"वि.मा.दी. पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
बांधणी
ओळ १: ओळ १:
वि.मा. दीक्षित पटवर्धन (जन्म : २८ ऑगस्ट १९०८) हे एक विनोदी लेखन करणारे मराठी लेखक होते. विमादींनी आपल्या विनोदी लेखनाने एके काळी वाचकांना भरपूर हसविले. पटवर्धनांचे वाडवडील सावकारी करत. ब्रिटिशांनी १८०० च्या पुढेमागे हळूहळू काही एकवाक्यता आणेपर्यंतच्या काळात, शेकडो प्रकारची नाणी एकसमयावच्छेदेकरून हिंदुस्तानभर चालत असत. अशी नाणी एकमेकांत बदलून देणे आणि त्यासाठी 'बट्टा' कापून घेणे हे काम सावकार करत असत. उत्तर पेशवाईतील पुण्यात दीक्षित-पटवर्धनांची पेढी हे काम करत असे. ह्या दीक्षित-पटवर्धनांची बाग कोथरूडला होती. तिचेचे प्लॉट पाडून आजची 'पटवर्धन बाग' वसाहत झालेली आहे. मुंबईतल्या गिरगावातील ब्राह्मणसभा ज्या भागात आहे तो सर्व भाग एकेकाळी ह्या दीक्षित-पटवर्धन कुटुंबाच्या मालकीचा होता. त्यांच्या पुण्याच्या पेढीची मुंबईतही एक शाखा होती.
'''वि.मा. दीक्षित पटवर्धन''' तथा '''विमादी''' ([[२८ ऑगस्ट]], [[इ.स. १९०८]] - ??) हे एक विनोदी लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचे वाडवडील सावकारी करत. ब्रिटिशांनी १८०० च्या पुढेमागे हळूहळू काही एकवाक्यता आणेपर्यंतच्या काळात, शेकडो प्रकारची नाणी एकसमयावच्छेदेकरून हिंदुस्तानभर चालत असत. अशी नाणी एकमेकांत बदलून देणे आणि त्यासाठी [[बट्टा]] कापून घेणे हे काम सावकार करत असत. उत्तर पेशवाईतील पुण्यात दीक्षित-पटवर्धनांची पेढी हे काम करत असे. ह्या दीक्षित-पटवर्धनांची बाग [[कोथरूड]]ला होती. तिचेचे प्लॉट पाडून आजची ''पटवर्धन बाग'' वसाहत झालेली आहे. [[मुंबई]]तल्या [[गिरगाव|गिरगावातील]] ब्राह्मणसभा ज्या भागात आहे तो सर्व भाग एकेकाळी ह्या दीक्षित-पटवर्धन कुटुंबाच्या मालकीचा होता. त्यांच्या पुण्याच्या पेढीची मुंबईतही एक शाखा होती.


विमादी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. ते ऑरगॅनिक केमिस्ट्री शिकवीत असत.
मुळात विमादीं हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक. परंतु या रूक्ष विषयाच्या अध्यापनाबरोबरच त्यांनी आपली विनोदप्रियता कायम ठेवली होती. ऑरगॅनिक केमिस्ट्रीसारख्या अवघड विषय विमादीं अत्यंत सुलभपणे शिकवीत असत. असे उत्तम अध्यापनकौशल्य असणार्‍या पटवर्धब सरांच्या तासाची विद्यार्थी आवडीने वाट बघत असत.


प्रसिद्ध लेखक [[पी.जी. वुडहाऊस]] यांचा मानसपुत्र जीव्ह्‌ज याला पटवर्धनांनी मराठी साहित्यात 'जीवा' या नावाने अजरामर केले. 'जीते रहो जीवा' 'जीवाची मर्दुमकी' यासारखी त्यांची पुस्तके त्यावेळी साहित्यात गाजली. मुलांसाठी 'हास्यकळ्या', 'किती हसाल?' ही पुस्तके, 'रत्‍ना' ही कादंबरी, 'साहित्य गुदाम' यासारखे विनोदी लेखांचे पुस्तक ही त्यांची पुस्तके त्यावेळी लोकप्रिय झाली होती.
प्रसिद्ध लेखक [[पी.जी. वुडहाऊस]] यांचा मानसपुत्र ''जीव्ह्‌ज'' याला पटवर्धनांनी मराठी साहित्यात 'जीवा' या नावाने अजरामर केले. त्यांनी ''जीते रहो जीवा'', ''जीवाची मर्दुमकी'' ही पुस्तके तसेच मुलांसाठी 'हास्यकळ्या', 'किती हसाल?' ही पुस्तके, 'रत्‍ना' ही कादंबरी, 'साहित्य गुदाम' यासारखे विनोदी लेखांचे पुस्तक ही त्यांची पुस्तके त्यावेळी लोकप्रिय झाली होती.


धारवाडला 'मराठी मंडळ' आणि 'भगिनी समाज' या दोन संस्था त्यावेळी होत्या. दरवर्षी होणार्‍या या संस्थांच्या नाटकांचे दिग्दर्शन ते स्वतः करीत असत.
[[धारवाड]]च्या ''मराठी मंडळ'' आणि ''भगिनी समाज'' या संस्थांच्या दरवर्षी होणार्‍या नाटकांचे दिग्दर्शन ते करीत असत.


वि.मा.दी. पटवर्धन यांचे वास्तव्य नाशिकमध्ये असे. नाशिकच्या Institute of Industrial & Pharmaceutical Technology या संस्थेच्या संकल्पनेत आणि स्थापनेत साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ प्रा; वि.मा.दी. पटवर्धन यांचा सिंहाचा वाटा होता.
वि.मा.दी. पटवर्धन यांचे वास्तव्य [[नाशिक]]मध्ये असे. नाशिकच्या Institute of Industrial & Pharmaceutical Technology या संस्थेच्या संकल्पनेत आणि स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता.


शिवसेनेची मूळ कल्पना आणि प्रेरणा [[बाळ ठाकरे]] यांना नाशिकमधूनच मिळाली. शिवसेना स्थापन करण्यापूर्वी बाळासाहेब नाशिकला वि.मा.दी पटवर्धन यांच्याकडे येत असत. त्यांच्या चर्चेत मराठी माणसाच्या हिताचे संरक्षण करणारी एखादी संघटना असावी व तिचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांनी करावे असे विमादी म्हणत असत. यावर या दोघांनी अनेकदा खल केला आणि त्यातूनच १९६६ साली शिवसेनेचा महाराष्ट्राच्या नकाशावर उदय झाला.
शिवसेनेची मूळ कल्पना आणि प्रेरणा [[बाळ ठाकरे]] यांना नाशिकमधूनच मिळाली. शिवसेना स्थापन करण्यापूर्वी बाळासाहेब नाशिकला वि.मा.दी पटवर्धन यांच्याकडे येत असत. त्यांच्या चर्चेत मराठी माणसाच्या हिताचे संरक्षण करणारी एखादी संघटना असावी व तिचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांनी करावे असे विमादी म्हणत असत. यावर या दोघांनी अनेकदा खल केला आणि त्यातूनच १९६६ साली शिवसेनेचा महाराष्ट्राच्या नकाशावर उदय झाला.{{संदर्भ हवा}}


मेनका प्रकाशनचे [[पु.वि. बेहेरे]] ऊर्फ [[राजाभाऊ बेहेरे]] यांच्या सुविद्य पत्‍नी [[सुमनताई बेहेरे]], या विमादींच्या कन्या.
मेनका प्रकाशनचे [[पु.वि. बेहेरे]] ऊर्फ [[राजाभाऊ बेहेरे]] यांच्या सुविद्य पत्‍नी [[सुमनताई बेहेरे]], या विमादींच्या कन्या होत.


==वि.मा.दी. पटवर्धनांनी लिहिलेली पुस्तके==
==पुस्तके==
* किती हसाल?
* किती हसाल?
* जीते रहो जीवा (अनुवादित)
* जीते रहो जीवा (अनुवादित)
ओळ २७: ओळ २७:
* शिवराज गोर्ले (नग आणि नमुने)
* शिवराज गोर्ले (नग आणि नमुने)


{{DEFAULTSORT:दीक्षित पटवर्धन, वि}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]

००:२१, २५ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

वि.मा. दीक्षित पटवर्धन तथा विमादी (२८ ऑगस्ट, इ.स. १९०८ - ??) हे एक विनोदी लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचे वाडवडील सावकारी करत. ब्रिटिशांनी १८०० च्या पुढेमागे हळूहळू काही एकवाक्यता आणेपर्यंतच्या काळात, शेकडो प्रकारची नाणी एकसमयावच्छेदेकरून हिंदुस्तानभर चालत असत. अशी नाणी एकमेकांत बदलून देणे आणि त्यासाठी बट्टा कापून घेणे हे काम सावकार करत असत. उत्तर पेशवाईतील पुण्यात दीक्षित-पटवर्धनांची पेढी हे काम करत असे. ह्या दीक्षित-पटवर्धनांची बाग कोथरूडला होती. तिचेचे प्लॉट पाडून आजची पटवर्धन बाग वसाहत झालेली आहे. मुंबईतल्या गिरगावातील ब्राह्मणसभा ज्या भागात आहे तो सर्व भाग एकेकाळी ह्या दीक्षित-पटवर्धन कुटुंबाच्या मालकीचा होता. त्यांच्या पुण्याच्या पेढीची मुंबईतही एक शाखा होती.

विमादी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. ते ऑरगॅनिक केमिस्ट्री शिकवीत असत.

प्रसिद्ध लेखक पी.जी. वुडहाऊस यांचा मानसपुत्र जीव्ह्‌ज याला पटवर्धनांनी मराठी साहित्यात 'जीवा' या नावाने अजरामर केले. त्यांनी जीते रहो जीवा, जीवाची मर्दुमकी ही पुस्तके तसेच मुलांसाठी 'हास्यकळ्या', 'किती हसाल?' ही पुस्तके, 'रत्‍ना' ही कादंबरी, 'साहित्य गुदाम' यासारखे विनोदी लेखांचे पुस्तक ही त्यांची पुस्तके त्यावेळी लोकप्रिय झाली होती.

धारवाडच्या मराठी मंडळ आणि भगिनी समाज या संस्थांच्या दरवर्षी होणार्‍या नाटकांचे दिग्दर्शन ते करीत असत.

वि.मा.दी. पटवर्धन यांचे वास्तव्य नाशिकमध्ये असे. नाशिकच्या Institute of Industrial & Pharmaceutical Technology या संस्थेच्या संकल्पनेत आणि स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता.

शिवसेनेची मूळ कल्पना आणि प्रेरणा बाळ ठाकरे यांना नाशिकमधूनच मिळाली. शिवसेना स्थापन करण्यापूर्वी बाळासाहेब नाशिकला वि.मा.दी पटवर्धन यांच्याकडे येत असत. त्यांच्या चर्चेत मराठी माणसाच्या हिताचे संरक्षण करणारी एखादी संघटना असावी व तिचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांनी करावे असे विमादी म्हणत असत. यावर या दोघांनी अनेकदा खल केला आणि त्यातूनच १९६६ साली शिवसेनेचा महाराष्ट्राच्या नकाशावर उदय झाला.[ संदर्भ हवा ]

मेनका प्रकाशनचे पु.वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे यांच्या सुविद्य पत्‍नी सुमनताई बेहेरे, या विमादींच्या कन्या होत.

पुस्तके

  • किती हसाल?
  • जीते रहो जीवा (अनुवादित)
  • जीवाची मर्दुमकी (अनुवादित)
  • पेल्यातील वादळे (कथासंग्रह)
  • रत्‍ना (कादंबरी)
  • साहित्यगुदाम (विनोदी लेखसंग्रह)

पुरस्कार

सावानातर्फे विनोदी लेखन करणार्‍या मराठी लेखकाला विमादी पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले लेखक आणि त्यांचे पुस्तक :

  • विजय कापडी (लालूचा घोडा. - २००९)
  • मंगेश तेंडुलकर (संडे मूड)
  • शिवराज गोर्ले (नग आणि नमुने)