"निजामशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:
[[इ.स. १४८६]] साली [[निजाम-उल-मुल्क]] ह्या [[बहमनी]] सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि [[जुन्नर]] हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.
[[इ.स. १४८६]] साली [[निजाम-उल-मुल्क]] ह्या [[बहमनी]] सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि [[जुन्नर]] हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.


[[२८ मे]], [[इ.स. १४९०]] रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे [[अहमदनगर]] असे नामांतर केले.
[[मे २८]], [[इ.स. १४९०]] रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे [[अहमदनगर]] असे नामांतर केले.


पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. [[चांद बिबी]] ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. [[मलिक अंबर]] हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.
पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. [[चांद बिबी]] ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. [[मलिक अंबर]] हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.

०४:५९, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)

अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

स्थापना

इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्या बहमनी सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.

मे २८, इ.स. १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामांतर केले.

पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. चांद बिबी ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अंबर हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.

घराणे

या सल्तनतीच्या अधिकारारूढ सुलतानांना निजामशाह या किताबाने उल्लेखले जाई.

नाव कार्यकाळ (इ.स.)
अहमद निजामशाह १४९० - १५०८
बुऱ्हाण निजामशाह १५०८ - १५५३
हुसेन निजामशाह १५५३ - १५६५
मूर्तझा निजामशाह १५६५ - १५८८
मिरान हुसेन १५८८ - १५८८
इस्माइल निजामशाह १५८८ - १५९०
दुसरा बुऱ्हाण निजामशाह १५९० - १५९५
इब्राहिम निजामशाह १५९५ - १५९६
दुसरा अहमद निजामशाह १५९६ - १५९६
बहादुर निजामशाह १५९६ - १६०५
दुसरा मूर्तझा निजामशाह १६०५ - १६३१