अरुण श्रीधर वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनरल अरुण श्रीधर वैद्य (२७ जानेवारी, इ.स. १९२६; अलिबाग, महाराष्ट्र - १० ऑगस्ट, इ.स. १९८६; पुणे, महाराष्ट्र) हे भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते. इ.स. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्र पुरस्कार मिळाला. नंतर इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी ते भारतीय भूदलाचे प्रमुख होते. सेवेतून निवृत्त झाल्यावर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची महाराष्ट्रात पुणे येथे ह्त्या केली.

हत्या[संपादन]

भारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट, इ.स. १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या. वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्यांचा अंगरक्षकही सोबत होता; व तोही पाठीत व मांड्यांत गोळ्या लागून जखमी झाला. खलिस्तान कमांडो फोर्स या अतिरेकी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली व सुवर्णमंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी वैद्यांना मा‍रल्याचा दावा केला. काही काळात वैद्याच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आले. इ.स. १९८९ मध्ये सुखदेव सिंग आणि हरजिंदर सिंग यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ९ ऑक्टोंबर, इ.स. १९९२ रोजी या दोघांना फाशी देण्यात आले.