"नथुराम गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो r2.7.3) (सांगकाम्याने काढले: mr:नथुराम गोडसे |
खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
== प्रारंभिक जीवन == |
== प्रारंभिक जीवन == |
||
नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास |
नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता. |
||
==धार्मिक आणि अलोकिक आवडी== |
==धार्मिक आणि अलोकिक आवडी== |
१३:४७, १५ जून २०१२ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नथुराम विनायक गोडसे | |
---|---|
जन्म |
१९ मे १९१० बारामती, पुणे, ब्रिटिश भारत |
मृत्यू |
१५ नोव्हेंबर, १९४९ (वय ३९) अंबाला, पंजाब, भारत |
मृत्यूचे कारण | फाशी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ख्याती | गांधी-हत्या |
'नथुराम विनायक गोडसे ( १९ मे १९१०-१५ नोव्हेंबर १९४८) हे एक पत्रकार आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. भारताची फाळणी आणि ती होतेवेळीच्या धार्मिक दंगलींमध्ये झालेल्या लाखो हिंदूंच्या हत्येसाठी ते गांधीना जबाबदार मानायचे. या कारणास्तव नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींवर पिस्तुलाने गोळ्या झाडून त्यांचा अंत घडवून आणला.
प्रारंभिक जीवन
नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.
धार्मिक आणि अलोकिक आवडी
नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात. या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६ व्या वर्षापासून संपून गेले .
शिक्षण
यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच सोड्ले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण ,महाभारत , गीता पुराण ,स्वामी विवेकानंद ,स्वामी दयानंद बाल गंगाधर टिळक ,मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता .
राजनैतिक जीवन
आधी सुरुवातीला नथुराम गोडसे अखिल भारतीय कॉंग्रेस या पक्षामध्ये होते, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शेवटी सन १९३०मध्ये ते अखिल भारतीय हिंदू महासभेत गेले. ते "अग्रणी " आणि "हिंदू राष्ट्र " या वर्तमानपत्रांचे संपादक होते. ते आपल्या वर्तमानपत्रांतून मोहंमद अली जिना यांच्या फुटीरतेच्या विचारांचा प्रखर विरोध करीत. सुरुवातीला यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधीची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचे तथाकथित मुस्लीम तुष्टीकरण यांमुळे ते गांधीविरोधी झाले. त्याआधी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षही केला होता.
हैदराबाद आंदोलन
१९४० मध्ये हैद्राबादच्या शासक निझामाने राज्यात राहण्याऱ्या हिंदूंवर जिझिया कर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हिंदू महासभेने निषेध केला. त्या वेळेस, हिंदुमहासभेचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर यांच्या आदेशावरून हिंदू महासभेचा पहिला गट नथुराम गोडसे यांचा नेतृत्वाखाली हैद्राबादला निझामाला विरोध करण्यासाठी गेला. निझामाने या सर्वांना बंदिस्त करून कठोर दंड दिला, मात्र त्यानंतर, निझामाला जिझिया कर लावण्याचा त्याचा निश्चय मागे घ्यावा लागला .
भारताची फाळणी
१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि त्या वेळेस झालेल्या धार्मिक दंगलींमुळे गोडसे अत्याधिक दु:खी झाले. या परिस्थितीसाठी त्यांना मोहनदास गांधी सर्वस्वी जवाबदार वाटले .
मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येचा निर्णय
फाळणीचा वेळेस झालेल्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला ७५ कोटी रुपये द्यायचे होते. त्यातले २० कोटी रुपये दिले गेले होते, आणि त्याच वेळेस पाकिस्तान ने काश्मीरवर आक्रमण केले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू आणि गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी उरलेले ५५ कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. गांधींचा या निर्णयामुळे दु:खी होऊन आणि चिडून नथुराम गोडसे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गांधी हत्येचा निर्णय घेतला .
गांधी हत्येचा पहिला असफल प्रयत्न
गांधींच्या उपोषणामुळे क्षुब्ध झालेले नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांपैकी मदनलाल पाहवा याने गांधींच्या प्रार्थना सभेत जानेवारी १९४८ मधे बॉम्ब टाकला. त्या वेळेस झालेल्या गोंधळामध्ये गांधींवर पिस्तूल झाडण्याची योजना होती. पण पिस्तूल चालले नाही आणि अंती, नथुराम गोडसे आणि बाकी मित्र पळून पुण्यास आले. मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नथुराम गोडसे गांधींना मारण्यासाठी परत दिल्लीत आले. तेथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांमध्ये फिरताना त्यांनी एकाकडून एक पिस्तूल विकत घेतले.
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४० मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद गांधी यांचा खून केला. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे यांनी अजिबात प्रयत्न केला नाही.
गांधींच्या खुनाचा खटला
नथुराम गोडसेंवर मोहनदास गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात चालविण्यात आला. या व्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले चालविण्यात आले होते .
गांधीहत्येचे कारण
खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .
न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --
- अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
- भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
- ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्र्त्यांच्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
- महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लीम यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो कि बहादुरी असे केले.
- सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ म्हटले, त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ष्ट्रविरोधी आणि हिंदू मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले
- गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.
- गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट हैदराबादच्या निझामालाला हैदराबाद हिंदू बहुल असूनही समर्थन दिले होते.
- जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती
- काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज तिरंगी केला गेला
- काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
- लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे बहुमताने निवडूनआले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
- १४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल .
- जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर दबाव आणला.
- पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.
- ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास सरकारला बाध्य केले.
मृत्युदंड
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आले. त्यांचे अंतिम शब्द असे होते, " जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.
संदर्भ
- Manohar Malgaonkar, The Men Who Killed Gandhi, Madras, Macmillan India (1978) ISBN 0-333-18228-6
- गोपाल गोडसे गान्धी वध क्यों? सूर्यभारती प्रकाशन ,नई सडक, दिल्ली ११०००६ भारत
- डा० मदनलाल वर्मा 'क्रान्त' स्वाधीनता संग्राम के क्रान्तिकारी साहित्य का इतिहास (३ खण्डों में) २००६ प्रवीण प्रकाशन ४७६०/६१ (दूसरी मंजिल) २३ अन्सारी रोड दरियागंज नई दिल्ली-११०००२ ISBN 8177831224