"पुष्यमित्र शुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB |
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: es:Púsiamitra Shunga |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
[[de:Pushyamitra Shunga]] |
[[de:Pushyamitra Shunga]] |
||
[[en:Pusyamitra Sunga]] |
[[en:Pusyamitra Sunga]] |
||
[[es: |
[[es:Púsiamitra Shunga]] |
||
[[it:Pusyamitra Shunga]] |
[[it:Pusyamitra Shunga]] |
||
[[ja:プシャヤミトラ]] |
[[ja:プシャヤミトラ]] |
१०:४४, १० जुलै २०११ ची आवृत्ती
पुष्यमित्र शुंग हा मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. इतिहासात याने बौद्ध धर्मियांच्या पाडावासाठी अनेक कौर्यपूर्ण क्रुत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याचा एका लष्करी कार्यक्रमाच्या वेळेस वध केला व स्वता: मगध साम्राज्याचा शासक बनला. अश्या प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगध वर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले.
इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार एक महान सेनानी होता ज्याने डेमेट्रीयस चे ग्रीक आक्रमण परतावून लावले तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाचा अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान बौद्ध स्तूपांना लक्ष्य केले. अशोकाच्या कारकीर्दीत बांधलेल्या अनेक बौद्ध स्तूपांचा पाडाव केला तसेच बौद्ध धर्मियंना मिळणार्या राजकीय सुविधा बंद केल्या.