"हैदराबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = २ ऑक्टोबर
|वर्ष = २०१२
}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = राजधानी
|प्रकार = राजधानी
ओळ ४५: ओळ ४९:
[[File:Golconda fort.jpg|thumb|left|गौलकोंडा किल्ला]]
[[File:Golconda fort.jpg|thumb|left|गौलकोंडा किल्ला]]


सन १५१२ मध्ये [[बहामनी सल्तनत|बहामनी राजवटीतून]] बंड करून किल्ले [[गोलकोंडा | गौलकोंडा]] येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुलीकुतुब शाह याने गौलकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून [[मुसी नदी]]च्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना १५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात [[चारमीनार]] या वास्तूची उभारणी केली. गौलकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.
इ. स. १५१२ मध्ये [[बहामनी सल्तनत|बहामनी राजवटीतून]] बंड करून किल्ले [[गोलकोंडा | गौलकोंडा]] येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुलीकुतुब शाह याने गौलकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून [[मुसी नदी]]च्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना इ. स. १५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात [[चारमीनार]] या वास्तूची उभारणी केली. गौलकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.


सन १६८७ मध्ये मोगल सम्राट औरंगजेबने हैदराबाद ताब्यात घेतले, इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा ''निजाम उल मुल्क'' असलेल्या [[मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]] अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी १९४८ पर्यंत हैदराबादचे ''निजाम'' म्हणून राज्य केले. निजामांकडची सत्ता आणि संपत्ती यांनी दंतकथांना जन्म दिला.
इ. स. १६८७ मध्ये मोगल सम्राट [[औरंगजेब]]ने हैदराबाद ताब्यात घेतले, इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा ''निजाम उल मुल्क'' असलेल्या [[मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]] अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैदराबादचे ''निजाम'' म्हणून राज्य केले. निजामांकडची सत्ता आणि संपत्ती यांनी दंतकथांना जन्म दिला.


सन १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर संस्थानाच्या त्रिभाजनानंतर हैदराबाद शहर हे तेलुगू भाषिक तेलंगण भागासह आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आले. १ नोव्हेंबर १९५६ला आंध्रप्रदेशची स्थापना झाली. हैदराबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.
इ. स. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर संस्थानाच्या त्रिभाजनानंतर हैदराबाद शहर हे तेलुगू भाषिक तेलंगण भागासह आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आले. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्रप्रदेशची स्थापना झाली. हैदराबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.


== भूगोल ==
== भूगोल ==
[[File:Hussainsagar hyd.jpg|left|thumb|हुसेनसागर तलाव]]
[[File:Hussainsagar hyd.jpg|left|thumb|हुसेनसागर तलाव]]


हैदराबाद दक्षिण भारतात दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६५० चौरस किलोमीटर आहे. करड्या आणि गुलाबी ग्रॅनाईटपासून बनलेली खडकाळ चढउताराची जमीन हे हैदराबादच्या भूपृष्ठाचे वैशिष्ट्य. हैदराबाद समुद्रसपाटीपासून सरासरी ५४२ मीटर उंचीवर आहे. बंजारा हिल्स हा शहरातील सर्वात उंच भाग आहे. शहरात आणि सभोवताली १९९६ पर्यंत १४० हून अधिक लहानमोठी तळी होती. १५६२ मध्ये बांधलेला हुसेनसागर तलाव शहराच्या मध्यभागी आहे. चारमीनार आणि मक्का मशीद असलेले जुने शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा शहराचा जुना मध्यवर्ती भाग आहे. शहराचा नवा विस्तार चारही दिशांनी झाला आहे.
हैदराबाद दक्षिण भारतात दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६५० चौरस किलोमीटर आहे. करड्या आणि गुलाबी ग्रॅनाईटपासून बनलेली खडकाळ चढउताराची जमीन हे हैदराबादच्या भूपृष्ठाचे वैशिष्ट्य. हैदराबाद समुद्रसपाटीपासून सरासरी ५४२ मीटर उंचीवर आहे. बंजारा हिल्स हा शहरातील सर्वात उंच भाग आहे. शहरात आणि सभोवताली इ. स. १९९६ पर्यंत १४० हून अधिक लहानमोठी तळी होती. इ. स. १५६२ मध्ये बांधलेला हुसेनसागर तलाव शहराच्या मध्यभागी आहे. चारमीनार आणि मक्का मशीद असलेले जुने शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा शहराचा जुना मध्यवर्ती भाग आहे. शहराचा नवा विस्तार चारही दिशांनी झाला आहे.


हैदराबाद दमट आणि कोरड्या कटिबंधीय वातावरणाचा संमिश्र अनुभव देणारे शहर आहे. शहराचे वार्षिक सरासरी तापमान २६ अंश सेल्शियस आहे. एप्रिल आणि जून दरम्यान शहराचे कमाल तापमान अनेकदा ४० अंश सेल्शियसवर जाते. जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात शहरात पाऊस पडतो.
हैदराबाद दमट आणि कोरड्या कटिबंधीय वातावरणाचा संमिश्र अनुभव देणारे शहर आहे. शहराचे वार्षिक सरासरी तापमान २६ अंश सेल्शियस आहे. एप्रिल आणि जून दरम्यान शहराचे कमाल तापमान अनेकदा ४० अंश सेल्शियसवर जाते. जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात शहरात पाऊस पडतो.
ओळ ६७: ओळ ७१:
[[चित्र:India food.jpg|left|150px|thumb|[[हैदराबादी बिर्याणी]] (डावीकडे) आणि इतर खाद्यपदार्थ]]
[[चित्र:India food.jpg|left|150px|thumb|[[हैदराबादी बिर्याणी]] (डावीकडे) आणि इतर खाद्यपदार्थ]]


हैदराबादच्या लोकसंख्येत हिंदू आणि इस्लाम धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत, त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषिक झाले. तेलुगू भाषकांची संख्या सर्वाधिक आहे. उर्दू आणि मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. याशिवाय तामिळ, कन्नड, गुजराती, राजस्थानी यासह अनेक भारतीय भाषा बोलणारे येथे राहतात. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली. व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर केला जातो.
हैदराबादच्या लोकसंख्येत हिंदू आणि इस्लाम धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत, त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषिक झाले. तेलुगू भाषकांची संख्या सर्वाधिक आहे. उर्दू आणि मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. याशिवाय तामिळ, कन्नड, गुजराती, राजस्थानी यासह अनेक भारतीय भाषा बोलणारे येथे राहतात. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली. व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर केला जातो. आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.
आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.


== उद्योगधंदे ==
== उद्योगधंदे ==
ओळ ७५: ओळ ७८:


== वाहतूक ==
== वाहतूक ==
=== बसस्थानके===

हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बसगाड्या येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात. त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणारे ऑटोरिक्षाही येथे मिळतात.
हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बसगाड्या येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात. त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणारे ऑटोरिक्षाही येथे मिळतात.


=== रेल्वेस्थानके===
हैदराबाद (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वेस्थानके शहरात आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच [[दक्षिण मध्य रेल्वे | दक्षिण मध्य रेल्वेचे]] मुख्यालय आहे. रेल निलायम या संकुलात ते वसलेले आहे. देशाच्या सर्व भागात जाण्यायेण्यासाठीही रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
हैदराबाद (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वेस्थानके शहरात आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच [[दक्षिण मध्य रेल्वे | दक्षिण मध्य रेल्वेचे]] मुख्यालय आहे. रेल निलायम या संकुलात ते वसलेले आहे. देशाच्या सर्व भागात जाण्यायेण्यासाठीही रेल्वेसेवा उपलब्ध आहे.


===विमानतळ===
हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे एक नवा अत्याधुनिक विमानतळ चालू झाला. यापूर्वीचा बेगमपेट विमानतळ वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून सुरू करण्यात आला. देशाच्या सर्व भागात तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागात हैदराबादहून थेट विमानसेवा आहेत.
हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे एक नवा अत्याधुनिक विमानतळ चालू झाला. यापूर्वीचा बेगमपेट विमानतळ वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून सुरू करण्यात आला. देशाच्या सर्व भागात तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागात हैदराबादहून थेट विमानसेवा आहेत.



०९:५६, २ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

  ?हैदराबाद
तेलुगू : హైదరాబాదు , उर्दू: حیدر آباد
आंध्र प्रदेश • भारत
—  राजधानी  —
सव्य दिशेने वरून: चारमिनार, सिकंदराबाद क्लॉक टॉवर, हायटेक सिटी, रामोजी फिल्मसिटी आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
सव्य दिशेने वरून: चारमिनार, सिकंदराबाद क्लॉक टॉवर, हायटेक सिटी, रामोजी फिल्मसिटी आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
सव्य दिशेने वरून: चारमिनार, सिकंदराबाद क्लॉक टॉवर, हायटेक सिटी, रामोजी फिल्मसिटी आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Map

१७° २१′ ४२″ N, ७८° २८′ २९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६५० चौ. किमी
• ५३६ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
समशीतोष्ण (Köppen)
• ८०३ मिमी (३१.६ इंच)
२६.० °C (७९ °F)
• २३.५ °C (७४ °F)
• ३०.३ °C (८७ °F)
प्रांत तेलंगणा
जिल्हा हैदराबाद
लोकसंख्या
घनता
७७,४९,३३४
• ११,९२२/किमी
भाषा तेलुगू, उर्दू
महापौर मोहंमद माजिद हुसैन
आयुक्त एम. टी. कृष्णा बाबू
स्थापित इ.स. १५९१
संसदीय मतदारसंघ हैदराबाद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 500 XXX
• +४०
• INHYD
• AP9, AP10, AP11, AP12, AP13, AP28, AP29
संकेतस्थळ: हैदराबाद महानगरपालिकेचे संकेतस्थळ

हैदराबाद Hyderabad.ogg उच्चार ऐका तेलुगू: హైదరాబాదు , उर्दू: حیدر آباد हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैदराबादची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे[१] मोत्यांचे शहर अशी एकेकाळी ओळख असलेल्या या शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारसा लाभला आहे. १९९० नंतर शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ शहरात झाली. दक्षिण मध्य भारतातील पर्यटन आणि तेलुगू चित्रपटनिर्मितीचे हैदराबाद हे केंद्र आहे

इतिहास

गौलकोंडा किल्ला

इ. स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गौलकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुलीकुतुब शाह याने गौलकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना इ. स. १५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात चारमीनार या वास्तूची उभारणी केली. गौलकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.

इ. स. १६८७ मध्ये मोगल सम्राट औरंगजेबने हैदराबाद ताब्यात घेतले, इ. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा निजाम उल मुल्क असलेल्या मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैदराबादचे निजाम म्हणून राज्य केले. निजामांकडची सत्ता आणि संपत्ती यांनी दंतकथांना जन्म दिला.

इ. स. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर संस्थानाच्या त्रिभाजनानंतर हैदराबाद शहर हे तेलुगू भाषिक तेलंगण भागासह आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आले. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्रप्रदेशची स्थापना झाली. हैदराबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.

भूगोल

हुसेनसागर तलाव

हैदराबाद दक्षिण भारतात दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६५० चौरस किलोमीटर आहे. करड्या आणि गुलाबी ग्रॅनाईटपासून बनलेली खडकाळ चढउताराची जमीन हे हैदराबादच्या भूपृष्ठाचे वैशिष्ट्य. हैदराबाद समुद्रसपाटीपासून सरासरी ५४२ मीटर उंचीवर आहे. बंजारा हिल्स हा शहरातील सर्वात उंच भाग आहे. शहरात आणि सभोवताली इ. स. १९९६ पर्यंत १४० हून अधिक लहानमोठी तळी होती. इ. स. १५६२ मध्ये बांधलेला हुसेनसागर तलाव शहराच्या मध्यभागी आहे. चारमीनार आणि मक्का मशीद असलेले जुने शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा शहराचा जुना मध्यवर्ती भाग आहे. शहराचा नवा विस्तार चारही दिशांनी झाला आहे.

