे.हिंदुंच्या उपनयन, विवाह इ. सोळा संस्कारांचे वर्णन स्मृतिग्रंथात आढळते. एकूणच भारतीय समाजाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल , तर त्यासाठी स्मृतींचे अध्ययन आवश्यक ठरते.

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा