"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ ३८: ओळ ३८:


अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं |
अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं |

शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा||
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा||

एतानि नव नावानी नागानां च महात्मनां|
एतानि नव नावानी नागानां च महात्मनां|

सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः||
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः||

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् |
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् |



१७:०८, २२ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

चित्र:नाग.jpg
नाग

नाग हा विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशियाआफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे.

नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.

नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडे इतर छोटे प्राणीपक्षी[१] आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकऱ्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रु माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगुस, गरुड, कोल्हे, खोकड, अस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.[२] . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.

नागाच्या उपजाती

चित्र:नागाचा १०चा आकडा.jpg
नागाचा १०चा आकडा

भारतीय नाग (Naja naja naja)नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो भारतातील हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे वावर सर्वत्र असतो.

काळा नाग (Naja naja karachiensis) ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने पाकिस्तानराजस्थान मध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो.

शून्य आकडी नाग प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्यचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागा सारख्याच आहेत.

थुंकणारा नाग हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनामचीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवास्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेउन हा भक्ष्याची शिकार साधतो. डिस्कव्हरी चॅनेल वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे.

नागराज

नागराज हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार हा साप लांबीला पाच ते साडेपाच मीटर लांबीला असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. विषारी असला तरी घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येइपर्यंत अंड्याचे रक्षण करतो.

नागाचे विष

दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात त्यामुळे नागाचे विष हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखिल होउ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास असमर्थ होतात. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते दीड दिवसापर्यंत जाऊ शकतो.

प्रतिविष

नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार )प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते [३].

भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान

गारुड्याकडील नाग

भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पुजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारूडी लोक गावागावात फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. सांगली जिल्ह्यामधील ३२ शिराळा या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो[४]. हजारो नाग या दिवसाकरीता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. अजूनही यावर कायदा केला गेला नाही. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हिंदू देवता शंकर यांनी सागरमंथना नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले अशी कथा आहे. विष्णू हे सदैव शेषनागाच्या शय्येवर विश्राम घेत असतात असे पुराणात सांगितले आहे[५].

हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे.ते स्तोत्र खालीलप्रमाणे-

अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं |

शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा||

एतानि नव नावानी नागानां च महात्मनां|

सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः||

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् |

यात नागांच्या नऊ प्रकारच्या नावांचा किंवा जातींचा उल्लेख येतो.

गैरसमज

नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे[६]

  • नाग दूध पितो- वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही त्यामुळे नाग दूध पीत नाही.
  • नाग गारुड्याच्या पुंगीपुढे नाचतो(डोलतो) - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारूडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारूडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.
  • नागीणीला मारले तर नाग त्याचा सूड घेतो.(ग्रामीण भागात याला डूख धरणे असेही म्हणतात.)
  • नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो

चित्रपटातील गैरसमजुती

अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे.

संदर्भ

  • The book of Indian Reptiles - by BNHS
  1. ^ Spectacled or Indian Cobra, Black Pakistan Cobra, Central Asian/Oxus or Brown Cobra
  2. ^ Cobra in India
  3. ^ Mechanism of antivenom
  4. ^ Nagpanchami, Indian Festival
  5. ^ [१]
  6. ^ सापांबद्द्ल गैरसमज