हैदराबाद दमट आणि कोरड्या कटिबंधीय वातावरणाचा संमिश्र अनुभव देणारे शहर आहे. शहराचे वार्षिक सरासरी तापमान २६ अंश सेल्शियस आहे. एप्रिल आणि जून दरम्यान शहराचे कमाल तापमान अनेकदा ४० अंश सेल्शियसवर जाते. जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात शहरात पाऊस पडतो.

प्रशासन

शहराची देखभाल बृहद् हैदराबाद महानगरपालिका करते. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेची स्थापना एप्रिल २००७ मध्ये हैदराबाद महानगरपालिका आणि जवळच्या दोन जिल्ह्यांतील १२ नगरपालिकांचे विलिनीकरण करून झाली. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. हैदराबाद, रंगारेड्डी आणि मेदक या तीन जिल्ह्यांत तिचा विस्तार आहे. महानगरपालिकेचे १५० आहेत. हे वॉर्ड १८ मंडले आणि पाच विभाग (झोन्स) यात वाटले गेले आहेत. महापालिकेचे महापौर लोकांनी निवडलेले प्रमुख असतात,तर आयुक्त हे भारतीय प्रशासकीय सेवा दर्जाचे अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतात. याशिवाय आंध्र प्रदेश विधानसभा, आंध्र प्रदेश सचिवालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हैदराबाद येथेच स्थित आहे. हैदराबाद महानगरपालिका क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे २४ विधानसभा मतदारसंघ आहेत. शहरात पाच लोकसभेचे मतदारसंघ आहेत

समाजरचना

हैदराबादी बिर्याणी (डावीकडे) आणि इतर खाद्यपदार्थ

हैदराबादच्या लोकसंख्येत हिंदू आणि इस्लाम धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत, त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषिक झाले. तेलुगू भाषकांची संख्या सर्वाधिक आहे. उर्दू आणि मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. याशिवाय तामिळ, कन्नड, गुजराती, राजस्थानी यासह अनेक भारतीय भाषा बोलणारे येथे राहतात. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली. व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर केला जातो. आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.

उद्योगधंदे

हैदराबाद ही पारंपारिकरीत्या, लसूण आणि मसाल्याचे पदार्थ, नारळ, सुपारी, केळी आदी फळांची मोठी बाजारपेठ होती. आजचे हैदराबाद मात्र माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रात देशातील केंद्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांनी आपली कार्यालये येथे थाटली आहेत. औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे प्रकल्प हैदराबाद शहर आणि परिसरात आहेत. तेलुगू चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मिती उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे.

वाहतूक

बसस्थानके

हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बसगाड्या येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात. त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणारे ऑटोरिक्षाही येथे मिळतात.

रेल्वेस्थानके

हैदराबाद (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वेस्थानके शहरात आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. रेल निलायम या संकुलात ते वसलेले आहे. देशाच्या सर्व भागात जाण्यायेण्यासाठीही रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

विमानतळ

हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे एक नवा अत्याधुनिक विमानतळ चालू झाला. यापूर्वीचा बेगमपेट विमानतळ वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून सुरू करण्यात आला. देशाच्या सर्व भागात तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागात हैदराबादहून थेट विमानसेवा आहेत.

शहरांतर्गत वाहतूकीसाठी उपनगरीय रेल्वेसेवा, बससेवा त्याचप्रमाणे तीनचाकी मीटर रिक्षांची सेवा उपलब्ध आहे

संस्कृती


हेसुद्धा पाहा

संदर्भ