"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ९१: | ओळ ९१: | ||
====साहित्य आणि साहित्यिक==== |
====साहित्य आणि साहित्यिक==== |
||
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]] |
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]] |
||
*मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]]यांनी मराठी संतसाहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे.कै.[[नरहर कुरुंदकर]]मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते.[[नाथराव नेरळकर]]यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली.[[लक्ष्मीकांत तांबोळी]],[[फ.मुं. शिंदे ]]यांनी काव्य तर [[नरेंद्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरी लेखन केले.त्यांची काळोखातील अग्निशिखा कांदबरी |
*मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]]यांनी मराठी संतसाहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे.कै.[[नरहर कुरुंदकर]]मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते.[[नाथराव नेरळकर]]यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली.[[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे ]]यांनी काव्य तर [[नरेंद्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरी लेखन केले.त्यांची काळोखातील अग्निशिखा कांदबरी लोकप्रिरीयतेच्या उत्तुंग शिखरावर आहे.[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक कै.[[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. कै.[[डॉ.लक्ष्मण देशपांडे]]यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. |
||
*’असाही मराठवाडा’(मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ)-:लेखक:डॉ.किरण देशमुख(प्रकाशक:निर्मल प्रकाशन,नांदेड) |
*’असाही मराठवाडा’(मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ)-: लेखक : डॉ.किरण देशमुख(प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड) |
||
*’काळोखातील अग्निशिखा’(ऐतिहासिक कादंबरी)(प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे):हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी-लेखक:[[नरेंद्र नाईक]] |
*’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे):हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी-लेखक:[[नरेंद्र नाईक]] |
||
*’नाटयधर्मी मराठवाडा’-लेखक:त्र्यंबक महाजन. |
*’नाटयधर्मी मराठवाडा’-लेखक:त्र्यंबक महाजन. |
||
*’मराठवाडी माणसं’-लेखक:[[यू. म. पठाण]] |
*’मराठवाडी माणसं’-लेखक : [[यू. म. पठाण]] |
||
*’मराठवाड्यातील लोककथा’-लेखक:[[यू.म. पठाण]] |
*’मराठवाड्यातील लोककथा’-लेखक : [[यू.म. पठाण]] |
||
*’मराठवाड्यातील |
*’मराठवाड्यातील शिलालेख’ -लेखक : [[यू.म. पठाण]] |
||
*’माझा महान मराठवाडा’-लेखक:हेमकांत महामुनी |
*’माझा महान मराठवाडा’- लेखक:हेमकांत महामुनी |
||
===वृत्तपत्रे=== |
===वृत्तपत्रे=== |
||
ओळ १२०: | ओळ १२०: | ||
* शिवराज पाटील चाकुरकर |
* शिवराज पाटील चाकुरकर |
||
* शिवाजीराव निलंगेकर |
* शिवाजीराव निलंगेकर |
||
=====समाजकारण आणि ग्रामीण विकास===== |
=====समाजकारण आणि ग्रामीण विकास===== |
||
* लक्ष्मण गायकवाड |
* लक्ष्मण गायकवाड |
||
* [[मच्छिंद्र गोजमे]] |
* [[मच्छिंद्र गोजमे]] |
||
* ना.य. डोळे |
* ना.य. डोळे |
||
* स्वतंत्र सैनिक भगवंतराव नाईक,[[हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात सहभाग, |
* स्वतंत्र सैनिक भगवंतराव नाईक, [[हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात सहभाग, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ११ दिवस कारावास, इंदिरा बचाव आंदोलनात अटक, कल्हाली गावचे पहिले सरपंच सलग १८ वर्ष(?), कंधार प.स.चे(?) पहिले सदस्य]] |
||
* विठ्ठलराव देशपांडे |
* विठ्ठलराव देशपांडे |
||
* प्रा. मधुकर मुंडे |
* प्रा. मधुकर मुंडे |
||
===== |
===== व्यावसायिक ===== |
||
* नंदकुमार धूत |
* नंदकुमार धूत |
||
* जवाहरलाल दर्डा |
* जवाहरलाल दर्डा |
||
ओळ १४५: | ओळ १४६: | ||
* [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिंदे]] |
* [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिंदे]] |
||
* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र.ई. सोनकांबळे]] |
* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र.ई. सोनकांबळे]] |
||
*[[नरेंद्र नाईक]] |
* [[नरेंद्र नाईक]] |
||
=====मराठवाड्यातील कलावंत===== |
=====मराठवाड्यातील कलावंत===== |
२२:४५, ६ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
?मराठवाडा महाराष्ट्र • भारत | |
— विभाग — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ६४,८११ चौ. किमी |
जिल्हे | औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
लोकसंख्या • घनता साक्षरता |
१,५५,८९,२२३ (2001) • २४१/किमी२ ६८.९५ % |
मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक आर्थिक दृष्टीने दारिद्ऱ्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.[१] कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता.
इतिहास
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला. स्वामी रामानंदतीर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.
स्वातंत्र्योत्तर काळात इंदिरा काँग्रेसचे नेते, शंकरराव चव्हाण यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली .
त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.पैठणचा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील मोलाचे योगदान आहे.
भौगोलिक स्थान
मुख्य शहरे
महत्त्वाची ठिकाणे
शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव पाथ्री, संत एकनाथांचे पैठण, समर्थ रामदासांचे जन्मगाव जांब, देवीचे शक्तिपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, औंढा-नागनाथ, घृष्णेश्वर मंदिर, शीखांचा नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.
