मराठी संत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. निवांत वेळी आपली कामे आटपून माणसाने भगवंताचारणी लीन व्हावे. चांगले आचरण करावे. भेद भाव टाळावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात ४०० वर्षांपूर्वी आपल्याला त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे. ज्ञानेश्वारानी सामान्य जनाला कळेल अश्या भाषेत गीता ओव्या लिहिल्या. गोरा कुंभार, चोखामेळा एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी आपल्या रोजाच्या जीवनतील दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले.

पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.[ संदर्भ हवा ]

महाराष्ट्रातील संत[संपादन]

आधुनिक संत[संपादन]