खाजगी कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'भारतीय कंपनी कायद्यातील तिसऱ्या कलमानुसार ज्या कंपनीने आपल्या नियमावलीनुसार आपल्या सभासदांची संख्या ५० इतकी मर्यादित केली आहे , सभासदांच्या भागांच्या हस्तांतरावर मर्यादा घातली आहे आणि कंपनीचे भाग द्वव्क्त हेण्यासाठी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आवाहन न करण्याविषयी बंधन घालून घेतले आहे, अशा कंपनीस 'खाजगी कंपनी म्हणतात.'

खाजगी कंपनीत किमान २[दोन] सभासद असावे लागतात. कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल सभासद असणाऱ्या कुटुंबातील वैक्ती , नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने गोळा करावे लागते. खाजगी कंपनीने नोंदणीच्या वेळी कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या कागद पत्राची पुर्तता केल्या नंतर कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्र मिळते. नोंदणी प्रमाणपत्र कंपनीस ताबडतोब व्य्वासाय सुरू करता येतो, म्हणजेच सार्वजनिक कंपनी प्रमाणे व्यवाहार सुरू करण्याचा परवाना मिळवावा लागत नाही.