सदस्य चर्चा:दिलीपकुमारपाटील

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव तुळसण


कराडच्या पश्चिमेस बावीस किलोमीटर अंतरावर दक्षिण मांड नदीच्या दोन किलोमीटर काठावर निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वत रांगात वसलेले गाव म्हणजे तुळसण.गावची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे.

   सोळाव्या सतराव्या शतकात तुळसण हे कासारांचे गाव म्हणून ओळखले जात होते कासार समाजाचे लोक ह्या खिंडीतून गाव सोडून निघून गेले त्या भागाला कासारदरा म्हणून ओळखले जाते तर भागुबाई मंदिर डोंगराच्या सवादे गावाकडील द-यास बाशिंगदरा म्हटले जाते येथे पूर्वीच्या काळी नवरा नवरी व लग्नातील व-हाडी अचानक बाशिंगासह गायब झाले म्हणून द-याला बाशिंगदरा म्हटले जाते तर मोरांचे प्रमाण जास्त असल्यामुळे डोंगराच्या एका भागाला मोरटेक म्हटले जाते तुळसण गावच्या पूर्वेला लांडा डोंगर पश्चिमेला भागुबाईचा डोंगर उत्तरेला विठ्ठलाईदेवी मंदिर व दुधथानीचा डोंगर दक्षिणेला महादेव मंदिर (शेवाळेवाडी) आहे
   ब्रिटीश काळात तुळसण हे गाव सातारा संस्थानात होते.गावाच्या इशान्येला आगाशिवची पांडवकालीन व बौध्दकालीन लेणी दक्षिणेला सवादे गावचे थोर संत सद्गुरू बाबा महाराज यांची समाधी उंडाळेत कृष्णत बुवा यांची समाधी आहे.तसेच दादा उंडाळकर यांचे गाव आहे.पूर्वेला ओंड तर उत्तरेला कोळेवाडी हि गावे आहेत गांवाच्या पश्चिमेला बागेचा ओढा तर पुर्वेला जानाईदेवीचा ओढा यांच्या संगमावर  गांव बसले आहे.गांवाच्या ईशान्येला गावातील पुर्वीच्या काळातील  संत नाथा बुवा यांची संमाधी आहे पढंरपुरला जाण्यासाठी ज्या ठिकाणी ते थांबत तेथे त्यांची समाधी आहे. थोर संत निरंजन स्वामी यांचाही जन्म याच गावात झाला होता.
    पूर्वी तुळसण गाव कारली वांगी व पानमळयासाठी प्रसिद्ध होते एकूण जमिनीचे क्षेत्र ८४२ हेक्टर त्यापैकी ५०० हेक्टर जमीन बागायती तर १४५ हेक्टर डोंगरपड आहे.शेतीसाठी सध्या येवती म्हासोली धरणाचे पाणी व विहिरचे पाणी वापरले जाते  मुख्य पिके ज्वारी गहू ऊस ही आहेत शेतांना  नांगरे माळ फाटा,नागझरी,माळ ,मुलाणकी गोडाई लिंबकाटा वाण्याचा तळ किंजळ,गडदु , पाळाक, देसकत अशी नावे आहेत
    पूर्वी येथील लोक बाजारासाठी काले, नांदगाव उंडाळे, येळगाव कुंभारगाव व ढेबेवाडी येथे जात असत तर नांदगाव हेच ब्रिटीश काळात पोलीस स्टेशन होते.
    पूर्वी येथील लोक गणेशोत्सव काळात गावाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती गणेशोत्सवात हनुमान मंदिरासमोर मातीची मोठी गणेशमूर्ती बनवून तिची पूजा करून गणेशोत्सव साजरा केला जात होता हीच खरी आणि मुळची तुळसणची यात्रा होय त्याकाळी उंडाळे रेठरे कोळेवाडी व तुळसण या गावाची गणपतीची यात्रा एकाच दिवशी साजरी केली जात होती निनाईदेवीला आदिमाया ,अंबिका, तुळजाभवानी ,महालक्ष्मी , काळम्मादेवी ,आदी देवतांच्या नावाने संबोधले जाते गावाला तुळजाभवानी नावावरूनच तुळसण नाव पडले असावे असे काही वृद्ध लोक सांगत तसेच "तुळासुर "नावाच्या राक्षसाच्या नावावरूनच तुळसण हे गावाचे नाव पडल्याची आख्यायिका आहे नावाचा इतिहास वेगळा असेल हे नाकारता येणार नाही
    मात्र देवीचे मूळ स्थान उदगीर ता शाहुवाडी येथील असून हजारो वर्षापूर्वी तिची स्थापना येथे करण्यात आली आहे.देवीच्या मंदिराजवळ ऐतिहासिक तळे असून पूर्वी कोणत्याही सण समारंभाच्या वेळी देवीची पूजा केल्यास भांडी निघत होती परंतु कुणीतरी व्यक्तीने भांडे गहाळ केल्यामुळे ही पद्धत बंद झाल्याचे सांगितले जाते.
    निनाईदेवीचे दक्षिणमुखी भव्य मंदिर असून देवीच्या दोन मूर्ती घडीव पाषाणाच्या आहेत त्यापैकी मुख्य मूर्तीची झीज होवू लागली आहे निनाईदेवीच्या मंदिराशिवाय गावात भगवान शंकराचा अवतार असलेले जगन्नाथ मंदिर विठ्ठल-रुक्मिणी हनुमान दत्तात्रय महादेव लक्ष्मी यशोदा मंदिर आदी देवतांची मंदिरे आहेत निनाईदेवी मंदिराचा व शिखराचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी सन १९८८ मध्ये केला आहे.काहीवर्षापूर्वी कोल्हापूरचे देवीचे एक भक्त आनंदराव शिंदे यांनी एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च करून आतील गाभा-यात स्टाईल फरशी बसवली आहे.त्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे.
    अश्विन शुध्द अष्टमी दिवशी जागर साजरा केला जातो जागराच्या दिवशी निनाईदेवी नवसाला पावल्याबद्दल भक्त ऐतिहासिक तळ्यापासून दंड्स्थान घेतात त्यासाठी भाविक स्त्रिया पुरषांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यानंतर नवीन कपडे घालून दंडस्नान घेणारे ग्रामस्थ व भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात दंडस्नान घेते समयी गोंधळी आपली वाद्ये वाजवतात त्यामुळे मंदिरचा परिसर दुमदुमून जातो दुस-या दिवशी खंडेनवमी दिवशी शेतीच्या अवजाराची घरोघरी पूजा केली जाते तीस-या दिवशी म्हणजेच विजयादशमी दिवशी सीमोल्लंघन साजरे केली जाते सायकाळी निनाईदेवीची पालखी व छबिना विठ्ठलवाडी येथे विठोबाला भेटायला जावून त्यानंतर गावाच्या वेशीत पूर्वेला असणा-या व जानाईदेवी यांच्याशी निनाईदेवीची भेट होते तेथील धार्मिक विधी परंपरे नुसार पार पडल्यानंतर पालखी मंदिरकडे येऊ लागते पालखी समोर लेझीम मंडळे बँडपथक भजनीमंडळे ढोलतांशाचा आवाज व फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात पालखी मंदिराच्या पायथ्याजवळ आल्यावर पहिल्यांदा ओवाळण्याचा मान बंडू पांडू वीर नांगरे पाटील यांच्या वंशजाकडे आहे पालखी पुढे गुलालाची उधळण केली जाते नवरात्रीत मंदिरासमोर दीपमाळ पेटवली जाते त्याचप्रमाणे ज्या भाविकांच्या नवसाला देवी पावली आहे ते फटाक्यांची आतिषबाजी केली जाते दरवर्षी अंदाजे दहा लाख रुपयांच्या फटाक्यांची आतिषबाजी केली जाते त्यावेळी मुंबई कडील ग्रामस्थांच्या बरोबर सांगली विटा कोल्हापूर परिसरातून भाविक उपस्थित असतात संपूर्ण  जिल्ह्यात नवसाला पावणारी अशी देवीची ख्याती आहे यात्रेत मेवामिठाई व फराळ्याची दुकाने येतात
   घटस्थापनेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विजयादशमी पर्यंत सकाळी व रात्री एकवीस ठिकाणी आरती केली जाते रात्रीच्या वेळी मंदिरात गोंधळ घातला जातो त्यावेळी गावातील मानक-यांच्या मानाच्या मशाली पेटवून नाचविल्या जातात गोंधळ घालण्याचा मान परंपरेनुसार मनव  ता .कराड येथील गोंधळी समाजाचा आहे.
       गावातील वीर पाटील भावकीचे मूळपुरुष गोंदजी वीर पाटील यांचा जन्म १५६६ साली झाला असून त्यांचा वंश विस्तार होवून थोरल्या व धाकटी  अशा दोन भावक्या तयार झाल्या आहेत त्यांच्या जन्मापासून आज अखेर वंशावळ उपलब्ध आहे.तसेच ब्रिटीश काळातील सन १८८६ च्या 7/12 उता-यानुसार वीर पाटील असा उल्लेख आहे.ते उतारे काही ग्रामस्थांच्या घरी उपलब्ध आहेत.

गोंद्जी यांचे एक वंशज बंडू पांडू वीर (पाटील) यांच्याकडे दस-या दिवशी निनाईदेवीची पालखी मंदिराजवळ आल्यानंतर पालखीला ओवळण्याचा पूजण्याचा मान आहे दुसरा मान निनाईदेवीला वारा (चौरी) घालण्याचा मान विलास उर्फ उत्तम पाटील यांच्याकडे आहे तर तिसरा मन बयाबाई नाना वीर यांनी हनुमान (मारुती) मंदिरासमोर व त्यांच्या घराजवळ बांधलेल्या तुळशी विवाहाचा गावात पहिल्यांदा तुळशीचे लग्न लावण्याचा आहे.या दोन्ही तुळशीचे लग्न लावल्याशिवाय गावातील कोणत्याही तुळशीचे लग्न मान्य नाही सदरचा हा मान बाबा नाना वीर पाटील व परसू रावजी वीर पाटील यांच्याकडे आहे.तर चौथा मान गुढीपाडव्या दिवशी होणा-या विठोबाच्या वाडीतील यात्रेत पहिल्यांदा गाडी पळवण्याचा मान वंशपरंपरेने उमाजी नारू नाथा वीर यांच्या वंशजाकडे आहे.यांची मानाची बैलगाडी पळविल्यानंतर इतर लोकांच्या बैलगाडीच्या शर्यती लावल्या जातात तसेच येथून कोल्हापुरच्या कुलदैवत जोतिबाला मानाची सासनकाठी जात होती असे सांगितले जाते.

    येथील डॉ  निवृत्ती गोविंद वीर यांनी अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसण  पाचवी ते सातवी प्राथमिक शाळा ओंड आठवी ते एस एस सी (बोर्डिंग स्कूल) सातारा तर एम. बी .बी .एस. मुंबई येथे पूर्ण केले त्यांचा जन्म सन १९२७ साली झाला त्यांनी दापोली (जि.रत्नागिरी) येथील कुसुम यांच्याशी दादर येथे विवाह केला  दुसरा विवाह युरोपीयन महिलेशी केला होता.डॉक्टारांच्या  आईचे नाव कोयना होते त्यांना हिराबाई हरी पाटील (कोळेवाडी) व कमळाबाई विष्णू पाटील (जखिणवाडी) या बहिणी तर आण्णा गोविंद वीर काशिनाथ गोविंद वीर हे दोन मोठे भाऊ होते तुळसणमध्ये त्यांचे कै.श्री ज्ञानू गणू कोरडे श्री केरू भाऊ यादव व धामणी येथील आण्णा सावंत (सर्कल) हे खास मित्र होते त्यांच्या आई वडिलांनी दोन एकर जमीन विकून त्यांना डॉक्टर केले त्यांनी इंग्लंड येथे २० वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला परत आल्यानंतर त्यांनी कोयनानगर येथे बंगला बांधला मा.यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना राजकारणात येण्याचे निमत्रण दिले होते तसेच कराड येथे दवाखाना सुरु करण्याचा आग्रह केला त्यानंतर त्यांच्या शब्दाला जागून त्यांनी कराड एस टी स्टॅडसमोर काही वर्षे दवाखाना सुरु केला त्यानंतर त्यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी १९९२ मध्ये मिरज येथे निधन झाले त्यांची इंग्लंड येथील कोट्यावधीची संपत्ती सरकार जमा झाली त्यांनी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते.
   प्राचीन काळापासून येथे ऐतिहासिक गावविहीर आहे.तिला निनाईदेवीची गावविहीर म्हणून ओळखले जाते पूर्वीच्या काळी कितीही मोठा दुष्काळ पडला तरी या विहिरीचे पाणी आटत नव्हते या विहिरीचे बांधकाम तुळसण गावाचे समाजसेवक मार्गदर्शक नेते  कै ज्ञानू काशीबा वीर यांच्या पुढाकाराने वा ग्रामस्थांच्या वतीने सन १९५५ मध्ये पूर्ण करण्यात आले सन १९८९ मध्ये नळपाणी पुरवठा योजनेसाठी विहीर वापर सुरु झाला विहिरीच्या वरील बाजूस नवीन काढण्यात आलेल्या विहिरी पावसाचे कामी प्रमाण नवीन मारलेली बोअरिंग व वाढलेली लोकसंख्या यामुळे गावविहिरीचे पाणी कामी झाले या विहिरीची डागडुजी केल्यास जून  ते फेब्रुवारी काळात पाणीसाठा सर्वासाठी उपलब्ध होईल सध्या अशाप्रकारची विहीर बाधण्यासाठी 50 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च येईल असे जाणकार लोंकाचे मत आहे.उच्चशिक्षण घेतलेल्या इंजिनिअरलाही जमणार नाही असे काम त्याकाळी अवघ्या चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या  कै ज्ञानू काशीबा वीर यांनी केले आहे.

प्राचीन काळापासून तुळसण पंचक्रोशीतील सर्व देवांच्या पालख्या श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी कृष्णामाईच्या भेटीसाठी पाचवड येथे जातात फक्त तुळसणच्या निनाईदेवीची पालखी या भेटीसाठी जात नाही कारण पूर्वी पालखी निघाली असता ऐतिहासिक तळ्याचे पाणी हे कृष्णामाईचे असून मी कृष्णामाईच असल्यामुळे पालखी नेण्याची गरज नाही असे सांगितले त्यामुळे देवीची पालखी शेवटच्या सोमवारी पाचवड येथे जात नाही या विहिरीचे बांधकाम करताना स्त्री पुरुषांना आघोंळीसाठी वेगवेगळ्या खोल्या बांधल्या आहेत सन १९७० पूर्वीच्या अभ्यासक्रमात असणा-या 'आपला सातारा जिल्हा 'या पुस्तकात पुरवठ्याच्या सोयी संदर्भात गावाचा 'आदर्श गाव 'असा उल्लेख आहे.

    गावात गुढीपाडवा, रामनवमी ,नागपंचमी, गणेशोत्सव ,दसरा ,दिवाळी, तुकारामबीज व दत्तजयंती हे सण  साजर् केले जातात  नागपंचमीला बाबुराव  लखु कदम व बाबा  तुका कदम यांच्या घरी मातीचा मोठा नागोबा तयार करून जानाईदेवीच्या ओढ्याजवळ नागदेवतेच्या स्थानापर्यंत वाजतगाजत नेला जातो याच दिवशी सकाळी लहान तरुण मुले उठून डोंगरात जावून 'कार 'नावाचे बोरासारखे दिसणारे फळ तोडून आणतात त्यानंतर बांबू (कळक) पासून' मेपटे' नावाचे साधन बनवले जाते नागोबामंदिरासमोर मेपटयातून कारे उडवली जातात हे या गावाचे वा नागपंचमीचे वैशिष्ट्ये आहे.यावेळी मुली स्त्रिया झिम्मा फुगडी खेळतात आजही प्रथा चालू आहे.

तसेच गेली ८० वर्षे संपत कोंडीबा वीर यांच्या घरी तुकारामबीज साजरी केली जाते त्यांचे वडील कोंडीबा वीर हे वारकरी संप्रदायात होते त्यांनी तुळसण ते पंढरपूरपर्यंत लोटांगण घातले होते तसेच राजाराम बंडू माने यांच्या घरी गेली ९० वर्षे रामनवमी साजरी केली जात आहे.तर दादाजी बाळाजी वीर यांनी दत्तसंप्रदायाचा प्रसार करण्यासाठी आपल्या घराजवळ दत्तमंदिर बांधले या दत्तमंदिरात गेली २७ वर्षे दत्तजयंती साजरी केली जाते याच बरोबर गणेशोत्सव मोठा प्रमाणात साजरा केला जातो तसेच सन १९८९ साली बांधलेल्या नवीन गाव विहिरीसाठी संपत कोंडीबा वीर यांनी चार गुंठे मोफत जागा दिली होती.

ग्रामपंचायतीची स्थापना सन १९५३ साली झाली पहिले सरपंच  कै .

गजाराम भाऊ माने होते दुसरे सरपंच कै.जागरू विष्णु माने यांनी आपल्या आईचे दागिने गहाण ठेवुन ग्राम पंचायतीची जुनी इमारत बांधली आजच्या काळात पदरमोड करून सामजिक काम करणारे लोक दुर्मिळ आहेत.

एकनाथ महाराजांच्या भारूडाच्या माध्यमातुन . काही बाबुराव बाळा वीर व कुंडलीक बाबु खोत यांनी काही वर्षे समाजप्रबोधन व मनोरंजन केले तसेच सन १९६५ साली गावात यशवंत नाट्यमंडळाची स्थापना झाली .मंडळाने गावचा सांस्कृतिक वारसा जोपासून अनेक कलाकार निर्माण केले या काळात बाळकृष्ण विठू वीर (पोस्टमास्तर) यांनी रावबहाद्दूर ची भूमिका अजरामर केली होती.

गावात स्वा.सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा ५ संप्टेंबर १९९४ साली सुरु करण्यात आली सध्या शाखेची एकुण उलाढाल "बारा कोटी" रुपयांची आहे.या शाखेमुळे गावाचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे,तरीही जिल्हा बँकेच्या ओंड उंडाळे वा सवादे शाखेतून आर्थिक व्यवहार होतात चार वर्षापुर्वी जिल्हा बँकेची शाखा मंजूर झाली आहे. तसेच निनाईदेवी नागरी पतसंस्था ,निनाईदेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था तुळसण अशा दोन संस्था देवीच्या नावाने कार्यरत आहेत.

रयत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून उंडाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्रीपती आबा वीर यांनी काम पहिले आहे.तर रयत सहकारी साखर कारखान्याच्या रयत कृषी ओद्योगिक वाहतूक संस्थेचे चेअरमन रघुनाथ वीर (पाटील) आहेत.

येथे नवरंग गणेश मंडळ बालगणेश मंडळ जयहिंद गणेश मंडळ ज्ञानदीप गणेश मंडळ निनाईदेवी महिला मंडळ निनाईदेवी सार्वजनिक वाचनालय आदीसह १६ मंडळे आहेत.बालगणेश मंडळ हे सर्वात जुने गावातील पहिले गणेश मंडळ आहे.त्याची स्थापना सन १९७९ मध्ये झाली त्यानंतर लगेच १९८० साली नवरंग गणेश मंडळाची स्थापना झाली बालगणेश मंडळाच्या वतीने गणपती मंदिर बांधण्यात आले आहे.

गावामध्ये हायस्कूल नसल्यामुळे इयत्ता पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यानंतर विध्यार्थ्यांना ओंड उंडाळे व सवादे या ठिकाणी जावे लागत होते ग्रामस्थ्यांच्या मागणीवरून सन १९९७ मध्ये ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक मा.आमदार विलासराव पाटील (काका) यांनी निनाईदेवी माध्यमिक विद्यालय सुरु केले सुरवातीला तुळसण सोसायटीचे माजी चेअरमन हरी ज्ञानू वीर उर्फ तात्या पाटील यांनी आपले घर कोणतेही भाडे न घेता मोफत दहा वर्षे हायस्कूलसाठी दिले होते सन २००७ मध्ये सुमारे २०| लाख रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली आहे.

. जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी प्राथमिक शाळा असुन तिची स्थापना १९१८ साली झाली एप्रिल२०१८ मध्ये शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत भागातील सर्वात मोठी व उपक्रमशील शाळा आहे

गावात कै. बुवाजी पिलाजी पाटील हे ज्योतीषी होते.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घरात हजारो ज्योतिष विषयाची पुस्तके व पचांग सापडली होती. जुन्या काळातील इयत्ता ७ वी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांना मराठी व मोडी लिपीचे ज्ञान होते. काही वर्षे ते पोलिस पाटील होते. तसेच कै. जगन्नाथ विठु वीर हे ही प्रसिद्ध ज्योतिषी होते.

विविध प्रकारच्या रोगांवर झाडपाल्याचे औषध येथील शिवाजी आनंदा वरकड प्रत्येक मंगळवारी मोफत देतात त्यांच्या कडे पश्चिम महाराट्रातून लोक येतात.

     तर निवूत्ती हिरवे हे लहान मुले शेळ्या यांचे मोडलेले हात पाय गावठी उपाय करून बरे करतात आतापर्यंत हजारो मुले व प्राण्यांच्यावर त्यांनी उपचार केल आहेत अलीकडे हाडांचे दवाखाने झाल्यामुळे फारशे त्याच्याकडे कोणी जात नाही.

माजी सैनिक पांडूरंग बाबुराव साळुंखे हे गावातील भजनी मंडळाचे प्रमुख आहेत भजन साठी मिळालेली देणगी साठवून ती सामाजिक कामासाठी वापरतात.महादेव मंदिर जीर्णीध्दारासाठी त्यांनी मदत केली आहे. तर शंकर रामा कोळी यांच्या घरी चुनखडी पासुन चुना तयार केला जातो त्यांच्या चुन्याला कराड व शिराळा तालुक्यात मोठी मागणी आहे. तर महमंद मुल्ला हे भजनात कलाट वाजवतात.त्याच्या वाजवण्या मुळे भजनाची रंगत वाढते मुस्लीम असूनही त्यांनी गेली ४०वर्षे ही परंपरा जोपासली आहे.

 तर कु .अपेक्षा वीर ही टी व्ही  मालिकेत काम करते. कमला मालिकेत तिने चांगला अभिनय केला होता

येथील बाजीराव आनंदा वीर यांनी २५ वर्षापुर्वी गाई पाळलेल्या होत्या ते दररोज धार काढण्यापुर्वी आपल्या मनोरंजनासठी टेपरेकॉर्डर लावीत. काही दिवसानी याची गाईना इतकी सवय झाली की टेपरेकॉर्डर बंद असला की कमी दुध देवु लागल्या टेप सुरू केला की दुधाचे प्रमाण वाढु लागायचे यावरुन संगीताची आवड माणसालाच असते असे नसुन मुक्या प्राण्यांना त्याची आवड असते याची प्रचिती येते त्यावेळी या घटनेला दै.ग्रामोध्दार व दै.पुढारी ने मोठी प्रसिद्धी दिली होती.

विठोबाचीवाडी (विठ्ठलवाडी) व पाचपुतेवाडी या दोन वाड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात आला असला तरी या वाड्या गावचा अविभाज्य घटक आहेत विठोबाचीवाडी येथील यात्रा गुढीपाडव्या दिवशी भरविली जाते येथे नाट्यपरंपरा जोपासली जाते एकेकाळी कै बापूराव करांडे यांनी पंचक्रोशीतील ग्रामीण रंगभूमी गाजवली होती तसेच निवृत्ती भणगे व सेवानिवृत्त शिक्षक बबनराव जामदार यांनीही नाट्यचळवळ पुढे नेण्यासाठी योगदान दिले तसेच मातंग समाजातील शाहीर सिद्राम उर्फ सदाशिव चव्हाण यांनी पोवाडे ,लावण्या प्रवचन आदीच्या माध्यमातून कराड तालुक्यात नावलौकिक केला होता तर एकतारी भजनासाठी कै . तुकाराम मारुती चव्हाण सीताराम मारुती चव्हाण हे बंधू प्रसिद्ध होते अलीकडच्या काळात कै. महादेव बापू चव्हाण वा सध्या बाजीराव काळूराम चव्हाण हे कराड परिसरातील विविध तमाशात काम करतात तुळसणचे नाव गाजवत आहेत वाडीत बारा बलुतेदारापैकी मातंग चर्मकार व धनगर समाजाचे लोक राहतात येथील केरसुणीना परिसरात मोठी मागणी आहे

पाचपुतेवाडी डोंगराच्या कुशीत वसले असून येथे तुकाराम बीजेला जत्रा भरते.म्हसोबा मंदिर संत तुकाराम मंदिर वा येथील थोर संत नाना चंदू मोरे यांची मंदिरे आहेत.दोन्ही वाडीत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षणाची सोय आहे.

गावात बारा बलुतेदार रहातात काहीजण परगावी स्थायिक झाले आहेत .

संकलन 

दिलीपकुमार रघुनाथ पाटील मु पो.तुळसण ता.कराड