- परळी वैजनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
- माहूर धार्मिक पर्यटन केंद्र
- औंढा-नागनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
- धर्मापुरी - केदारेश्वर देवालय शिल्प स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना
- कल्हाली ता.कंधार जि.नांदेड- निझामकालीन जाहगीरीचे गाव.३५हुतात्म्याचे ग्रामकेंद्र.[ब्रम्हदेवाचे देवस्तान]
नद्या
गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी अशा जिल्ह्य सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी आहे. पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद -बीड व लातूर - बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकडयात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणा नदीस मिळते. कुंडलिका ही सिंधफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणा नदीस मिळते.
सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे. [२]
प्रशासन
महसूल
मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून औरंगाबाद महसुली विभाग तयार झाला आहे.विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. विभागीय आयुक्त हा या महसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.
- औरंगाबाद जिल्हा
- उस्मानाबाद जिल्हा
- जालना जिल्हा
- नांदेड जिल्हा
- परभणी जिल्हा
- बीड जिल्हा
- लातूर जिल्हा
- हिंगोली जिल्हा
न्यायदान
सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांमधून उच्च न्यायालयात आलेल्या खटल्यांचे कामकाज येथे चालते.
अर्थव्यवस्था
शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तांदूळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. औरंगाबाद, लातूर आणि नांदेड शहरांच्या परिसरात औद्योगिकीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ. स. १९८० नंतर मराठवाड्यात वाढले.
समाजरचना आणि लोकजीवन
शिक्षण
औरंगाबादचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन शासननियंत्रित आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त सर्वसाधारण शिक्षणाची विद्यापीठे मराठवाड्यात आहेत. त्याशिवाय परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. औरंगाबादचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला करण्यात आले.[३] सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. उस्मानाबाद येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
नांदेड येथे मुख्यालय असलेल्या या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.[४] प्रदेशातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. लातूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.[५] २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले. मराठवाड्याचे आठही जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयांचे संशोधनही येथे होते.
संस्कृती
साहित्य आणि साहित्यिक
- मराठवाड्यातील डॉक्टर यू.म.पठाणयांनी मराठी संतसाहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे.कै.नरहर कुरुंदकरमराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते.नाथराव नेरळकरयांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली.लक्ष्मीकांत तांबोळी, फ.मुं. शिंदे यांनी काव्य तर नरेंद्र नाईक यांनी काव्य व कांदबरी लेखन केले.त्यांची काळोखातील अग्निशिखा कांदबरी लोकप्रिरीयतेच्या उत्तुंग शिखरावर आहे.दैनिक मराठवाडाचे संपादक कै.अनंत भालेराव व दैनिक प्रजावाणी, नांदेडचे संपादक सुधाकर डोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. कै.डॉ.लक्ष्मण देशपांडेयांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला.
- ’असाही मराठवाडा’(मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ)-: लेखक : डॉ.किरण देशमुख(प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड)
- ’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे):हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी-लेखक:नरेंद्र नाईक
- ’नाटयधर्मी मराठवाडा’-लेखक:त्र्यंबक महाजन.
- ’मराठवाडी माणसं’-लेखक : यू. म. पठाण
- ’मराठवाड्यातील लोककथा’-लेखक : यू.म. पठाण
- ’मराठवाड्यातील शिलालेख’ -लेखक : यू.म. पठाण
- ’माझा महान मराठवाडा’- लेखक:हेमकांत महामुनी
वृत्तपत्रे
संकीर्ण
मराठवाड्यातील नामांकित व्यक्ति
राजकारण
- अशोक चव्हाण
- केशवराव धोंडगे
- गोपीनाथ मुंडे
- गोविंदभाई श्रॉफ
- प्रमोद महाजन
- मुकुंदराव पेडगांवकर
- डॉ. रफीक झकेरिया
- स्वामी रामानंदतीर्थ
- विलासराव देशमुख
- शंकरराव चव्हाण
- शिवराज पाटील चाकुरकर
- शिवाजीराव निलंगेकर
समाजकारण आणि ग्रामीण विकास
- लक्ष्मण गायकवाड
- मच्छिंद्र गोजमे
- ना.य. डोळे
- स्वतंत्र सैनिक भगवंतराव नाईक, [[हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात सहभाग, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ११ दिवस कारावास, इंदिरा बचाव आंदोलनात अटक, कल्हाली गावचे पहिले सरपंच सलग १८ वर्ष(?), कंधार प.स.चे(?) पहिले सदस्य]]
- विठ्ठलराव देशपांडे
- प्रा. मधुकर मुंडे
व्यावसायिक
- नंदकुमार धूत
- जवाहरलाल दर्डा
- मच्छिन्द्र चाटे
- रणजित देशमुख
मराठवाड्यातील साहित्यिक
- ऋषिकेश कांबळे
- नरहर कुरुंदकर
- लक्ष्मीकांत तांबोळी
- यू.म. पठाण
- डॉ. गंगाधर पानतावणे
- प्रा.दत्ता भगत
- कवि मुक्तविहारी
- डॉ. सूर्यनारायण रणसुभे
- फ.मुं. शिंदे
- प्र.ई. सोनकांबळे
- नरेंद्र नाईक
मराठवाड्यातील कलावंत
- मकरंद अनासपुरे
- डॉ. लक्ष्मण देशपांडे
- मयूरी कांगो (हिंदी चित्रपट अभिनेत्री)
धार्मिक संस्कृतिपालक
खेळाडू
हेसुद्धा पाहा
- मराठी विकिपीडिया दालन:मराठवाडा
- ऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामचा आढावा.
संदर्भ
- ^ [१], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.
- ^ http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा इतिहास.
- ^ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संकेतस्थळ.
- ^ http://mkv2.mah.nic.in/doe/maufrgen.html [मृत दुवा]
बाह्य दुवे
महाराष्ट्र |
---|
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ |