"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५५: | ओळ ५५: | ||
===इतर पुस्तके=== |
===इतर पुस्तके=== |
||
* आकाशाशी जडले नाते |
* आकाशाशी जडले नाते |
||
* आत्मचरित्र |
|||
* गणितातील गमतीजमती |
* गणितातील गमतीजमती |
||
* चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र) |
|||
* नभात हसरे तारे |
* नभात हसरे तारे |
||
* विज्ञानाची गरुडझेप |
* विज्ञानाची गरुडझेप |
२०:०५, १९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
जयंत नारळीकर | |
जयंत नारळीकर | |
पूर्ण नाव | जयंत विष्णू नारळीकर |
जन्म | जुलै १९, १९३८ कोल्हापूर |
निवासस्थान | भारत |
नागरिकत्व | भारतीय |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यसंस्था | केंब्रिज विद्यापीठ टाटा मूलभूत संशोधन संस्था आयुका |
प्रशिक्षण | बनारस हिंदू विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठ |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | फ्रेड हॉईल |
वडील | विष्णू वासुदेव नारळीकर |
आई | सुमती विष्णू नारळीकर |
पत्नी | मंगला जयंत नारळीकर |
अपत्ये | गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या) |
जयंत विष्णू नारळीकर (जुलै १९, १९३८ - हयात) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत.
जीवन
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
संशोधन
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
साहित्यातील भर
विज्ञानकथा पुस्तके
- अंतराळातील भस्मासुर
- अभयारण्य
- टाइम मशीनची किमया
- प्रेषित
- यक्षांची देणगी
- याला जीवन ऐसे नाव
- वामन परत न आला
- व्हायरस
इतर पुस्तके
- आकाशाशी जडले नाते
- गणितातील गमतीजमती
- चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)
- नभात हसरे तारे
- विज्ञानाची गरुडझेप
- विश्वाची रचना
- विज्ञानाचे रचयिते
पुरस्कार
- १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
- २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
- २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
- त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
- २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
- जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
- ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
बाह्य दुवे